Friday, December 30, 2011

काही वाचनीय... दीपस्तंभ

काही वाचनीय... दीपस्तंभ

गेल्या महिन्यात प्रा. शिवाजीराव भोसले यांचे दीपस्तंभ हे पुस्तक वाचनात आले. पेपर मध्ये लिहिलेल्या स्तंभलेखनातून या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. पुस्तकाचे नाव, प्रस्तावना व आतील मजकूर सगळेच प्रेरणादायी वाटले. समुद्रात वाट चुकलेल्यांना दीपस्तंभ मार्ग दाखवतो त्याप्रमाणे या पुस्तकात अशा अनेक लोकांची ओळख करून दिली आहे जे जनजागृति च्या कामात दीपस्तंभासारखे उभे होते. पेशवे कालानंतर धर्माच्या नावावर बराच काळाबाजार चालला होता तो लोकांना दाखवण्याचे काम या लोकांनी केले. अनिष्ट रूढी मोढण्यासाठी त्यांनी किती कष्ट घेतले ते यात दाखवले आहे. गंमत म्हणजे अजूनही जात, धर्म या गोष्टी वापरून आपल्यावर संकटे येत आहेतच. या पुस्तकाला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्रींची प्रस्तावना लाभली आहे ती पण वाचनीय. आजकाल व्याख्यान संस्क्रृति लोपली आहे त्यामुळे हे पुस्तक वाचायला अजून चांगले वाटले.

शाळेत असताना आपण वरेच वेळा समाजसुधारकांचे कार्य अभ्यासतो पण त्यापुढे जाउन चरित्रे वाचत नाही. या पुस्तकात थोडक्यात चरित्र दिली आहेत. काही मजेदार आठवणी दिल्या आहेत. आपल्याला वाटले तर पुढे जाउन अजून वाचावे. साधारण स्वातंत्र्यापूर्वीचा काळ, १८ व्या- १९ व्या शतकाचा काळ, बहुतेक सगळे गरिबीतून कसेबसे शिक्षण घेणारे पण शेवटी आपल्या ध्येयापर्यंत पोचणारे. ब्रिटिशांचे एका बाबतीत कौतुक वाटते, जरी ते राज्यकर्ते होते तरी बुदधीला त्यांनी मान दिला. हुशार लोकांना त्याच्या विद्यापीठात शिक्षण घेण्यास बोलावले. आणि वेळ आली तर पारितोषकाने गौरवले पण.

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी मराठी विश्वकोषाचे बरेच खंड संपादित केले आणि आता ते मराठी विश्वकोष या दुव्यावर उपलब्ध आहे. त्यांनी केलेल्या कामाची ओळख या पुस्तकातून झाली.बहुतेक सगऩ्या लोकांनी घर्मांचा तौलनिक अभ्यास केला आहे, ही गोष्ट फार महत्वाची वाटते. शाळेपासूनच जर इतर घर्माबद्दल माहिती झाली तर मुलांना खूप फायदा होईल. १८०० ते १९०० हा काळ असा होता की भारतीय संस्क्रृति, मोगलांचे वर्चस्व व राज्य इंग्रजांचे... सगळ्या गोष्टी धर्माशी निगडीत होत्या. अंधश्रदधातून लोकांना बाहेर काढणे अत्यंत अवघड होते.

या पुस्तकात आलेल्या समाजसुधारकांचे विचार वेगळे होते, पण प्रत्येकाचे ध्येय एकच होते. सामान्य जनांना जागृत करणे, एकत्र करणे व चांगला समाज तयार करणे. मग ते सर्व धर्मातील मूलतत्वे एकत्र घेउन, एक परमत्त्व सर्वात आहे असे मानणारे ब्राम्हो समाजाचे राजा राममोहन राँय असोत किंवाजातिभेदाला न मानत योग, परमेश्वर चैतन्य यांना मानून आर्य समाजाचा प्रसार करणारे महर्षि दयानंद असोत. बरीच वर्षे देशाबाहेर राहून शिकलेले पण शेवटी भारतातच कार्य करणारे अरविंद योगी असोत. त्यांनी मानवाची पुढची आवृत्ती महामानव सांगितली आहे. matter, mind va supermind अशी त्यांची धारणा होती. प्रत्येकाची कल्पना आणि अभ्यास दांडगा.विश्वेश्वरअय्या यांनी केलेल्या पाण्याच्या प्रश्नांचे व्यवस्थापन आणि काढलेले अनेक कारखाने...एक माणूस किती काम करू शकतो याची कल्पना येते. बहुतेक सगळ्यांना लहानपणी भरपूर पायपीट करावी लागली पण पुढे तब्येतीसाठी फायदाच झाला. दुसरी एक गोष्ट सातत्याने द्सली म्बणजे वहुतेकांना बडोद्याच्या महाराजांनी सहाय्य केले नोकरी किंवा पैसा देउन.
जे क्रृष्णमूर्तींचा थिआँसाँफिकल विचार , स्वामी विवेकानंदांचे विचार, कर्मवीर पाटील यांची रयत शिक्षण संस्था व अगणित वसतिगृहे, शाहू महाराजांचे विचार, साने गुरूजींची तत्वे, या सगळ्याशी या पुस्तकातून ओळख होते.

गुरूदेव रानडे यांनी जी राष्ट्राच्या अवनतीची कारणे दिली आहेत ती आजही पटतात. गुरूदेव टागोरांचे मातृभाषेतून शिक्षण घेण्याचा आग्रह, काबुलीवालाची गोष्ट, जयप्रकाश नारायण यांनी अमेरिकेच्या वास्तव्यात घेतलेला श्रमप्रतिष्ठेचा अनुभव, जोतिबा फुले यांनी केलेले अस्पृश्यता निवारण, स्त्रीशिक्षण याचे कार्य. साने गुरूजींनी भाषेच्या शिक्षणासाठी केलेले प्रयत्न अशा अनेक गोष्टींचा हे पुस्तक म्हणजे खजिना आहे.

हे पुस्तक शाळेत, इंटरनेटवर ठेवले तर जास्त मुलांपर्यंत पोचेल व त्यांना या लोकांची ओळख तरी होइल. पूर्वी लोकांच्या शिक्षणासाठी संत लोक जन्म घेत. हे सगळे आधुनिक संतच म्हणायचे. गंमत ही आहे की एवढी रत्ने जन्मली त्यांनी एवढे काम केले तरी जाति, धर्म यांच्या लढाया वाढत आहेत. धर्म, जाति व अंधश्रद्धेचा पगडा इतका घट्ट का असतो, की जो काढायला हे दीपस्तंभ अपुरे पडावेत.......

Monday, December 5, 2011

जागो मोहन प्यारे....

जागो मोहन प्यारे....

आजकाल जमाना फ्यूजन चा आहे. सगळीकडे मिलावट दिसते. वेस्टर्न गाणी, बँड यांचा मुलांवर खूप प्रभाव दिसतो. अर्थात यात त्यांचा दोष नाही. बाहेर सगळीकडे तेच दिसते, ऐकू येते व मुले अनुकरण करतात. पटकन गायक बनण्यासाठी आजकाल सगळे धडपडत असतात. स्टेज शो चे तर सगळ्यांना आकर्षण - लहान असोत की मोठे.

हे सगळे पहाताना वाटते की आपले संगीत यात हरवून तर जाणार नाही ना... आता तुम्ही म्हणाल की खूप मुले गाणे शिकतात...शिकतात हे खरे आहे पण प्रमाण कमी आहे. पूर्वी शाळेत विषय होता आता फारसा दिसत नाही. भारतात लोकांना शिकणे सोपे आहे पण बाहेरच्या देशात थोडे अवघड जाते. आजकाल स्काईप वरून शिकणे हा एक प्रकार चालू झाला आहे.

आपले संगीत शिकायला गुरू ची आवश्यकता असते. गुरू शिष्य पद्धतीवर आपले शिक्षण आधारित आहे. वेस्टर्न प्रकारात सगळे लिहून दिलेले असते. इथल्या मुलांना शाळेपासून शीट म्युझिक ची सवय असते. शाळेत वाद्य शिकणे आवश्यक असते त्या मुळे प्रत्येक मुलाला थोडीतरी जाण असते. बीट सायकल ची ओळख असते त्यामुळे ताल समजतो. लहानपणापासून बँंड, काँन्सर्ट याची शिस्त अंगात भिनलेली असते. पण गाणे जर लिहिलेले नसेल तर कळत नाही. गेली काही वर्षे इथे राहिल्याने हा फरक जाणवतो.

