Wednesday, November 3, 2010

मिशन मिशनरींचे...

मिशन मिशनरींचे...

अमेरिकेत आजकाल भारतीय खूप आहेत. आपले खाणे, कपडे व क्रिकेट याबद्दल खूप आकर्षण असते. आपले कल्चर दाखवण्यासाठी अघूनमघून भारतीय गोश्टी डिस्प्ले करतात. असाच काल एका चर्च मध्ये इंडिया डे होता. तिथे आजकाल बरेच भारतीय जातात म्हणून त्यांनी कल्चरल एक्स्चेंज नावाखाली हा कार्यक्रम ठेवला होता. ९-१० स्टेट्स चे स्टाॆल्स मांडले होते. वेगवेगळ्या भाषा , भांडी, किराणासामान, आणि दागिने हेही होतेच. एका ठिकाणी क्रिकेट बद्दल माहिती सांगणारा विभागही होता. साडी नेसवण्याचीही सोय होती. मी म्युझिक स्टाॆलबरोबर गेले होते. लोकांना तबला, पेटी व वीणा यांचे प्रात्यक्षिक होते. खाण्याच्या विभागात चहा समोसा ठेवला होता. आपल्या वेगवेगळ्या भाषा - लिपी, खाणे व क्रिकेट याबद्दल अमेरिकेत खूप आकर्षण आहे.

त्यानंतर एका मिशनरी बाईचे भाषण होते. मी नेहेमी मिशनरींबद्दल लोकांकडून ऐकलेले म्हणून म्हटले बघू तरी काय म्हणते ते.... त्या बाईंनी ५० वर्षे कलकत्त्याला राहून काम केले आहे. सुरूवातीला टेंट मध्ये राहून लोकांना ंमदत केली. भारताच्या प्रगतीबद्दल सुरूवातीला ती बोलली. नंतर मात्र उपासमार, बेकारी, शिक्षणा ला वंचित मुले, याची भरपूर आकडेवारी दिली. अर्थात त्यात खोटे काही नव्हते. अगदी सुरूवातीला अापल्या धर्मातील जातिवाद, अंघश्रद्धा व अडाणिपणा याचा पुरेपूर फायदा या मिशनरींनी घेतला. खालच्या जातीतिल लोकाॆना शिक्षणापासून दूर ठेवले होते त्यांना जवळ केले. एखाद्या घरात आंधळे, डिफाॆर्म मूल जन्मले तर गेल्या जन्मीचे पाप समजून त्यावर उपचार करत नसत. औषधाला पैसेही नसत अशांना या लोकांनी जवळ केले .. साहजिकच ही मुले त्या धर्मात ओढली गेली. अगदी कचराकुंडीतील मुले आणून ती वाढवली. शाळा काढल्या , दवाखाने काढले व दोन वेळचे जेवण पुरवले. अन्न, वस्त्र व निवारा या तिन्ही गरजा भागतात म्हटल्यावर लोक तिथे जायला लागले. हा सगळा खर्च इथल्या चर्चच्या पैशावर चालतो.

हे सगळे ऐकल्यावर वाटले की खरेच भारतात आज बाहेरून एवढी मदत घेण्याची गरज आहे का....जगातील श्रीमंत लोकात आज काहींचा नंबर लागतो. आपल्याकडेही अनाथआश्रम धर्मशाळा आहेत मग या लोकांचे का फावते....आपण म्हणतो की ही मंडळी धर्मप्रसार करतात पण एक नक्की की त्यासाठी कष्ट व सेवा ही करतात. काही लोकांचे म्हणणे असे असते की कोणाला आजकाल खायची भ्रांत नाही पण परिस्थिती अशी आहे की अशा गरजू लोकांपर्यंत आपण पोचत नाही आपला परिघ खूप छोटा असतो. त्यापलिकडे बघायला हवे. खेड्यात रहातात त्यांना वेगळा अभ्यासक्रम केला पाहिजे. आपली मंदिरे दानी व्यक्ति यांचे पैसे योग्य तर्हेने वापरले गेले पाहिजेत. नियोजन केल्यास आणि यात कोणितरी लक्ष घातल्यास अन्न वस्त्र निवारा पुरवायची क्षमता आपल्यात नक्की आहे. शिक्षण देणारी भरपूर मंडळई आहेत या सगळ्या गोष्टींचा विचार करून आलेली मदत योग्य ठिकाणी वापरण्याचे भान असणारा नेते आता यायला हवा.

No comments: