Friday, May 14, 2010

काही वाचनीय..... एका तेलियाने

काही वाचनीय..... एका तेलियाने
सध्या मराठी पुस्तके कथा, कादंबर्‍या यातून थोडी बाहेर पडून इतर विषयांनाही महत्व द्यायला लागली आहेत. या वर्षीच्या भारत भे्टीत जेव्हा पुस्तकांच्या दुकांनाना भेटी दिल्या तेव्हा हे प्रकर्षाने जाणवले. (आणि चांगलेही वाटले). इंग्लीश मध्ये अशी पुस्तके व सिनेमेही भरपूर आहेत. आता मराठी वाचक ही वेगळ्या विषयांवरच्या पुस्तकांकडे आकर्षित होताना दिसत आहे.

’एका तेलियाने’ हे गिरीश कुबेर’ यांचे पुस्तक पाहिल्यावर असेच वाटले. आधी वाटले काहीतरी पेट्रोल भावांची आकोडेमोड, आणि क्लिष्ट असे हे पुस्तक असेल पण एकदा वाचायला लागल्यावर खूप इंटरेस्टिंग आहे. वेगळ्या विषयावरचे आहे. पुस्तक आवडायचे दुसरे कारण म्हणजे आम्ही सॊदी अरेबियात काही वर्षे वास्तव्य केल्याने यातील बरीच ठिकाणे माहितीची होती, पाहिलेली होती. सॊदी लोकांच्यात राहिल्याने त्यांचे थोडेतरी स्वभावविशेष कळले होते त्यामुळॆ पुस्तक वाचताना अजून मजा आली. तिसरी गोष्ट म्हणजे यात वर्णन केलेल्या बर्‍याच गोष्टींची ही पिढी साक्षीदार आहे. ओपेक, तेलाचे राजकारण, गल्फ वॉर या सगळ्याशी आपला डायरेक्ट संबंध नसला तरी आपण ते सर्व बघितले आहे

सॊदी अरेबिया चा तेलमंत्री झाकी यामानी याला केंद्र्स्थानी ठेवून तेलजगतातल्या सगळ्या गोष्टींचा आढावा छान घेतला आहे. हा ’मेन तेलिया’ या पुस्तकाचा हिरो म्हणता येईल, त्याच्या बरोबर इतर देशातल्या(तेल राष्ट्रातल्या) महत्वाच्या लोकांचीही छान माहिती दिली आहे. अमेरिकेची अरेरावी, त्याला प्रत्युत्तर देऊन यामानी ने केलेली देशाची भरभराट यात दाखवली आहे. सगळा तेलाच्या राजकारणाचा इतिहास आपल्यापुढे उभा केला आहे. ऒपेक ची स्थापना, तेलदर व त्याचे राजकारण, वेळोवेळी चाललेल्या लढाया, रशियाचा शिरकाव न होऊ देण्याचे अमेरिकेचे प्रयत्न, सगळ्या राष्ट्रांना एकत्र ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न हे सगळे यात चांगले मांडले आहे.ऒपेक च्या सदस्यांच्या अपहरणाचा प्रसंग अतिशय नाट्यपूर्ण लिहिला आहे. यामानीला देशातील अडाणी लोक व परकिय चलाख लोक या दोघांशीही एकदम लढा द्यावा लागला. तो मुळात शिकलेला असल्याने दूरवरचे पाहू शकत होता. हे पुस्तक वाचल्यावर एक मात्र पटते, नुसता राजा चांगला असून भागत नाही , मंत्रीही चांगलेच निवडावे लागतात तरच देश पुढे जाऊ शकतो. किंग फॆजल ने सॊदी मध्ये सुधारणा करताना किती कष्ट घेतले ते छान सांगितले आहे. सतत मुल्ला मॊलवींचा विरोध. परत धर्माची आडकाठी होच सुधारणा करताना.