इथे एक म्युझिक सर्कल च्या कामात असे लक्षात आले की अमेरिकन मुले वाद्याचे कार्यक्रम आवडीने बघतात कारण त्यांना ताल कळतो. आपली मंडळी आम्हाला काही ते शास्त्रीय कळत नाही असे म्हणून यायचे टाळतात. असेच एक कलाकार गेल्या महिन्यात आले होते. त्यांनी शिकागो मधील १५ अमेरीकन मुलांना आपल्या पद्धतीने गाणे शिकवले. ५ राग व बंदिशी या नोटेशन लिहून न देता ही मुले म्हणू शकतात. त्यांना आपली गुरू शिष्य परंपरा थोडीतरी कळली आहे हे नक्की. राग भैरव मधील एक बंदिश शेअर करत आहे.

जागो मोहन प्यारे

ही मुले एक सेमेस्टर शिकली आणि छान म्हणत आहेत अगदी १०० टक्के नाही पण कौतुकास्पद आहे. र,ट आणि च हे उच्चार इथल्या मुलांना जमत नाहीत. म्युझिकल नोटेशनशिवाय म्हणले आहे हे ही कौतुकास्पद. त्यांना कोमल आणि शुद्ध हा समजावणे थोडे अवघडच पण या गुरूंनी ते करून दाखवले. या मुलांवर केलेला प्रयोग बघून इतरांना जर यात इंटरेस्ट वाटला तर काही दिवसांनी हिंदुस्तानी संगीताचे चित्र बदलेले दिसेल कारण एखादी गोष्ट पाश्चात्यांनी सांगितली की आम्हाला पटते. पिकते तिथे विकत नाही हेच खरे.

Wednesday, November 9, 2011

जमिनीच्या पोटात

जमिनीच्या पोटात.....

काल एक माहितापर फिल्म पहाण्यात आली. आजकाल आपली(जीव सृष्टीची) सुरूवात कशी झाली, कधी झाली याबद्दल बरेच काही दाखवत असतात. जे माहित नाही ते शोधून काढणे हा माणसाचा स्वभाव आहे आणि त्यासाठी तो खूप कष्ट घेत असतो. असाच एक प्रयत्न नायकाच्या बाबतीत झाला. आता हे .नायका प्रकरण आहे तरी काय.....


मेक्सिको च्या उत्तरेला चिवावा प्रांतात काही खाणी आहेत. त्या खाणीत डोंगरातून पाणी येते ते मोठे पंप लावून काढले जाते. आश्चर्याची गोष्ट ही की हे पाणी खूप गरम असते. या काढून टाकलेल्या पाण्याने जवळच एक मोठा लेक तयार झाला आहे. बाकी आजूबाजूला वाळवंट आहे. जमिनीखाली ३०० मी वर हे खाणकाम चालते. एकदा काही कामगारांना वेगळे द्रृष्य दिसले. नेहेमीचे काम करत असताना त्यांचे सहजच खाली लक्ष गेले तर तिथे त्यांना मोठे बर्फासारखे क्रिस्टल्स दिसले. आतमधे एवढे गरम असताना बर्फासारखे काय दिसते म्हणून त्यांची उत्सुकता चाळवली गेली. पुढे गेल्यावर जवळ जवळ
फुटबाँल फिल्ड एवढ्या जागेत हे क्रिस्टल्स दिसून आले. काही तर ११ मी उंच आणि १ मी रूंद एवढे मोठे आहेत. प्युअर जिप्सम चे हे क्रिस्टल्स आहेत. दिसायला अगदी बर्फासारखे ..चमकदार आणि मोहक. मला ते पाहून सुपरमँन च्या एका सिनेमाची आठवण झाली.

वरीच लोक या बाबतीत उत्सुकता दाखवत होती म्हणून एक आंतरराष्ट्रीय टीम तयार झाली व याचा अभ्यास केला गेला. नासा, अँस्ट्रोफिजिसिस्ट, जिआँलाँजिस्ट व केमिस्ट अशी ही मंडळी होती. आत काम करताना स्पेशल थर्मल सूटस घालावे लागले. आँक्सिजन चा पुरवठ मेडिकल हेल्प हेही होतेच १० मि च्या वर आत रहाणे धोक्याचे . तेवढ्याच वेळात त्या टोकेरी क्रिस्टल्स च्या आत उतरून रिडींग्ज घेण्याचे काम त्यांनी केले व पुढे अँनालिसिस ही केले. १ वर्षात आतमधे किती क्रिस्टल वाढतो यावरून त्याचे वय साधारण १ मिलिअन वर्।े ठरवण्यात आले. वर्षाला साधारण १ इंच एवढा तो वाढतो. नंतर कोअर मधला नमुना घेउन हे निदान पक्के करण्यात आले. फटीत जे पाणी थेंब रूपात अडकले होते ते काढून डी एन ए अँनालिसिस करण्यात आले व बँक्टेरीआज तेव्हा होते हे ही दाखवून दिले. जीवावर उदार होउन काम करणारी टीम पाहुन कौतुक वाटले. हे एवढे गरम पाणी कुठुन येत असावे याचाही शोध घेण्यात आला..जमिनीच्या पोटातील मँग्मा हे काम करतो आहे.

२००० साली या केव्हज चा शोध लागला. तिथल्या प्रतिकूल परिस्थिती मुळे आपण आत तर जाउ शकत ऩाही पण या शास्त्रज्ञामुळे व फिल्म बनवण्यासाठी ज्यांनी कष्ट घेतले त्यामुळे आपण जमिनीच्या पोटात बघू तरी शकलो. या खाणीचे काम संपले (आतले खनिज) की पाण्याचे पंपिंग थांबेल व हे सगळे सुंदर क्रिस्टल्स ही जादुई दिनिया पुन्हा पाण्यात जाईल व कदाचित नष्टही होईल.

Thursday, October 6, 2011

दसरा शुभेच्छा....

दसरा शुभेच्छा....

लहानपणापासून दसरा म्हटले की डोळ्यापुढे एक चित्र येते....वाहनांची पूजा, पाटी पूजन, अवजारे पूजन, झेंडूची फुले, सोने लुटणे, नवीन कपडे आणि मिष्टान्न....

या सगळ्या गोष्टी आठवून हे शुभेच्छापत्र बनवले आहे

















या पूर्वीची काही शुभेच्छापत्रे

Thursday, September 15, 2011

जेपर्डी विथ वाँटसन

जेपर्डी विथ वाँटसन...

अमेरिकेत आल्यापासून मी जेपर्डी हा गेम शो बघते आहे. हा एक प्रश्नोत्तरांचा खेळ आहे. खूप फास्ट खेळला जातो. वेगवेगळ्या विषयावर प्रश्न विचारले जातात. हा शो बघून थोडी सामान्य ज्ञानात भर पडते आणि आपल्याला किती गोष्टी माहित नाहीत हे लक्षात येते. विद्यार्थी, शिक्षक, मुले, खेळाडू, चँरिटी, सेलिब्रिटीज, असे वेगवेगळे गट करतात. प्रश्न विचारताना सिनेमा, बायबल, इतिहास, स्पेलिंग, खाणे, नकाशे, कोडी, लेखक अशा खूप गोष्टी असतात. बघताना आपणही इतके त्यात मिसळून जातो की बस....इथल्या शाळात ही अशा स्पर्धा घेतात व मुलांना तयार करतात.

काल जेपर्डी विथ वाँटसन असा गेम पाहिला. (रिपिट) व संध्याकाळी त्यावर एक फिल्म बघितली. वाँटसन हा एक काँम्प्युटर आहे. २ चँम्पिअन्स व काँम्प्युटर असा गेम होता. आणि शेवटी त्यात काँम्प्युटर जिंकला. गेली ४ वर्षे आय बी एम कंपनीतील सायंटिस्ट या प्रकल्पावर काम करत होते.

माणसाचा मेंदू ही त्याला मिळालेली सगळ्यात मोठी देणगी आहे. अजून तो आपल्याला पूर्ण समजलेला नाही. मेमरी मध्ये गोष्टी साठवणे आणि त्या परत आठवणे हे आपण सतत करत असतो. समोरच्याने विचारलेला प्रश्न समजाउन घेउन त्याला उत्तर देणे हे आपण सतत सहज करत असतो. हे सगऴे कसे होते ते सांगता येत नाही.

