Wednesday, August 19, 2009

निवेदन एक कला....

निवेदन एक कला....

मागचे पोस्ट हे गाण्याच्या मागे जी व्यवस्था लागते त्याबद्द्ल लिहिले तेव्हा आता हे प्रत्यक्ष एका गाण्याच्या कार्यक्रमाबद्दल. बर्‍याच वेळेला आपण गाण्याचे कार्यक्रम ’बघतो’ नुसते ’ऎकत’ नाही. आजकाल स्टेज डेकोरेशन, कपडे, निवेदन या सगळ्याला महत्व आलेले आहे. बहुतेक वेळेला कुठलीतरी एक थीम घेउन गाणी बसवतात. कधी प्रेमावर तर कधी पावसावर तर कधी विरहावर तर कदी एखाद्या गायक/संगीतकाराची गाणी असतात. ह्या सगळ्या गाण्यांना एका सूत्रात बांधणारी एक महत्वाची व्यक्ती असते ती म्हणजे निवेदक. बर्‍याच वेळेला दोन निवेदक असतात (स्त्री व पुरूष). निवेदकाचे काम खूप महत्वाचे असते.

निवेदकाला कार्यक्रमातील सगळी गाणी जोडावी लागतात. यासाठी अधून मधून विनोद, कधी गाण्याबद्द माहिती तर कधी काही कविता असे सागावे लागते. प्रेक्षकांना गाणी ऎकताना खूप वेळ माहिती ऎकणे कंटाळवाणे होते त्यामुळे थोडक्यात पण इंटरेस्ट वाटेल असे बोलणे आवश्यक असते. कार्यक्रमाचा काळ, कल्पना आणि वेग या तिन्ही गोष्टी संभाळणे आवश्यक असते. मधे मी एक कार्यक्रम बघितला त्यातल्या निवेदकाने ’वेदनेशिवाय जे ऎकावे वाटते ते निवेदन’ अशी सुट्सुटीत व्याख्या केली होती.
आमच्या इथे असच एक कार्यक्रम बसवला होता (हॊशी) त्याचे हे निवेदन व गाण्याच्या लिंक्स देत आहे. तुम्हाला गाण्याचा एक प्रोग्रॅम बघितल्याचे समाधान वाटेल हे नक्की. या कर्यक्रमात गायकांना त्याच्या आवडीची गाणी म्हणायला परवानगी होती त्यामुळे ती जोडणे हे फार कॊशल्याचे काम होते कारण खूप वेगळ्या विषयावरची गाणी एकत्र गुंफायची होती. हे अवघड काम सोपे केले सॊ. देवयानी गोडसे यांनी. माझाही थोडाफार हातभार होताच. तर बघूया हा कार्यक्रम....

नमस्कार मंडळी. आजच्या माझे गाणे या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचे स्वागत. या कार्यक्रमात आपली गायक मंडळी घेउन आली आहेत आपल्या आवडीची गाणी. कुणी पसंती दिली आहे आपल्या आवडत्या गायकाला, कुणी त्यातल्या काव्याला तर कुणी चालीला. कार्यक्रमाची सुरूवात करू या एका अभंगाने....
सकल मराठी जनांची मायमाउली म्हणजे आपला पंढरीचा विठोबा. या आपल्या माउलीला भेटायला दर वर्षी लाखो भाविक पंढरीची वाट धरतात. टाळ मृदुंगाची साथ आणि मुखाने विठूनामाचा गजर. चला तर आपणही सामील होऊ या या गजरात. संत एकनाथ महाराजांचा अभंग आपल्या दमदार आवाजात सादर करत आहेत.........माझे माहेर पंढरी.....

पंढरीची वारी म्हटली की हमखास पावसाची आठवण होते. या पुढचे गाणे आहे पावसावरचे.
दाटून आलेले आभाळ, वार्‍याची गोड शिरशिरी आणि मनाला धुंदी आणणारा तो मृदगंध हे सगळे आपल्याला पहिल्या पावसाची आठवण करून देते. असे हे सुंदर क्षण अनुभवताना आपली आवडती व्यक्ती बरोबर हवी असे साहजिकच वाटते. अगदी हेच भाव पुढील गाण्यातून सादर केले आहेत......अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले....

या गाण्यात तिच्या मनातले भाव तुम्ही ऎकलेत आता विरहाच्या नुसत्या कल्पनेने त्याची काय परिस्थिती झाली हे बघूया.
प्रेमात गुंतलेले दोन जीव एकमेकांसाठीच जगत असतात. अधून मधून विरहाचे क्षणही येतात पण ते प्रेमाची गोडी अजूनच वाढवतात. आपल्या शिवाय तिचे दिवस कसे सरतील असा गोड प्रश्न त्याला पडलाय. खरे तर दोघांची परिस्थिती तीच आहे पण तिच्याकडून प्रेमाची कबुली घेण्यातली मजा आही ऒरच. संदीप खरे यांची ही सुंदर कविता सादर होत आहे. यातले शब्द आणि चाल तुम्हाला नकीच ठेका धरायला लावतील. कसे सरतील सये....