मी यातल्या महत्वाच्या घटना साधारण क्रमानुसार माडून ठेवल्या आहेत. त्यावर नजर टाकली तर सगळा इतिहास डोळ्यापुढे उभा राहिल. जोडीला मिडल इस्ट चा नकाशा ही टाकला आहे.
१९१८ - व्हेनेझुएला -गोमेझ यांनी तेल विकून कर्ज फेडले, पायाभूत सुविधा आणल्या
१९३२ - सॊद तर्फे सॊदी अरेबिया नामकरण
१९३३- अमेरिकन कंपनी सोकॅलला प्रथम तेल खोदकामाचे हक्क
१९३७ - समाधानकारक तेल मिळू लागले
१९४४ - अरॅम्को ची स्थापना - सॊदीला पॆसा मिळावा म्हणून
१९५१ - इराण - महंमद मोसादेघ - प्रथम तेल कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण केले
१९५९ - व्हेनेझुएलाचे पेरेझ व सॊदी मंत्री तारिक एकत्र येउन - ऒपेक चा जन्म
१९५६ - लिबियात तेल साठे मिळायला लागले. सुवेझ च्या दुसर्‍या बाजूला असल्याने महत्व
१९५७ - किंग फॆजल बरोबर यामानी यांची कामाला सुरूवात
१९५८ - इजिप्त व सॊदी मध्ये मॆत्री - झेककडून शस्त्र खरेदी
सिरियाचा हल्ला, सॊदीला खर्च नियंत्रण गरजेचे
बिन लादेन च्या वडीलांची मदत
१९६२ - झाकी यामानी ३२ व्या वर्षी तेलमंत्री, पेट्रोमिन ची स्थापना, युनिव्हर्सटिची स्थापना, रूमानियाबरोबर धान्यकरार
१९६७ - इस्त्रायल विरूद्ध इजिप्त,जॉर्डन, सिरिया इराक ६ दिवसांचे युद्ध, अमेरिका विरोधाची लाट, तेलाचा कोट ठरविण्यासाठी ओआपेक
ची स्थापना
१९६९ - गडाफी नी भाववाढ सुरू केली. यामानींची मदत घेऊन ऒक्सी कंपनी वर बंदी व इतर कंपन्याही दबावाखाली आणल्या
१९७१ - प्रत्येक देशाशी वेगळ्या दराचा करार. लिबियाचा जास्त फायदा.
१९७३- बायबॅक तेलाचा रेट वाढवला. तेलाचे भाव खूप वाढवले. अमेरिका इस्त्रायलच्या बाजूने तर रशिया इजिप्त सिरियाच्या बाजूने तेलकंपन्यावर बहिष्कार शेअर बाजार कोसळले, मंदी, १६ दिवसांचे युद्ध इजिप्त इस्त्रायल करार होऊन युद्ध संपले.
१९७५ - सॊदी राजाची हत्या, कार्लोस चे अपहरण नाट्य
१९७८ - खोमेनी शहा विरोध, अरॅम्को बद्दल माहिती ला नकार
१९८० - इराक इराण युद्ध अतोनात तेल भाववाढ सॊदीत अतोनात पॆसा
१९९० - इराक कुवेत युद्ध. कुवेतसाठी अमेरिकन फॊजांना सॊदी भूमीवर परवानगी, सॊदीत असंतोष, अल काईदाचा जन्म

Sunday, May 9, 2010

संगीत की/कि राजनीती

संगीत की/कि राजनीती (हे टायटल तुम्ही मराठीत किंवा हिंदीत वाचू शकता.)

काल एक सितार, व्होकल व तबला असा एकत्र प्रोग्रॅम ऎकला. तसेच एक संतूर चा प्रोग्रॅम ऎकला.खूपच छान होता. मुख्य म्हणजे सगळे कलाकार तिशीच्या आतले. बरीच वर्षे रियाज केलेले होते. एवढ्या लहान वयात इतकी तयारी बघून कॊतुक वाटले आणि हिंदुस्तानी क्लासिकल म्युझिक चे भवितव्य उज्ज्वल आहे याची पुन्हा एकदा खात्री पटली.