या सगळ्या गोष्टी मशिन ला शिकवून त्याला हा गेम खेळायला लावायचा विडा सायंटिस्टनीउचलला. नुसती माहिती साठवणे हे सोपे काम होते पण अँनालिसिस करणे अवघड काम -- परत वेळेचे बंधन होतेच. आय बी एम च्या फाउंडर चे नाव वाँटसन या मशिन ला दिले गेले. पहिल्यांदा नियम लिहिले गेले. भाषा शिकवली गेली. विचारलेल्या प्रश्नातील की वर्ड् शोधून त्याचे रेफरन्स शोधले गेले. (साठवलेल्या माहितीत हा शब्द कुठे आहे ते शोधून) या सगळ्यातून बरीच उत्तरे निघत असत. मग त्यातले जे उत्तर जास्त पुरावे देत असेल(जास्त ठिकाणी वापरले असेल) ते फायनल आन्सर दिले जाउ लागले. या सगळ्या गोष्टी मिलीसेकंदात होतात.

्सुरूवातीला जेपर्डीचे चे प्रश्न मेमरीत साठवले गेले. बायबल, मूव्ही लिटरेचर हिस्टरी ही सगळी माहिती साठवली गेली. एखादे अक्षर जर आपण मेमरीत घातले समजा क तर ते पुरेसे नाही. ते अक्षर इतक्या प्रकारे लिहिता येते की सगळे आपण साठवू शकत नाही. अशा वेळेस उदाहरण म्हणून त्या अक्षराचे अनेक नमुने साठवले जातात मग काँम्प्युटर त्याचा पँटर्न लक्षात ठेवतो आणि त्याचा वापर ओळखताना करतो. (पोस्ट आँफिस मध्ये पत्ते ओळखताना ही गोष्ट लागते कारण प्रत्येकाचे अक्षर वेगळे.....) अशा तर्हेने मशिन लर्निंग च्या सहाय्याने वाँटसन जेपर्डी मध्ये भाग घ्यायला सिद्ध झाला. त्यात अनेक अडचणी आल्या. भाषा बोललेली अजून शंभर टक्के काँम्प्युटरला कळत नाही म्हणून टेक्स्ट मेसेज ने प्रश्न विचारायला परवानगी दिली.

शेजारी चुकीचे उत्तर देत असेल तर ते काँम्प्युटर ला कळत नसे. मग एकदा ऐकल्यावर त्याला ते कळू लागले. कोड्याच्या भाषेत विचारलेलेले प्रश्न अजून नीटसे कळत नाहीत. काँम्प्युटरला इंटरनेट वापरायला परवानगी नाही मग प्रेफरन्सेस व एव्हिडन्स वापरून उत्तरे फायनल होउ लागली. हळूहळू या सुधारणा करत शेवटी काँम्प्युटर ने माणसावर मात केली.बरोबर भाग घेणारे तितकेच हुशार होते. हे सगळे पाहून जर प्रोग्रँम पाहिला तर त्या सायंटिस्टची कमाल वाटते

मला कधी सायन्स फिक्शन सिनेमातील गोष्टी घडतील असे वाटत नाही पण आर्टिफिशिअल इंटिलिजन्स मधले हे काम पाहिल्यावर त्या गोष्टी सत्यात यायला फार दिवस राहिले नाहीत असे वाटायला लागले आहे. कदाचित आपण जे एलिअन म्हणतो ते असेच असतील.....

Wednesday, September 7, 2011

डोअर काउंटी - डेथ डोअर

डोअर काउंटी - डेथ डोअर



या लेबर डे ला विस्कांन्सिन मध्ये डोअर काउंटी ला गेलो होतो. विस्कांन्सिन मध्ये ग्रीन बे पासून एक बोटासारखा फाटा लेक मिशिगन मध्ये गेला आहे, डावीकडे ग्रीन बे, स्टर्जन बे असे २-४ बे आहेत. वाँशिंग्टन आयलंड पाशी हे सगळे लेक मिशिगन ला मिळतात. इथे पाण्याचा करंट जास्त असल्याने पूर्वी इथे जहाजे बुडत व या ठिकाणाला डेथ डोअर असे म्हणत.  यावर उपाय म्हणून बरीच लाईट हाउसेस बांधली गेली व हा प्रकार थांबला.

या एरिआत खूप प्रायव्हेट प्रीँपर्टीज आहेत. बरीच घरे रहाण्यासाठी भाड्याने देतात.  दरवर्षी येणारे लोक खूप आहेत. अगदी पाण्याच्या जवळ घरे आहेत. बोटी, कयाक, मोटरबोट, सेल बोट, फिशिंग बोट भरपूर दिसतात. ५-६ स्टेट पार्कस असल्याने हायकिंग, बायकिंग याचे बरेच ट्रेल्स आहेत. झाडी अगदी पाण्यापर्यंत आहे त्यामुळे निळा व हिरवा या रंगांच्या खूप छटा दिसतात. हायकिंग करताना बरेचदा एकीकडे पाणी व एकीकडे झाडी त्यामुळे मस्त वाटते.  पेनिन्सुला स्टेटपार्क मध्ये आम्ही २ तास हायकिंग केले.  यात एका बाजुला पाणी व एका बाजूला हिल आहे. हवा पण मस्त होती. भरपूर हिरवी झाडी व निळेशार पाणी .. डोळे एकदम तृप्त होतात. वाटेत उंच क्लिफ्स लागतात. यातूनच
क्लिफ्स
पूर्वी एक दगडाची खाण काढली होती पण ती आता बंद केली आहे.


हे क्लिफ्स Niagara escarpment चा भाग आहेत. (साधारण  नायागारा पासून इलिनांय पर्यंत हे खडक पसरलेले आहेत). त्याचे फार इरोजन होत नाही. त्यामुळे बरीच झाडे व इको सिस्टीम जपली गेली आहे.  या खडकांचा काही भाग पाण्याखाली पण आहे.  या खडकामुळे या एरिआत बरेच धबधबे दिसतात.  या सगळ्या गोष्टी पुस्तकात वाचण्यापेक्षा अशा प्रत्यक्ष पाहून छान वाटतात.
फिश बाँईल - ही जागा लेक च्या काठी असल्याने फिश भरपूर.  पूर्वापार चालत आलेली यांची ही एक खाण्याची परंपरा आज बिझिनेस मध्ये बदलली आहे. कांदे बटाटे व व्हाईट फिश एका मागोमाग मोठ्या भांड्यात उकळतात. १० मि त फिश तयार होतो व त्यातील चरबी बाहेर यायला लागते. या नंतर केरोसिन जाळात ओततात, त्यामुळे एकदम टेंपरेचर वाढते व सगळी फँट बाहेर येते. या साठी व्हाईट फिश वापरला जातो. हा ४० डिग्री तापमान आवडणारा फिश आहे त्यामुळे तो उन्हाळ्यात खूप खोल पाण्यात जातो. काटेही भरपूर असतात. ही जी काही फँट निघून जाते त्याची भरपाई वरून भरपूर बटर घालून करतात.  नंतर चेरी पाय ची स्वीट डिश असतेच.

सेल बोट - इथे सेल बोटी खूप दिसतात. बरेच लोक हा धंदा करतात. सुरूवातीला मोटर वर पाण्याच्या आत साधारण १५-२० मिनिटे घेउन जातात. मग मोटर बंद करून शिडे उभारतात. वारा जसा असेल त्याप्रमाणे शीड हलवतात. हा अनुभव खूप छान होता. नुसता वारा किती जोरात बोट नेउ शकतो याचा अनुभव घेता आला. कँप्टन पण छान होता. हे सगळे प्रकरण एरो डायनँमिक्स च्या तत्वावर चालते. शिडाचा वापर विमानाच्या पंख्यासारखा होतो. खूप वारा असला तर त्या नुसार शिड खाली वर करता येते.  काही वेळा बोट इतकी तिरकी होते की भिती वाटते पण खाली ८००० पाउंडाचे किल लावलेले असल्याने बोट उलटायचा चान्स कमी असतो. मला त्या कँप्टन ने सांगेपर्यंत कल्पनाही नव्हती की खाली एवढे वजन लावले आहे.  हा सगळा अनुभव घेतल्यावर पुन्हा एकदा आपल्या पूर्वजांचे कौतुक वाटल्याशिवाय रहात नाही. त्याकाळी विशेष साधने नसताना लोक किती धाडसाने समुद्र सफरी करायचे.

चेरी स्पेशल - डोअर काउंटी मध्ये चेरी भरपूर होतात. त्याचे सगळे प्रकार पाय, जँम, सालसा व वाईन बनवतात. त्या नंतर सफरतंदाचा सिझन असतो. या प्रदेशात चीजही भरपूर बनते.  या सगळ्या बागांच्या टूर्स अरेंज करतात व तुम्हाला जवळून सगळ्या गोष्टी बघता येतात.  सगळाकडे लोकल बिझनेसेस ला वाव दिला आहे त्यामुळे नेहमीच्या चेन्स दिसत नाहीत.  लोक छान फ्रेंडली होते इथले.