आपल्या संस्कृतीत लोककलेचा वारसा फार मोठा आहे. मायमराठीचा ठळक्पणे सांगता येणारा लोककलेचा प्रकार म्हणले लावणी. लावण्याचा भावाविष्कार करते ती लावणी. शृंगाररसाची धिटाईने मांडणी करते ती हिच लावणी आणि ऎकणार्‍याला आपल्या तालावर थिरकायला लावते ती पण लावणीच. मध्यंतरी या लावणीला कठिण काळातून जावे लागले पण त्यातून बाहेर पडून पुन्हा लोककलेचा मानाचा तुरा म्हणून ती आता ऒळखली जाते.
अशीच एक नखरेल लावणी आपल्या भेटीला घेउन येत आहे ......रेशमाच्या रेघांनी....

यानंतर पंढ्रीची मायमाउली पुन्हा आपल्या भेटीस येत आहे. संत मंडळींना या माउलीला भेटायला प्रत्यक्ष देवळात जावे लागते असे नाही. विठ्ठ्लाच्या रूपाने भारलेल्या वातावरणातच भक्तांना त्याचा साक्षात्कार होतो. संत चोखा मेळा यांच्या अभंगातून विठूनामाचा महिमा सादर करत आहोत.....अबीर गुलाल उधलीत रंग............

कुठलाही मराठी गाण्यांचा कार्यक्रम ऋतु हिरवा मधील गाण्याशिवाय पूर्ण होत नाही. मग आपला कार्यक्रम तरी त्याला अपवाद कसा असणार? वीणेच्या स्वरसाजाचे स्वभाव सांगणारे गाणे यानंतर सादर होत आहे. आपण आपल्या भावना नेहेमी शब्दातून व्यक्त करतो आणि संवाद साधतो. पण संवादासाटी खरेच शब्दांची आवश्यकता असते का? तुम्ही जर कधी वीणा ऎकली तर लक्षात येईल की वीणेचे स्वर नानाविध भाव वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त करतात. कधी तराणा, कधी नखरेल खटका तर कधी सुंदर ताना. मग हे स्वर आपल्या मनाला भिडतात आणि सहजच शब्देविणु संवादु साधला जातो.
बा. भ. बोरकरांच्या कवितेतून सादर झालेले हे विचार सादर होत आहेत पुढच्या गाण्यातून..... झिनीझिनी वाजे बीन

सलील कुलकर्णी व संदीप खरे या जोडगॊळीने सध्या मराठी तरूणाई वर मोहिनी घातली आहे. सरळ सोपे आणि म्हणूनच आपलेसे वाटणारे शब्द, अधी डोलायला लावणारे तर अधी व्याकूळ करणारे. याच जोडीचे एक विरहगीत आता आपल्या पुढे येत आहे. संसारत रूसवे फुगवे, अबोला हे तर नेहेमीचेच पण हे जर एका मर्यादेबाहेर गेले तर कधी कधी ताटातुटीचे क्षण ही येउ शकतात. अशावेळी एकटेपणा प्रकर्षाने जाणवतॊ. नकळतच आपण आपल्या मनाशी कबुली देतो. आपल्या सुरेल आवाजात ही कबुली देत आहेत.
नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो..........

यानंतर शेवटचे गाणे सादर करण्यापूर्वी वादकांची ऒळख झाली.

आता वळू या कार्यक्रमाच्या शेवटच्या गाण्याकडे. ग्रामीण बाजाची गाणी म्हणजे आपल्या साहित्यातला अनमोल ठेवा. ग्रामीण भागातले बोलणे, वागणे अगदी मोकळं. कसं बोलू काय बोलू असे भिडस्त प्रश्न नाहीत. सगळा कारभार कसा खुल्लम खुल्ला. अशा प्रकारची गाणी देण्यात दादा कॊंडके यांचा फार मोठा वाटा आहे. या गाण्यातला तो व ती म्हणजे खेड्यातली जिवंत तरूणाई.
आंधळा मारतो डोळा या चित्रपटातील तिखी नोकझोक खास गावरान ठसक्यात सादर होत आहे पुढ्च्या गाण्यातून...
अग हिल हिल पोरी तुला..
.






4 comments:

Snehal said...

Madhuriji...
Tumhi lihilela ha lekh va tyaatil udaharan kharokh upyukt ahe.

Unknown said...

Khup chhan ahe.

Anonymous said...

माला ही आवडेल bolgs लिहायला , तुमचा लेख छान आहे

Unknown said...

मला 1 मिनिटाचे निवेदन हवे आहे आजच