गेल्या ५ वर्षात बरेच म्युझिक प्रोग्रँम ऑरगनाइज करण्यात भाग घेत असल्याने बर्‍याच कलाकारांशी बर्‍याच गप्पा झाल्या. आजकाल अमेरिका, युरोप, ऒस्ट्रेलिया, मिडल ईस्ट सगळीकडे कलाकार जाउन आपली कला सादर करतात. बाहेरच्य़ा देशात जाताना व्हिसा, वाद्यांची ने आण हे महत्वाचे असते. कस्ट्म ऑफिसर कुणाचे तबले ऒपन करतात तर लेदर लावलेली वाद्ये खूप डिटेल तपासतात त्यात कधी ती खराबही होतात. कधी नीट हाताळत नाहीत. या सगळ्या तपासण्यांची आजकाल टेररिस्ट मुळे आवश्यकता आहे. त्यामुळॆ काही म्हणता येत नाही. या तरी बाहेरच्या गोष्टी आहेत.

हे प्रोग्रॅम ठरवताना बरेच मार्केटिंग करावे लागते विशेषतः नवीन कलाकारांना. नाव झालेले कलाकार लोकांना माहित असतात त्यांचे काम थोडे सोपे असते. आजकाल इंटरनेट वरून कलाकार रेकॉर्डिंग्ज पाठवतात पण तरीही नवीन कलाकारांना बोलवायला पटकन कुणी तयार होत नाही. कलाकाराला एखादे ऍवॉर्ड मिळाले असले तर जरा महत्व वाढते पण सुरूवातीला कुठून ऍवॉर्ड मिळणार? आजकाल सगळीकडे राजकारण घुसले आहे. प्रोग्रॅम ठेवण्यासाठी कलाकारांकडे पॆसे मागतात हे ऎकून आश्चर्य वाटले. तुमचा कुणी गॉड फादर असेल तर त्याच्या नावामुळे फायदा होऊ शकतो पण हे सगळ्यांना शक्य नसते. बाहेर देशात आता येणार्‍या कलाकारांचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे हे राजकारण घुसले असावे. कारण कॉम्पिटिशन वाढली. प्रोग्रॅम ठरवणारे एजंटस स्वतःच्या मनाप्रमाणे वागतात. आणि एजंट नसला तर शिरकाव करू देत नाहीत. परत कार्यक्रम ठरवणारा , त्याची ऒळख फार महत्वाची ठरते. मग गुणवत्ता थोडी कमी जास्त असली तरी चालते. परत क्लासिकल संगीत म्हटले कि प्रेक्षक कमी आणि पॆसे कमी तोच शाहरूख चा सिनेमा किंवा सोनू निगम चा कार्यक्रम असला कि महाग तिकिटे काढून प्रेक्षक हजर.(मान्य आहे सर्व सामान्यांना ते कळते) कलाकार म्हणतात त्यांचा(पॉप्युलर) कार्यक्रम ठरवताना रिसेशन नसते आणि आमच्या वेळेस नेमके कसे असते? खरे आहे

पूर्वीच्या काळी राजे लोक कलाकारांना तनखे देऊन ठेवून घेत असत ते खरेच चांगले होते निदान त्यांना शांतपणे साधना करता येत असे. मुख्य म्हणजे घर कसे चालेल हि चिंता नसे. आजकाल खूप तरूण मुले शास्त्रीय संगीत शिकत आहेत. भरपूर रियाज करत आहेत. कष्ट करायला मागे नाहीत. स्वतःचे कॊशल्य प्रूव्ह करायला ते तयार आहेत पण ठराविक मर्यादेत असेल तोवर. पण त्यातच करिअर करताना, स्वतःला एस्टॅब्लिश करायला फार प्रयत्न करावे लागतात त्यांना. या राजनीती मुळे गुणवत्ता हे मोजमाप बाजूला जाते व इतर गोष्टींना महत्व आले आहे. त्यामुळे साधना करताना नक्कीच त्रास होतो. या साठी एखादी ट्रान्सपरंट पद्धत तयार झाली तर बरे होईल. आणि कलाकारांना पाठबळ देणारे लोक जर पुढे आले तर खूप फायदा होईल. क्रिकेट मध्ये लोक जसे संघांना पॆसे देतात तसेच जर कलाकाराना पाठबळ मिळाले तर छान होईल. गुणवत्तेनुसार कार्यक्रम झाले तर लोकांचा व कलाकारांचा दोघांचाहि फायदा होईल.