डोअर काउंटी ला झाडी भरपूर असल्याने फांल कलर्स अर्थातच सुंदर असतात. पाणी, कडेने झाडी व थोडेसे डोंगर यामुळे फाँल ला इथे गर्दी असते. वाँशिंग्टन आयलंडला फेरी ने जाता येते. ते एकदम टोकाला आहे. तिथून ३६० व्ह्यू मस्त दिसतो. ३-४ ठिकाणी रात्री  नाटकांचे शो होतात.

एकंदरीत डोअर काउंटी चा अनुभव छान होता....

Friday, August 19, 2011

मला बसलेले सांगितीक धक्के.....

मला बसलेले सांगितीक धक्के....

मला कर्नाटकी संगीत विषेश आवडत नाही. (कमी ऐकलेले आणि कळत नाही हे खरे) . जास्त हिंदुस्थानी ऐकलेले. राग संगीत हे आपले वाटते. हे राग गुरू शिष्य परंपरेतून पुढे आले हेही माहीत होते. अगदी सामवेदापासून गायनाचा उल्लेख केलेला आढळतो. काही वर्षापूर्वी एक लेक्चर ऐकले...संगीताच्या इतिहासावर आणि त्याच्या वाटचालीवर तेव्हा कळले की हिंदुस्तानी पेक्षा कर्नाटक संगीत जास्त ओरिजिनल आहे. त्यात कमी बदल झालेत. हिंदुस्तानी संगीतावर मुस्लीम व पर्शिअन प्रभाव जास्त आहे. त्यातल्या त्यात ध्रुपद धमार वाले परंपरा जपत आहेत. पण ध्रुपद पेक्षा लोकांना आता ख्याल बंदिशी जास्त आवडू लागल्या.

आपल्यकडे गुरू शिष्य परंपरेने गाणे शिकवले जाते. नोटेशन पूर्वी करत नसत. जेव्हा हिंदुस्थानावर आक्रमणे झाली आणि मुगलांचे राज्य आले तेव्हा राजा म्हणेल ती दिशा या न्यायाने गाणे बदलत गेले, अरबी, फारसी इराणी यांचा प्रभाव पडला आणि आपले गाणे डिमांड नुसार बदलले. चांगली गोष्ट एवढीच की ते टिकले लयाला गेले नाही. जेव्हा कला टिकवायला लोकांकडे पैसे नसतात तेव्हा तडजोड करावी लागतेच. या तडजोडी पायी एवढे बदल करावे लागले हे माहीत नव्हते. का कुणास ठाउक मुस्लीमांच्या दयेवर या कला पुढे टिकल्या हे जरी खरे असले तरी त्यातला झालेला बदल धक्कादायक होता.

आपल््यापैकी बहुतेकांना नाट्यसंगीत मनापासून आवडते. त्याला शास्त्रीय संगीताचा पाया असतो. गाणारे पण चांगले होते.
शब्द चांगले असत. परवा बालगंधर्व सिनेमाचा एक प्रोमो पाहिला आणि मला दुसरा धक्का बसला. खाली दिलेली लिंक याचे स्पष्टीकरण देईल. बरीच नाट्यगीते जुन्या बंदिशीवर आधारित आहेत. आठवणीतली गाणी या लिंकवर नाटके या सदरात काही गाण्यांच्या खाली उल्लेख आहे. यातून झाला तर पुढील पिढीचा फायदाच झाला आहे पण मला का कुणास ठाउक ही गाणी अगदी ओरिजिनल वाटत. काही बंदिशीवर आधारित होता हे माहित होते पण एवढ्या प्रमाणात...जरा पचवायला अवघडच गेले. http://www.youtube.com/watch?v=nCU6PfOqMbA&NR=1

ही लिंक पहा...

आता त्या काळी शास्त्रीय संगीताला जेव्हा वाईट दिवस आले होते तेव्हा ते वाचवण्याकरता बंदिशींचा आधार घेतला गेला असे म्हणतात. त्यामुळे शास्त्रीय संगीत सामान्य लोकांपर्यंत पोचले पण आणि आणि टिकले पण.

हे सगळे जरी खरे असले तरीसुद्धा जेव्हा अगदी सही न सही चाल काँपी होते (कुठल्याही भाषेतली) तेव्हा वाईच वाटतेच. आपण नवीन पिढीतल्या काही संगीतकारांना म्हणतो अरे काय चाली चोरतात ...सेम गाणी काँपी करतात म्हणून. आता तुम्ही म्हणाल ती गाणी अगदी फालतू असतात त्याला शास्त्रीय पाया नसतो तरी प्रकार तोच ना......

मराठी लिखाणात पण हा प्रकार खूप आढळतो... त्याबद्दल परत कधीतरी..........


Sunday, July 24, 2011

बी एम एम म्हणजे काय रे भाउ

बी एम एम म्हणजे काय रे भाऊ.....

बी एम एम म्हणजे भरपूर मराठी माणसे ... बी एम एम म्हणजे बाहेरची मराठी माणसे .... किंवा बी एम एम म्हणजे जत्रा अशी ३ उत्तरे आज क्लोजिंग सेरिमोनीत ऐकली. २१ ते २४ जुलै २०११ शिकागो येथे बृहन महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन संपन्न झाले. वरील तीनही व्याख्या खरे ठरवणारे हे संमेलन होते. संपन्न या शब्दाला साजेसा व्हेन्यू मॅकाॅरमिक प्लेस, संपन्नता दाखवणारे रोजचे मेन्यू आणि अभिरूचिपूर्ण असे कार्यक्रम इथे अनुभवायला मिळाले.

आमचा अधिवेशनाचा हा पहिलाच अनुभव. ३५००-४००० लोकांच्या उपस्थितित कार्यक्रम बघायला मजा आली. मला भारतातील कार्यक्रम बघण्यात जास्त इंटरेस्ट होता. नाटक व सारे गा मा वाल्यांना व्हिसा न मिळाल्याने ते लोक आले नाहीत. त्यामुळे जरा निराशा झाली. पण इतर कार्यक्रमही छान होते.


खानपान व्यवस्था अतिशय चांगली होती. फार वेळ थांबावे लागत नव्हते. पदार्थ भरपूर आणि व्हरायटीही खूप होती. जरा खाण्याचे जास्त लाड झाले म्हणायला हरकत नाही. स्वयंसेवकांचे कौतुक. चहा पुरवणारे थकले असतील इतका खप होता.







कार्यक्रम बरेच ओव्हरलँप होत होते. आणि उशीरामुळे काही भाग बुडत होते. सगळ्यात हाउसफुल झालेला कार्यक्रम म्हणजे मराठी बाणा..... सेट अप्रतिम. तो भारतातून आणणे हे मोठे काम होते. यातील कलाकारांची एनर्जी दाद देण्यायोग्य. आपण इथे जसे शो बघतो त्याची आठवण होते. लोकसंगीत आणि नृत्य याची मेजवानी ... या कार्यक्रमासाठी व्हाँल्यूम मात्र फार मोठा ठेवतात..भारतातही हाच अनुभव होता तो थोडा कमी ठेवला तर यातील लज्जत कमी होणार नाही हे नक्की. आणि लाईटस चा वापर थोडा कमी केला असता तर बरे वाटले असते. या कार्यक्रमासाठी बरेच लोक मदतीला पुढे आले ..काँसमाँस बँंकेने केलेली मदत कौतुकास्पद. डाँलरच्या हिशोबात मदत करणे नक्कीच सोपे नाही. अशीच मदत भारतातही करावी. (हे चित्र मोठे करून जरूर पहा). या एका कार्यक्रमासाठीच इतके पैसे घालवावेत का असाही विचार बरेच लोकांच्या मनात आला असणार.

