Wednesday, January 12, 2011

साद देती सह्याद्रीचे कडे....




साद देती सह्याद्रीचे कडे....

भारतात महाराष्ट्रात औद्योगिक प्रगति बरीच झाली आहे. रस्त्यांनी शहरे जोडली गेलेली आहेत. झाडी, जंगल हा प्रकार अगदीच कमी. सह्.ाद्री चे किल्ले,गड मात्र ताठ मानेने उभे आहेत. आजकाल व्लाॆगवर, फेसबुकवर, वर्तमानपत्रात बरेच लोक यावर लिहितात. अनुभव, फोटो व इतर माहिती बरीच दिसते. आजकाल बरीच मंडळी या सहलींचे आयोजन करताना दिसतात. तरूणाई ट्रेक कडे परत वळत आहे हे पाहून छान वाटते.

हे सगळे वाचताना असे वाटले या सगळ्यांनी एकत्र येउन एका साईटवर सगळी माहिती एकत्रित ठेवली तर किती छान होईल. बरे हे सगळे स्वानुभवातुन आलेले असल्याने रंजक तसेच माहितीपूर्ण ही असेल. ३-४ लोकांनी एकत्र येउन थोडे थोडे काम वाटून घेतले तर हे काम सहज होण्यासारखे आहे. नवीन जाणारा माणूस या अनुभवातून बरेच काही शिकू शकतो. आणि एका प्रकारे माहिती असली की चांगले वाटते. गडावर जायचा नक्की रस्ता कुठला हे माहित असावा,,,तुम्ही म्हणाल की अशा चुकण्यात मजा असते ... मान्य आहे पण काहींना ती सजा वाटू शकते. गाईडनी पैसे खूप सांगणे यावर पण कंट्रोल राहू शकतो.

मी १०-१२ गडावर गेले आहे मग देशाबाहेर राहिल्याने तिथल्या गोष्टी जास्त बघितल्या गेल्या. अमेरिकेत हिंडताना एक गोष्ट जाणवते, कितीही बारीक गोष्ट असो त्याची माहिती व्यवस्थित लिहिलेली असते. (त्याबद्दल दुमत नसते) गेल्यावर व अजून २-३ ठिकाणी नकाशा लावलेले असतो. रेंजर लोक ३-४ वेळा माहितीपूर्ण प्रेझेंटेशन देतात. अघून मघून साघ्या लाकडाच्या खांबावर पाट्या लावून त्यावर थोडक्यात माहिती दिलेली असते. भौगोलिक ऐतिहासिक महत्व लिहिलेले असते. मी काही लोकांच्या ब्लाॆगवर वाचले की काही किल्ल्याबद्दल तिथल्या लोकांनाही माहिती नसते. सरकार या गोष्टीत लक्ष घालेल अशा वाट बघण्यापेक्षा काही लोकांनी एकत्रित येउन केले तर हे काम लवकर होईल. स्पांन्सर नक्की पुढे येतील आणि तसा फार खर्च येणार नाही.

आपण बाकी गोष्टी जितक्या पटकन काॆपी करतो तसे हे ही करायला हवे. गाईडच्या बाबतीत पण गावातल्या लोकांना एकत्र करून शिकवले तर मुले छान काम करू शकतात. आम्ही रायगडावर याचा अनुभव घेतला. तिथे बाबासाहेब पुरंदरे यांनी मुलांना शिकवून तयार केले आहे. ती मुले कविता म्हणून सगळी माहिती सांगत होती. ऐतिहासिक माहिती ज्याबद्दल दुमत आहे ती लिहिणे टाळावे. शिवाजी महाराजांनी केलेले काम मोठे आहे ते महत्वाचे. डिटेल्स मध्ये तफावत असू शकते. आपल्याकडे इतिहास नीट लिहिलेला नाही .. बखरकार पण वेगवेगळे इंटरप्रीटेशन करणार त्यामुळे वादाचे मुद्दे टाळून हे काम करावे लागेल. लिहिलेल्या पाट्या खराब न करणे, त्यावर काही न लिहिणे हे हळूहळू लोक शिकतील अशी आशा ठेवायला काहीच हरकत नाही. काही गडावर आत्ता असे नकाशे आहेत पण अगदीच कमी.

काय बाहेर राहून इथल्या उचापति कशाला अशा खूप लोकाॆच्या प्रतिक्रिया होतील पण मला हे मनापासून वाटते हे खरे.

Sunday, January 2, 2011

शिक्षण असेही

शिक्षण असेही...