आता तुम्ही म्हणाल कि तुम्हाला काय करायचय यात पडून? वाटले तर कार्यक्रम बघा नाहितर गप्प बसा. पण या कलाकारांशी बोलून एवढे नक्की वाट्ले कि आपण जेव्हा एखाद्या कलाकाराचा कार्यक्रम बघतो तेव्हा त्याच्यामागे केवढे राजकारण असते हे तुमच्यापर्यंत पोचवावे. आजच्या तरूण पिढीत इतके छान कलाकार आहेत, ते आपली कला भारताबाहेर प्रदर्शित करत आहेत तर त्यांच्या गुणांचे चीज व्हावे.

Sunday, May 2, 2010

ओबमा गोज ब्ल्यू....





ओबमा गोज ब्ल्यू....

तारीख १ मे २०१०, स्थळ फूटबॉल स्टेडियम ऍन आर्बर मिशिगन, ८५०० विद्यार्थी आणि ८०,००० प्रेक्षक यांनी स्टेडियम गच्च भरलेले. बरोबर ११ वाजता बॅंडच्या साथीवर त्याने एंट्री घेतली आणि सगळीकडे टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला. कॅमेर्‍याचे फ्लॅश उडू लागले. सुरूवातीचे काही सोपस्कार पार पडल्यावर पुढची ४० मिनिटे चिडीचूप शांततेत लोकांनी भाषण ऎकले. अधूनमधून विनोदाची पेरणी करत , दुसर्‍या पार्टीच्या लोकांना मधूनच चिमटे काढत, रोज नवीन नवीन उदभवणार्‍या प्रश्नांचा उल्लेख करत, आजच्या तरूण ग्रॅज्युएटस नी कसे वागावे हा मेसेज देत ही ४० मिनिटे कशी संपली ते कळले नाही. हा अनुभव तुमच्याशी शेअर करण्यासाठी हे पोस्ट. ०

माझ्या मॆत्रिणिच्या मुलीचे ग्रॅज्युएशन होते. त्यासाठी आम्ही जायचे ठरवले. नंतर कळले कि, मुख्य पाहुणे प्रेसिडेंट ऒबामा आहेत. मी आतापर्यंत त्यांची बरीच भाषणे प्रेसिडेंशिअल डिबेट च्या काळात ऎकली होती. तिथले एकंदर वातावरण, लोकांचे शिस्तीत टाळ्या वाजवणे आणि मुख्य म्हणजे ऒबामांचे वक्तृत्व याचा माझ्यावर प्रभाव पडलेला होता. हा मनुष्य चांगला ऒरेटर आहे. मुद्दे तयार असतात. अधेमधे अडखळणे अजिबात नाही. ऎकायला खूप छान वाटते.

इतक्या गर्दीचे सिक्युरिटी चेकिंग, खाण्याची सोय, बसण्याची व्यवस्था यासाठी खूप प्लॅनिंग केले होते. सगळे कसे शिस्तीत चालले होते. सगळे दिलेल्या सूचना पाळत होते. धक्काबुक्की, पुढे घुसणे अजिबात नाही. भारतात कुणाला असे काही सांगितले, की लोकसंख्या हे कारण लगेच पुढे करतात. पण इथे तर ८५००० हून जास्त लोक होते. गाड्या पार्किंग मध्ये पण स्वयंसेवक जागा दाखवत होते(यातले बरेचसे सिनिअर सिटिझन होते) आणि लोक सांगितलेल्या जागी गाड्या पार्क करत होते एकही हॉर्न वाजला नाही आम्ही पार्किंग लॉट अधून बाहेर पडेस्तोवर. ग्रेट!!!!