सा रे गा मा च्या जागी आयत्या वेळेस अमारिकेत आलेले कलाकार आणि वादक यांचा गाण्याचा कार्यक्रम छान झाला. शंकर महादेवन ने रसिकांची मने जिंकली. गणनायकाने सुरूवात करून मन उधाण ,बगळ्यांची माळ फुले, मेरी माँ, अशी गाणी पाठोपाठ गाउन लोकांना खूष केले. अभंग ही म्हटला आणि शेवटी हरीनामाच्या गजरात सर्व श्रोत्यांना सामील करून घेतले. राम कृष्ण हरी हा गजर त्याने निदान २५ वेगळ्या प्रकारे तरी लोकांकडून गाउन घेतला. त्याच्या मुलाने १८ व्या वर्षी एका मराठी चित्रपटाला संगीत दिले आहे. त्यानेही अमराठी असून मराठी गाणे म्हटले हे पाहून मजा वाटली. सर्वात शेवटी सध्याचे सिनोरिटा ही गायले. बच्चे कंपनीला स्टेजवर बोलावून नाचायचा चान्स दिल्याने ती खूष..आता यात मार्केटिंगचा भाग जरी असला तरी प्रेझेंटेशन मस्त. (त्याने आँनलाईन म्युझिक स्कूल चालू केले आहे. ). आयत्या वेळेस जुळवाजुळव करून हा कार्यक्रम मस्त झाला.

गाण्याचा अजून एक कार्यक्रम प्रेक्षकांनी उचलून धरला तो नमन नटवरा. शेवटी इतकी गर्दी झाली की मंडळी जमिनीवर बसून गाणी ऐकत होती. मंजु।ा पाटील यांची खड्या आवाजातील व आनंद भाटे यांची गोड गाणी दाद मिळवून गेली. शेवटचा जोहार जोरदार.

पु लं च्या लिखाणावर आधारित गोतावळा सुरूवातीला चांगला वाटला मग इतका लांबला की कंटाळवाणा झाला. शेवटचा क्लोजिंग सेरीमनी पण लांबला. त्यामुळे स्किट व नाच बघायचा पेशन्स कमा झाला व मंडळी हळूहळू बाहेर पडायला लागली. आता लावणी नको अशी परिस्थिती झाली अशामुळे कलाकारांच्या मेहनतीवर पाणी पडते हे नक्की. आमच्या गावातल्या ग्रुपची स्किट चांगली झाली पण थोडे लहान असते तर जास्त चांगले झाले असते. ताजमहालसाठी जागा बघायला शहाजहान पुण्यात जातो तेव्हा पुणेरी माणसाकडून त्याला मिळालेले सल्ले हा एक विषय होता. एन आर आय मुलगा लग्नासाठी मुलगी बघायला कोकणात जातो असा दुसरा विषय होता. पुढच्या अधिवेशनात प्रेक्षकांच्या क्षमतेचा विचार होणे गरजेचे आहे.

ओपनिंग सेरीमनी तील काही भाषणे छोटी असती तर लोकांना जास्त आनंद घेता आला असता. द जर्नी हा कार्यक्रम प्रेक्षकांची दाद मिळवून गेला. त्यातील शेवटचा नाच उल्लेखनीय.

मीना प्रभू यांची मी फँन आहे त्यामुळे त्यांचा कार्यक्रम पाहिला. भेटही घेतली. त्यांची पुस्तके वाचून नेहेमी मनात येते की त्यांनी भारतावरही लिहावे. एखाद्याला जर भारतावर असे प्रवासी पुस्तक द्यायचे झाले तर आपल्यकडे नाही. ही गोष्ट त्यांच्या कानावर घातली, तेव्हा त्या म्हटल्या, पेपर मासिक यातून सतत लोक लिहित असतात, म्हटले ते वेगळे तुमचे लिखाण वेगळे, त्यावर बघू लिहूयात असे म्हटल्या ...बघूया वाट .... वाट तिबेटची हे त्यांचे नवे पुस्तक -- आपल्या आवडत्या लेखिकेच्या तोंडून पुस्तकाबद्दल ऐकणे...मजा आली आणि तिबेटला जावे असे वाटायलाही लागले. मीना ताईंनी ब्रेल मधून पुस्तक काढून ज्यांना कधी प्रवासाचे सुख मिळत नाही त्यांना पण तो आनंद दिला आहे.

दुसरीकडे शोभा डे यांचा नउवारी ते अरमानी हा कार्यक्रम ही छान झाला. त्यांच्यातल्या लेखिकेचा प्रवास यात दाखवला होता. या वयातही त्या अत्यंत ग्रेसफुल आहेत. उभ्या उभ्या विनोद हा प्रयोग ही हाउसफुल होता. लहान मुलांची सोय चांगली बघितली होती.

स्वरांगण ची स्पर्धा ही छान झाली. गाणारे छान होते त्यामुळे मजा आली. समीप रंगमंच चीएक एकांकिका पाहिली. वेळेअभावि बाकीच्या बघता आल्या नाहीत. अमेरिकातील लोकांचे उभ्या उभ्या विनोद व इतर अनेक कार्यक्रम न बघता मी भारतातल्या कार्यक्रमांवर भर दिला. बहुतेक सर्व कार्यक्रमांना उपस्थिती चांगली होती हे विशेष नमूद करण्यासारखे. आणि खरादीलाही वाव बराच होता. पुस्तके, दागिने, ज्युवेलरी व कपडे उपलब्ध होते. शेवटच्या दिवशी खरेदी केल्यास चांगला डिस्काउंट मिळतो याचा अनुभव घेतला .

आता काही खटकलेल्या गोष्टी..... यातील कुठलाही कार्यक्रम वेळेवर सुरू होत नव्हता कारण आधीचा वेळेवर संपत नव्हता. वाटेत चहा दिसला की तो सोडायचा कसा.....्प त्यामुळे उशीर....मग काही कलाकारांना कमी वेळ मिळाला. गाण्याच्या कार्यक्रमात कलाकार आल्यावर साउंड सेटिंग झाले ते आधी करून ठेवायला हवे होते. काही लोकांची भाषणे इतकी लांबली की बस.....यावर काहीतरी कंट्रोल हवा ..एकदा माईक हातात आला आणि समोर प्रेक्षक दिसले की मंडळी सुटतात....त्यामुळे इतरांवर अन्याय होतो हे लक्षात घेतले पाहिजे. पुढील अधिवेशनात या गोष्टींचा जरूर विचार व्हावा. सगळ्यांनाच सुखाचे होईल. आपण नेहेमी स्वयंपाक करताना सगळे पदार्थ भरपूर करतो तसेच इथे प्रत्येक कार्यक्रम भरगच्च होता मग भाषण असो की स्किट असो संयोजकांनी व कार्यक्रम बसवणारे यांनी जर थोडा हात राखून कार्यक्रम बसवले तर सगळ्यांनाच चांगले रूचतील व पचतील.कार्यक्रम रहित झाले तर ते - भारतातले अथवा लोकल तिकीट घेतलेल्यांशी शेअर करावे....शेवटपर्यंत सस्पेन्स ठेवू नये. कार्यक्रमाचे वेळापत्रक वेळेत द्यायला हवे.

तरूण वर्गासाठी व मुलांसाठी ही वेगळे कार्यक्रम होते. त्यांना अजून मेन कार्यक्रमात भाग घ्यायला लावले तर ते जास्त इनव्हाँल्व्ह होतील.

पण एकंदरीत आमचा अनुभव चांगला होता. संयोजक आणि स्वयंसेवक यांचे श्रम कारणी लागले. त्यांचे अभिनंदन.
अनेक लोकांना कार्यक्रम बसवणे, ग्रुप संयोजन याचे शिक्षण ही मिळाले. पुढील अधिवेशनाला जावे असे वाटणारा नक्कीच होता.

Thursday, July 7, 2011

बरखा....

बरखा....

नुकताच बरखा हा गाण्याचा कार्यक्रम आमच्या स्थानिक कलाकारांनी सादर केला. यात मल्हार रागाची ओळख करून दिली होती. हा मल्हार वेगवेगळ्या रूपात बरसला...कधी मिया मल्हार, कधी मेघ रूपात, तर कधी गौड मल्हार बनून. या रागाच्या बंदिशी मधून त्याच्या स्वभावाची ओळख झाली तर त्या रागावर आधारित सिनेमातील गाण्यामुळे सगळ्याना तो आपल्यातलाच वाटू लागला.

बहुतेक सर्व कलाकार शिकत असल्याने त्यांना या कार्यक्रमातून अजुन बरेच काही शिकायला मिळाले.

मिया मल्हार - हा तानसेन चा म्हणून ओळखला जातो.