गेल्या दशकात भारताचे नाव आउटसोर्सिंगच्या क्षेत्रात चमकते आहे. साॆफ्टवेअर मध्ये तर भरपूर मागणी आहे. आणि त्यात आपली मंडळी ठसा उमटवत आहेत. मेडिकल, सेवा, अभियांत्रिकी या क्षेत्रातही भरपूर वाव आहे. हळूहळू त्यातही लोकांना कामाच्या संघी मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर परवा एक लेक्चर ऐकले आणि वाटले की आपण (भारतीय) लोकांना इतके काम करून देतोय आणि आपल्याकडे मात्र शिक्षणाचे आउटसोर्सिंग चालू होते का काय....

अमेरिकेत आल्यावर सुरूवातीला व्हाॆलेंटिअरिंग, फंड रेझिंग बघून मी जाम इंप्रेस झाले होते. गिव्हींग बॆक हा कन्सेप्ट खूप दिसतो. शाळेत, ओल्ड पिपल होम, बेवारशी प्राणी सांभाळणे, त्यांचे संवर्धन करणे खूप दिसते. अगदी लहान पणापासून हे शाळेत शिकवले जाते. अशातच काही सेवाभावी संस्था भारतातील शाळांसाठी मदत करताना दिसून आल्या. अगदी खेड्यापाड्यात जाउन तरूण मुले ही कामे करतात ते पाहुन कौतुक वाटते. आणि - आम्हाला काही गरज नाही, उगाच येउन कामे करतात, आजकाल कुणालाही गरज नाही, भारतात पैशाची कमी नाही... हे वर ऐकावेही लागते. अमेरिकेतून आलेल्या मदती बद्दल मी हेच जास्त ऐकले आहे. एकल विदयालय अगदी खेड्यात ३६००० एक शिक्षकी शाळा चालवते.

टीच फाॆर अमेरिका या धरतीवर टीच फाॆर इंडिया हा असाच एक उपक्रम पण त्यात वेगळेपण आहे. याची मुख्य भारतीयच आहे. पुणे व मुंबई मिळून ६५ शाळात हे लोक काम करतात. ज्या मुलीने अनुभव सांगितले ती अमेरिकन आहे. ती तिथे नोकरी करते. सरकारी शाळेत - इंग्लीश मिडिअम त्यांचा प्रयोग चालतो. प्रथम तिने सांगितले की ह्या लो इन्कम ग्रुप च्या शाळा असल्याने पालक मुलांच्या अडचणी सोडवू शकत नाहीत. तिथल्या शिक्षकांना २००० रू पगार मिळतो. बरीच मुले पाठांतर करतात व समजून न घेता शिकतात - मार्क कमी पडतात मग त्यांना शिकवणी ला पाठवतात... त्यामुळे शाळेत यायला नाखूष असतात. काही मुले यातूनही व्यवस्थित शिकतात. अशा शाळात २री ते ४ थी मध्ये १ वर्ग सिलेकट करून तिथे अमेरिकन पद्धतिने हे लोक शिकवतात नीट समजावतात, जास्त वेळ मुलांना देतात. साहजिकच मुले शाळेत जायची वाट बघतात, शाळा आवडायला लागते. २-३ महिन्यात त्यांना मुलांच्यात फरक दिसला. आत्मविश्वास वाढलेला दिसला, वाचन सुधारले.

सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे शिक्षक म्हणजे नुकतीच ग्रॆज्युॆेट झालेली भारतातील मुले आहेत. हुशार मुले आहेत. २ वर्षाची कमिटमेंट देउन ही मुले काम करतात. अगदी चांगल्या प्रकारच्या नोकरीचा मोह सोडुन २ वर्षे आपल्या देशाला द्यायची यांची तयारी आहे. वेळप्रसंगी पालकांशी भांडुन या कामासाठी मुले तयार होतात कारण त्यांना देशासाठी काहीतरी करायचे आहे. ही गोष्ट त्या मुलीला खूप इन्स्पायर करून गेली. तरूण मुलांच्यात ही शिक्षणाची ओढ बघून छान वाटले. त्यासाठी त्यांना थोडा जास्त पगार दिला जातो व हे पैसे ट्रस्ट कडून फंड जमा करून मिळवले जातात. हा भार सरकारवर पडत नाही.
आता मद्रास, हैद्राबाद व दिल्ली इथेही या शाळा चालू होणार आहेत. इंग्लिश मिडिअम असले की बरेच जण भाग घेउ शकतात . खेड्यात पुढे जायचा या लोकांचा विचार आहे पण त्यासाठी लोकल भाषेचे शिक्षक घ्यावे लागतील.

हे सगळे अनुभव ऐकल्यावर एवढेच वाटले हे सगळे शिक्षण खात्याला दिसत नाही का...आपल्या देशात नक्कीच चांगले लोक आहेत जे शिक्षणात बदल आणू शकतात मग ते का होत नाही.... त्यासाठी असा घास का घ्यावा लागतो....