यावर्षी सगळी तिकीटे संपली होती कारण लोकांना ऒबामाला बघायचे होते, ऎकायचे होते. आधी मेल वर सगळ्यांना सुचना पाठवलेल्या होत्या....बरोबर काही ठेवायला परमिशन नव्हती म्हणजे तेवढेच सिक्युरिटी चेकिंग सोपे. ८० वर्षाच्या आजी आजोबांपासून २ महिन्याच्या बाळापर्यंत लोक ऑडियन्स मध्ये होते. हो आणि सकाळी चांगला धुवाधार पाऊस होता पण मंडळी पावसाची पर्वा न करता पॉंचोज (आपल्या इरल्याचे प्लॅस्टीक रूप) घालून बसली होती. सकाळी ६ ३० ते ९ पर्य़ंत प्रवेश होता. आम्ही ८ ३० ते ११ बसलो होतो पण वेळ चागला गेला. हळूहळू स्टेडियम भरले. पिवळे निळे (युनि कलर्स) रंग जास्त दिसत होते. लाईव्ह ऑरकेस्ट्रा चालू होता. सर्वात उंच बिल्डिंग वर सिक्युरिटीचे लोक उभे होते. बर्‍याच ठिकाणी कॅमेरे लावलेले होते. साध्या वेषातले ही बरेच पोलिस दिसत होते. १० २५ ला प्रेसिडेंट चे हेलिकॉप्टर आले आणि बरोबर ११ ला प्रोग्रॅम सुरू. १ मि इकडे नाही का तिकडे नाही. या सगळ्या शिस्तित मनात एकदा विचार आलाच की आता काही गडबड झाली तर. (टेररिस्टचे विचार काही अपली पाठ सोडत नाही) बाहेर थोडे प्रोटेस्ट करणारे लोकही होते.

गो ब्ल्यू' हे मिशिगनचे स्टेटमेंट त्याने आल्याआल्याच म्हटले...प्रत्येक जण ते भाषणाच्या शेवटी म्हणत होता ऒबामा ने डेमोक्रसी टिकवण्यासाठी प्रयत्न करायला सांगितले, पॉलिटिक्स मध्ये तरूणांनी सक्रिय सहभाग घ्यायला पाहिजे, आपली जागा सोडून दुसरीकडे गेले पाहिजे, वेगळ्या गोष्टी वाचल्या पाहिजेत. आपल्या समोर जो प्रतिस्पर्धी असेल त्याचे म्हणणे (विचार) ऎकून घेणे हे अतिशय महत्वाचे आहे असा त्यांनी मुलांना सल्ला दिला. गव्हर्मेंट ला नावे ठेवणे हे खूप कॉमन झाले आहे पण लोकांनी हे लक्षात ठेवावे की आपण गव्हर्मेंटचाच भाग आहोत, दुसरे तिसरे कुणी नाही. वेगवेगळ्या लोकांबरोबर (वंश, जाति, धर्म) राहिले कि त्यांचे प्रॉब्लेम्स जास्त कळतात म्हणून वेगळ्या लोकात मिसळ्णे आवश्यक आहे असाहि सल्ला दिला. मला वाटते सगळ्या लोकशाही राष्ट्रातील लोकांना हाच सल्ला योग्य आहे.

कालचा जमलेली गर्दी ही त्याच्या भाषणासाठी झालेली मोठी गर्दी होती. ( त्याच्या ओथ ला याहून जास्त गर्दी होती) ब्लूमिंग्ट्न पासून ७ तास केलेला ड्राइव्ह , सकाळी ७ पासून पावसात केलेला प्रवास, थोडे भिजणे, एवढा वेळ स्टेडिअम वर बसायला लागणे हे सगळे त्याच्या भाषणानंतर आम्ही विसरून गेलो.