भय भंजना.....http://www.youtube.com/watch?v=T8f7mQifcOo - भक्ती गीत

बोले रे पपीहरा.... http://www.youtube.com/watch?v=FZltu1Qz7O0 - सिने गीत

मेघ -http://www.youtube.com/watch?v=tq2bPHNBRaA - गरजे घटा बंदिश

घनघनमाला नभी दाटल्या...http://www.youtube.com/watch?v=dmKlUABn_vs

जन पळभर म्हणतील हाय हाय.....http://www.youtube.com/watch?v=F0n78oRqU8g भा रा तांबे कविता

आज कुणीतरी यावे.....http://www.youtube.com/watch?v=EgOt1m4-w9Q मुंबईचा जावई

कहासे आए बदरा....http://www.youtube.com/watch?v=WmJ1Zm59CAM चश्मे बद्दूर

मेहफिलमे बारबार...http://www.youtube.com/watch?v=PQb1PNrDN0s गझल

कुहु कुहु बोले कोयलिया.... http://www.youtube.com/watch?v=XD2ppdufP-g
रागमाला वापरून हे गाणे केले आहे. सोहनी, जौनपुरी, मल्हार व यमन राग यात वापरले आहेत. गाणारे व वाजवणारे दोघानाही यात चँलेँज असतो कारण दर कडव्याला सूर बदलत असतात.

गौड मल्हार -http://www.youtube.com/watch?v=9rtsa_wcyvI मान न करिये बंदिश

नभ मेघांनी आक्रमले... नाट्यगीत

गरजत बरसत सावन आयो रेhttp://www.youtube.com/watch?v=XOJrefVKMYc


या कार्यक्रमाची संकल्पना आणि सादरीकरण होते समीर चे. व्हिडिओ चे नेटके शूटिंग केले अमृताने. या साठी व्हाँलेंटिअर कार्य बरेच होते. प्रेक्षकांनी कार्यक्रमाला दिलेली पसंती ची पावती कलाकारांना नक्कीच प्रोत्साहित करुन गेली.

आपली कामे संभाळून शिकता शिकता केलेला हा उपक्रम नक्कीच छान वाटला.

Thursday, June 23, 2011

चौथा कोपरा....

चौथा कोपरा..

अमेरिकेत आल्यापासून निसर्गाची वेगवेगळी रूपे बघितली. गेल्या आठवड्यात ् व्हरमोँंट ला मुलीच्या ग्रँज्युएशन
ला गेलो होतो. तिथून yetana अकेडिया पार्क ला भेट दिली. हे पार्क मेन मध्ये आहे. तिथे गेल्यावर लक्षात आले की याआधी तीन कोपरे बघितले आणि आता हा चौथा कोपरा. अलास्काचे ग्लेशिअर्स, हवाई चा ज्वालामुखी आणि प्रशांत महासागर, वेस्ट चे सुंदर निळे पाणी आणि गल्फ आंफ मेक्सिको शेवटी आता बार हार्बर वरून एटलांटिक चे ँ. प्रत्येक ठिकाणचे सौंदर्य वेगळे निसर्ग वेगळा - अर्थात चारीही कोपरे आपल्या जागी सुंदर

बार हार्बर मध्ये अकेडिया पार्क आहे. ही जागा खूप मोठी नाही पण छान आहे. भरपूर हायकिंग ट्रेल्स, लूप रोड, कँडिलँक माउंटन आणि फिश ईंडस्ट्री ही इथली वैशिष्ट्ये. पूर्वी याला माउंट डेझर्ट म्हणत कारण पहिल्यांदा जे लोक आले त्यांना एकदम ओसाड भाग वाटला, झाडे दिसली नाहीत. सुरूवातीला फ्रेंच लोक इथे जास्त आले. त्यातील एकाने आपले नाव या डोंगराला दिले. या भागात रांकफेलर, जे पी मांर्गन यांची भरपूर इस्टेट आहे. मोठे मँन्शन्स आहेत.







जाताना मस्त झाडीने भरलेला रस्ता आहे. दोन्ही बाजूना झाडांच्या भिंती उभ्या आहेत असे वाटते.









इथला पिंक ग्रँनाइट प्रसिद्ध आहे. सुरूवातीला आर्टिस्ट या जागेच्या प्रेमात पडले..त्यांनी इथली चित्रे काढून लोकांना दाखवली व हळूहळू लोक इकडे येउ लागले - साघारण १८०० चा सुमार. हे क्लिफ्स मस्त दिसतात. सन सेट च्या वाळेस रंग अजून सुंदर दिसतात. हा फोटो थंडर होल चा आहे. इथे पाणी खडकात बरेच आत घुसते व पूर्ण भरल्यावर जोरात बाहेर येते. ४० फूचापर्यंत वर पाणी उडते. इथे धुके, मिस्ट व थोडा पाउस अधून मधून आसतोच. नसेल तेव्हा पाणी मस्त निळे दिसते.




कँडिलँक माउंटन १५०० फूट उंच आहे. त्यावर हाइक करता येते किंवा वरपर्यंत गाडीने जाता येते. व्हिजिबिलिटी नसेल तर वर जाण्यात अर्थ नाही..वरून काही दिसणार नाही. वर्षातले काही दिवस इथे सूर्यकिरणे सगळ्यात आधी पडतात म्हणून सनराइज बघण्याचे महत्व. खालती बेटे,अथांग समुद्र व छोटी बेटे छान दिसतात. रस्ता छान आहे. वरती एक छोटा ट्रेल आहे. वाटेत १-२ लेक्स दिसतात. पूर्वी जे फ्रेंच सेटलर्स आले त्यातल्या एकाने आपले नाव या डोंगराला दिले. कँडिलँक गाडीच्या एम्ब्लेम मद्ये जे शिल्ड दिसते ता या फ्रेंच लोकांच्या लढाईचा आठवण म्हणून आहे.




इथे लोँबस्टरचा मोठा व्यवसाय चालतो. लोकांना कोटा दिलेला असतो. त्यावर भांडणेही होतात. पकडलेल्या तील ठराविक फिश च वापरता येतात बाकीचे परत टाकावे लागतात.
फिश खाणारे इथे खूष होतात.
गुड कोलेस्टरोँल देणारा फिश म्हणून खूप डिमांड असते. त्याबरोबर क्रँब ही भरपूर मिळतो. इतर फिश ही मिळतात.







मेन हे स्टेट लाइट हाउस साठी प्रसिद्ध आहे. या पार्क मघ्ये एक टूर आहे ते बरीच लाइट हाउस दाखवतात. बास हार्बर इथले लाईट हाउस मात्र जवळून बघता येते. ते साउथ वेस्ट साइड ला आहे. त्याच्या बाजूला बरेच पिंक ग्रँनाइट चे खडक आहेत. समोर अथांग सागर. खूप छान दिसते. पाण्यात मोठ्या बेल्स लावलेल्या आहेत. धुक्यामुळे कधी कधी लाईट दिसत नाही तेव्हा या बेल्स चा उपयोग होतो.

बोट टूर मध्ये ५-६ लाईट हाउस दिसतात. ती बोटीतून बघावी लागतात.















सुटीचे ३-४ दिवस घालवायला छान जागा आहे. हाइक साठी वेळ जरूर ठेवा. कयाक, कनू व बोटिंग पण करायची सोय आहे. गाईडेड टूर घेतल्यास माहिती छान देतात.
(फोटो क्तिक केल्यास मोठे बघता येतील)

Friday, May 27, 2011

तो अर्धा तास

तो अर्धा तास,

अमेरिकेत जिथे बर्फ पडतो तिथे स्प्रिंगची सुरूवात होते तेव्हा झाडांना छान पालवी फुटते, सगळीकडे फुले दिसायला लागतात, जरा थंडीपासून सुटका होते. एकदम वातावरण प्रसन्न असते. सगळी मंडळी बागकामाला लागतात, नवीन झाडे लावणे, लांन ला खतपाणी, वगैरे. या सगळ्याबरोबर थंडरस्टांर्म्स व टोर्नंडो यांना पण सुरूवात होते. कडाडणारी वीज आणि मुसळधार पाउस लहान मोठ्यांना घाबरवतो. वारा इतक्या जोरात वहातो की बास, कौलावर त्याचा इतका आवाज येतो की काही वेळा झोप लागत नाही. ठी व्ही वर सतत माहिती देतात. रेडिओवर पण हवामान सतत सांगितले जाते...

यावर्षी मिडवेस्ट मध्ये खूप टोर्नंडो झाले. आता हे टोर्नंडो का होतात याबद्दल बरीत माहिती देतात पण अजून नक्की सांगता येत नाही. आणि त्याला थांबवता पण येत नाही. गेल्या महिन्यात जे २-३ टोर्नंडो झाले त्यात बरीच जिवित हानी झाली. सूचना मिळाली असताना काहीनी लक्ष दिले नाही तर काही ठिकाणी नशिबाने साथ दिली नाही असे म्हणावे लागेल. मिझोरी मध्ये १५० च्या वर माणसे मेली. टी व्ही लावला की सतत तेच चित्र .... घरांचे तुकडे झालेले, झाडे मूळापासून उखडलेली, रस्त्यावरचे ट्रक्स उलथून पडलेले. हे सगळे घडते १० मिनिटात.... या वादळात इतका जोर असतो की गाड्या,घराचे भाग उडून ३-४ मैल जाउन पडतात. माणसे,गाड्या,झाडे, जे त्याच्या मधे असेल ते सगळे नष्ट होते.

यानंतर जीवन थांबत नाही. लोक ेकमेकांना मदत करतात. घरे उभी रहातात आणि सगळे पुढे चालू होते. अशी वेळ सारखी येत नाही पण या सिझन मध्ये ३-४ वेळा तरी ही वेळ येतेच.

परवा आमच्या गावात पण ही परिस्थिती आली. आधी जोरदार वादळ, पाऊस आणि मग एकदम सगळे शांत.... वादळापूर्वीची शांतता म्हणजे काय याचा प्रत्यय आला. एकदम सगळे वातावरण सुन्न झाले होते. एकीकडे आम्ही रेडिओ ऎकत होतोच. फनेल क्लाउड दिसला होता. वेदर चंनेल वाले अगदी त्याचे वर्णन करत होते. आणि टचडाुन झाला, लगेच सायरन वाजला आणि आम्ही बेसमेंट मध्ये जाउन बसलो- तिथे धोका कमी. जवळ टांर्च, रेडिओ व फोन....पुढचा अर्धा तास तिथे बसलो होतो. मनात विचारांची गर्दी..ठी व्ही वर नुकतीच पाहिलेली वाताहात....आपलेही असेच होईल का.... हे सगळे लावलेले घर २ मिनिटात अस्ताव्यस्त होईल का....आपणच या अर्ध्या तासानंतर जिवंत असू का....पुढचे प्लंन्स, ठरवलेल्या गोष्टी सगळे धूसर दिसू लागले. यावर कुणाचा कंट्रोल नाही.....टी व्ही वर बघणे वेगळे आणि प्रत्यक्ष स्वतावर वेळ येणे यातला फरक चांगला कळतो अशावेळी. जीवन हे किती क्षणभंगूर आहे आणि आपल्या आयुष्याची दोरी या निसर्गाच्या कशी हातात आहे याचा पुरेपुर अनुभव घेतला या अर्ध्या तासात.....

Wednesday, April 20, 2011

मेहिको - एक बघण्यासारखा देश


मेहिको - एक बघण्यासारखा देश

आपण प्रवासाला जाताना बरेच वेळा ऎकीव माहितीवर जात असतो. कुणीतरी बघून आले की त्यांच्या अनुभवावरून किंवा पुस्तके वाचून आपण आपले मत ठरवतो. अमेरिकेत आल्यापासून मेक्सिकन लोक आणि त्यांचा देश याबद्दल नेहेमी वाईट ऎकत आले. इथे मेक्सिकन लोक नेहेमी खालची कामे करताना दिसतात हे त्याचे कारण असू शकेल. गरिबी, चोरी, ड्रग्ज अशा संदर्भात सतत हा देश येतो. परत बेकायदेशीर इमिग्रेशन मध्ये हे अग्रेसर. कानकुन बद्दल मात्र चांगले ऎकलेले. आणि माया कालखंडातले काही जुने अवशेष आहेत हे ऎकले होते. त्यामुळे हे देश नाही बघितला तरी चालेल असे वाटत होते, तेेवढ्यात मेक्सिकोपर्व हे डाँ मीना प्रभूंचे पुस्तक वाचण्यात आले आणि माझे मत बदलले. मी त्यांची सगळी पुस्तके वाचली आहेत आणि बरीच ठिकाणे पाहिली आहेत. त्या खूप डिटेल मध्ये देश बघतात व छान माहिती देतात.


या देशावर स्पंनिशांनी आक्रमण करेपर्यंत खूप संस्क्रति नांदल्या. आपल्यासारखाच इथे १८०० ला स्वातंत्र्य लढा सुरू झाला. धर्माच्या नावावर लोकांना वाकवले, परकियांनी सत्ता व संपत्ती भरपूर उपभोगली. नंतर जेव्हा उत्खननात जुन्या गोष्टी सापडल्या त्या मात्र जतन केल्या आहेत व त्यावर टूरिझम चालतो आहे. गरिबी, बेकारी आहे पण झोपडपट्ट्ी बकालपणा कमी आहे. या देशाने मका, कोको, मिरची, तंबाकू,च्युइंग गम,रबर दिले. भाषा उच्चार अवघड- नऔवात्ल भाषेत त्ल हे अक्षर फार येते लेखिकेला भाषा येत नसताना ती एकटी फिरू शकली हे विषेश. इतिहास चांगल्या प्रकारे या लोकांनी जपलेला दिसतोय.

मला या देशात काही गोष्टी बघाव्याश्या नक्की वाटल्या.....नकाशातील नावावरून साधारण त्या कुठे आहेत याची कल्पना येईल.
कांपर कॅनिअन - ग्रॅंड कॅनिअन पेक्षा भव्य आणि हिरवळ , अतिशय संथ आगगाडीचा प्रवास, आदिवासीना जवळून पहाता येते
मेक्सिको सिटी - मुंबईपेक्षा बरीच मोठी,ट्रॅफिक वाईट, तिसरा मोठा स्क्वेअर -झोकालो, कोर्तेस चा राजवाडा,सन, मून पिरॅमिडस, रिव्हेराची भित्तीचित्रे ,
चांदीचे साठे - व्हानाव्होता येथील सोन्याने सजलेले चर्च - तास्को चांदीची कलाकुसर,
-लेडी ग्वादालूपे कॅथिड्ील, म्युझिअम
बुलफाईट,
पुएब्ला- येथील ४०० वर्षांचे ग्रंथालय, तालावेरा पाॅटरी,
समुद्र किनारे- कानकुन, तुलुम
अकापुल्को- १५० फुटावरून उड्या मारणारे धाडसी वीर, जाएँट हेड, व्हेलता १२ फुटी जायंट हेडस
पालेके- टेंपल आॅफ इनस्क्रीपशन्स,
चिचेन इत्झा- प्रसिद्ध माया कॅलेंडर दाखवणारा पिरॅमिड

बघुया यातले काय काय बघायचा योग आहे...

Sunday, April 10, 2011

खरेच की...

खरेच की...

अाज वाढदिवसानिमित्त खूप मेल आल्या. त्यातील या मेलने लक्श वेधून घेतले. ते तुमच्याशी शेअर करते आहे.

आजकाल आकडेवारी ठेवण्याचे प्रमाण वाढले आहे. क्रिकेट असो शेअर बाजार असो वा सचिनचे विक्रम असोत सतत लोक ही माहिती जमवत असतात. असेच काहीसे २०११ बद्दल.

या वर्षात औक्टोबर मध्ये ५सोमवार, ५ शनिवार व ५ रविवार आहेत आणि हे ८२३ वर्षात एकदा घडते.

या वर्षाना मनी वर्ष म्हणतात,

तुमचे वय व जन्म वर्ष मिळवा , बेरीज १११
मी लगेच करून पाहिले -- आणि बरोबर आले तुम्हीही करून पहा.

या वर्षात १-१-११, १-११-११, ११-१-११, व ११-११-११ अशा तारखा आहेत.

मग नेहेमी प्रमाणे - तुम्ही हे ८ लोकांना पाठवा तर तुम्हाला पैसा मिळेल - आता पाठवायचे का नाही ते तुम्ही ठरवा पण ही आकडेवारी आहे मात्र गमतीची.

Wednesday, January 12, 2011

साद देती सह्याद्रीचे कडे....




साद देती सह्याद्रीचे कडे....

भारतात महाराष्ट्रात औद्योगिक प्रगति बरीच झाली आहे. रस्त्यांनी शहरे जोडली गेलेली आहेत. झाडी, जंगल हा प्रकार अगदीच कमी. सह्.ाद्री चे किल्ले,गड मात्र ताठ मानेने उभे आहेत. आजकाल व्लाॆगवर, फेसबुकवर, वर्तमानपत्रात बरेच लोक यावर लिहितात. अनुभव, फोटो व इतर माहिती बरीच दिसते. आजकाल बरीच मंडळी या सहलींचे आयोजन करताना दिसतात. तरूणाई ट्रेक कडे परत वळत आहे हे पाहून छान वाटते.

हे सगळे वाचताना असे वाटले या सगळ्यांनी एकत्र येउन एका साईटवर सगळी माहिती एकत्रित ठेवली तर किती छान होईल. बरे हे सगळे स्वानुभवातुन आलेले असल्याने रंजक तसेच माहितीपूर्ण ही असेल. ३-४ लोकांनी एकत्र येउन थोडे थोडे काम वाटून घेतले तर हे काम सहज होण्यासारखे आहे. नवीन जाणारा माणूस या अनुभवातून बरेच काही शिकू शकतो. आणि एका प्रकारे माहिती असली की चांगले वाटते. गडावर जायचा नक्की रस्ता कुठला हे माहित असावा,,,तुम्ही म्हणाल की अशा चुकण्यात मजा असते ... मान्य आहे पण काहींना ती सजा वाटू शकते. गाईडनी पैसे खूप सांगणे यावर पण कंट्रोल राहू शकतो.

मी १०-१२ गडावर गेले आहे मग देशाबाहेर राहिल्याने तिथल्या गोष्टी जास्त बघितल्या गेल्या. अमेरिकेत हिंडताना एक गोष्ट जाणवते, कितीही बारीक गोष्ट असो त्याची माहिती व्यवस्थित लिहिलेली असते. (त्याबद्दल दुमत नसते) गेल्यावर व अजून २-३ ठिकाणी नकाशा लावलेले असतो. रेंजर लोक ३-४ वेळा माहितीपूर्ण प्रेझेंटेशन देतात. अघून मघून साघ्या लाकडाच्या खांबावर पाट्या लावून त्यावर थोडक्यात माहिती दिलेली असते. भौगोलिक ऐतिहासिक महत्व लिहिलेले असते. मी काही लोकांच्या ब्लाॆगवर वाचले की काही किल्ल्याबद्दल तिथल्या लोकांनाही माहिती नसते. सरकार या गोष्टीत लक्ष घालेल अशा वाट बघण्यापेक्षा काही लोकांनी एकत्रित येउन केले तर हे काम लवकर होईल. स्पांन्सर नक्की पुढे येतील आणि तसा फार खर्च येणार नाही.

आपण बाकी गोष्टी जितक्या पटकन काॆपी करतो तसे हे ही करायला हवे. गाईडच्या बाबतीत पण गावातल्या लोकांना एकत्र करून शिकवले तर मुले छान काम करू शकतात. आम्ही रायगडावर याचा अनुभव घेतला. तिथे बाबासाहेब पुरंदरे यांनी मुलांना शिकवून तयार केले आहे. ती मुले कविता म्हणून सगळी माहिती सांगत होती. ऐतिहासिक माहिती ज्याबद्दल दुमत आहे ती लिहिणे टाळावे. शिवाजी महाराजांनी केलेले काम मोठे आहे ते महत्वाचे. डिटेल्स मध्ये तफावत असू शकते. आपल्याकडे इतिहास नीट लिहिलेला नाही .. बखरकार पण वेगवेगळे इंटरप्रीटेशन करणार त्यामुळे वादाचे मुद्दे टाळून हे काम करावे लागेल. लिहिलेल्या पाट्या खराब न करणे, त्यावर काही न लिहिणे हे हळूहळू लोक शिकतील अशी आशा ठेवायला काहीच हरकत नाही. काही गडावर आत्ता असे नकाशे आहेत पण अगदीच कमी.

काय बाहेर राहून इथल्या उचापति कशाला अशा खूप लोकाॆच्या प्रतिक्रिया होतील पण मला हे मनापासून वाटते हे खरे.

Sunday, January 2, 2011

शिक्षण असेही

शिक्षण असेही...

गेल्या दशकात भारताचे नाव आउटसोर्सिंगच्या क्षेत्रात चमकते आहे. साॆफ्टवेअर मध्ये तर भरपूर मागणी आहे. आणि त्यात आपली मंडळी ठसा उमटवत आहेत. मेडिकल, सेवा, अभियांत्रिकी या क्षेत्रातही भरपूर वाव आहे. हळूहळू त्यातही लोकांना कामाच्या संघी मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर परवा एक लेक्चर ऐकले आणि वाटले की आपण (भारतीय) लोकांना इतके काम करून देतोय आणि आपल्याकडे मात्र शिक्षणाचे आउटसोर्सिंग चालू होते का काय....

अमेरिकेत आल्यावर सुरूवातीला व्हाॆलेंटिअरिंग, फंड रेझिंग बघून मी जाम इंप्रेस झाले होते. गिव्हींग बॆक हा कन्सेप्ट खूप दिसतो. शाळेत, ओल्ड पिपल होम, बेवारशी प्राणी सांभाळणे, त्यांचे संवर्धन करणे खूप दिसते. अगदी लहान पणापासून हे शाळेत शिकवले जाते. अशातच काही सेवाभावी संस्था भारतातील शाळांसाठी मदत करताना दिसून आल्या. अगदी खेड्यापाड्यात जाउन तरूण मुले ही कामे करतात ते पाहुन कौतुक वाटते. आणि - आम्हाला काही गरज नाही, उगाच येउन कामे करतात, आजकाल कुणालाही गरज नाही, भारतात पैशाची कमी नाही... हे वर ऐकावेही लागते. अमेरिकेतून आलेल्या मदती बद्दल मी हेच जास्त ऐकले आहे. एकल विदयालय अगदी खेड्यात ३६००० एक शिक्षकी शाळा चालवते.

टीच फाॆर अमेरिका या धरतीवर टीच फाॆर इंडिया हा असाच एक उपक्रम पण त्यात वेगळेपण आहे. याची मुख्य भारतीयच आहे. पुणे व मुंबई मिळून ६५ शाळात हे लोक काम करतात. ज्या मुलीने अनुभव सांगितले ती अमेरिकन आहे. ती तिथे नोकरी करते. सरकारी शाळेत - इंग्लीश मिडिअम त्यांचा प्रयोग चालतो. प्रथम तिने सांगितले की ह्या लो इन्कम ग्रुप च्या शाळा असल्याने पालक मुलांच्या अडचणी सोडवू शकत नाहीत. तिथल्या शिक्षकांना २००० रू पगार मिळतो. बरीच मुले पाठांतर करतात व समजून न घेता शिकतात - मार्क कमी पडतात मग त्यांना शिकवणी ला पाठवतात... त्यामुळे शाळेत यायला नाखूष असतात. काही मुले यातूनही व्यवस्थित शिकतात. अशा शाळात २री ते ४ थी मध्ये १ वर्ग सिलेकट करून तिथे अमेरिकन पद्धतिने हे लोक शिकवतात नीट समजावतात, जास्त वेळ मुलांना देतात. साहजिकच मुले शाळेत जायची वाट बघतात, शाळा आवडायला लागते. २-३ महिन्यात त्यांना मुलांच्यात फरक दिसला. आत्मविश्वास वाढलेला दिसला, वाचन सुधारले.

सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे शिक्षक म्हणजे नुकतीच ग्रॆज्युॆेट झालेली भारतातील मुले आहेत. हुशार मुले आहेत. २ वर्षाची कमिटमेंट देउन ही मुले काम करतात. अगदी चांगल्या प्रकारच्या नोकरीचा मोह सोडुन २ वर्षे आपल्या देशाला द्यायची यांची तयारी आहे. वेळप्रसंगी पालकांशी भांडुन या कामासाठी मुले तयार होतात कारण त्यांना देशासाठी काहीतरी करायचे आहे. ही गोष्ट त्या मुलीला खूप इन्स्पायर करून गेली. तरूण मुलांच्यात ही शिक्षणाची ओढ बघून छान वाटले. त्यासाठी त्यांना थोडा जास्त पगार दिला जातो व हे पैसे ट्रस्ट कडून फंड जमा करून मिळवले जातात. हा भार सरकारवर पडत नाही.
आता मद्रास, हैद्राबाद व दिल्ली इथेही या शाळा चालू होणार आहेत. इंग्लिश मिडिअम असले की बरेच जण भाग घेउ शकतात . खेड्यात पुढे जायचा या लोकांचा विचार आहे पण त्यासाठी लोकल भाषेचे शिक्षक घ्यावे लागतील.

हे सगळे अनुभव ऐकल्यावर एवढेच वाटले हे सगळे शिक्षण खात्याला दिसत नाही का...आपल्या देशात नक्कीच चांगले लोक आहेत जे शिक्षणात बदल आणू शकतात मग ते का होत नाही.... त्यासाठी असा घास का घ्यावा लागतो....