Friday, November 16, 2012

इतिहास माणसाच्या संस्कृतिचा... भाग १

इतिहास माणसाच्या संस्कृतिचा...भाग १

कालच बातमी वाचली की जगाच्या उत्पत्तीचा नकाशा तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. ग्रह, तारे, आकाशगंगा कसे आणि कधी तयार झाले याबाबत माहिती दिलेली आहे. हा सगळा अवकाशाचा इतिहास नकाशात बंदिस्त करण्यात मनुष्य यशस्वी झाला आहे. अशीच माहिती देणारी एक ६ भागातील मालिका आता history channel वरून दर मंगळवारी प्रसारित होत आहे. माणसाच्या सुरूवातीपासून कसा कसा तो घडत गेला आणि उत्क्रांत होत गेला यावर माहिती आहे. मला बरेच दिवसापासून यावर लिहायचे होते, आता काम सोपे झाले. या सेरीज मध्ये काही गोष्टी पटत नाहीत, काही गाळल्या आहेत तर काहींना महत्व कमी दिले गेले आहे असे वाटते पण तरीसुद्धा सगळे एकत्रित करण्याचा चांगला प्रयत्न आहे.  तुमचा मते-माहिती यावर मांडलीत तर अजूनच ही मालिका पूर्ण वाटेल. आपण इतिहासात या गोष्टी शिकतो पण त्याचे कनेक्शन विसरतो. माझ्या मते ज्या गोष्टींचे लिखित स्वरूपात काहीतरी शिल्लक आहे त्यांना यात स्थान दिले आहे. भांडणे कमी व्हावीत हा हेतू असावा, कारण इतिहास म्हटला की वाद आलेच, असो.....

बिग बँग ने या विश्वाची निर्मिती झाली. ग्रह, तारे, आकाशगंगा तयार झाले. आपली पृथ्वी त्यातलीच एक. आत्तापर्यंत माहिती असलेला हा एकच ग्रह आहे की ज्यावर पाणी आणि वातावरण दोन्ही आहे. हे दोन्ही  जीव जगवण्यासाठी पूरक आहे. १३ बिलिअन वर्षानंतर मनुष्यप्राणी अस्तित्वात आला. सुरूवात पूर्व आफ्रिकेत झाली. आपल्या सगळ्यामध्ये त्या लोकांच्या डी एन ए चा काही तरी अंश आहेच. रिफ्ट व्हँलीत पहिली माणसे रहात होती. अग्निचा उपयोग करून अन्न शिजवले जाउ लागले. अग्नि ज्वलनासाठी आवश्यक त्या गोष्टी असल्याने माणसाला त्याचा फायदा करून घेता आला. चांगले अन्न मिळाल्याने मेंदूची वाढ झाली, तो आधीपेक्षा  आकाराने दुप्पट झाला. त्याच्या गुंतागुंतीच्या रचनेने माणूस विचार करायला शिकला. त्या वेळेस १०००० लोक पृथ्वीवर होते(सध्या १ तासात तेवढे जन्मतात) याच सुमारास पृथ्वीचा अॅक्सेस कलल्याने तापमान घटले व बराच भाग बर्फाखाली गेला. या थंडीला न जुमानता काही लोक नवीन जागेचा शोध घ्यायला बाहेर पडले. थंड हवेशी सामना करण्यासाठी कातडीचे कपडे शिवायला माणूस शिकला. आगीपासून उब घेत गुहेत रहायला शिकला. या गुहांमध्ये त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा दिसतात. आपण नेहेमी म्हणतो की लोक फार गोष्टीवर कोरतात, आपली नावे लिहितात किंवा चित्रे काढतात पण याच सवईमुळे त्यांच्या पाउलखुणा आपण बघू शकलो.
१०००० बी सी मध्ये १ मिलिअनन पर्यंत लोकसंख्या गेली. बर्फाचे रूपांतर पाणी व पावसात होउन गवत उगवले. त्यातून धान्यनिर्मिती झाली. कुणा एका बाईने फेकून दिलेले  धान्य उगवते हे पाहिले व धान्य पेरले जाउ लागले. धान्यामुळे खात्रीचा जगण्याचा मार्ग मिळाला. हळूहळू या शेताजवळ लोक वस्ती करायला लागले. ३००० बी सी मध्ये इंग्लंड च्या आसपास खेडी वसली.व लोकवस्ती वाढू लागली. धान्य व पाळीव प्राण्यानी माणसाला जगण्याचा मार्ग दिला तसेच रोग व भांडणेही दाखवली. त्यावेळत्या उत्खननात १० पैकी  एकजण मारामारीत मेलेला सापडला. याचवेळेस जगात हळूहळू धर्मांचा उदय झाला. जी लोक गेली त्यांची आठवण म्हणून स्टोन हेंज ची निर्मिती युरोपात झाली, त्याचवेळेस पिरँमिडस ची निर्मिती सुरू झाली.

खूफू राजाने हे बांधकाम सुरू केले. ३५००० कामगार २० वर्षे हे काम करत होते. त्यासाठी २ मिलिअन दगड वापरले गेले. हे एवढे बांधकाम करणे सोपी गोष्ट नव्हती. त्यासाठी शिस्तबद्ध कामाची गरज होती.  त्यावेळेस चित्रलिपी चा आधार घेउन लिहिले गेले व हे भव्य काम पूर्ण झाले. आजही तिथे गेलो की थक्क व्हायला होते. लाइम स्टोन ने दिलेला मुलामा व सोनारी कळस आता शिल्लक नाही पण तरीसुद्धा ५००० वषापूर्वीचे काम बघून आपण थक्क होतो.
याचवेळेस मिडल इस्ट मध्ये छोटी गावे उदयाला येत होती. आताचे टर्की त्यापैकीच एक. शेतकरी हत्यारे वापरू लागले होते आणि व्यापाराला सुरूवात झाली होती.  टिन चा शोध लागला होता. त्यानंतर ब्राँझ चा शोध लागला आणि पुढील २००० वर्षे युद्धात व इतरत्र त्याचा वापर झाला. याच सुमारास पहिले ट्रॅक रेकाॅर्ड ठेवला गेले. इडी ने फरशांवर आपले हिशोब व माहिती कोरून ठेवली आहे. व्यापारासाठी लोक युरोप, भारतात व आजूबाजूला पसरले.
इकडे इजिप्त मध्ये मोझेस ३ राजा होता. त्यावर सूदान मधून १२००० सैन्यासह हल्ला आला. त्यांना हरवून इजिप्शिअन राजानी आपले वर्चस्व सिद्ध केले. ही सगळ्यात पहिली िलखित लढाई समजली जाते.  त्यानंतर त्या लोकांनी ४००० स्क्वेअर माइल्स एवढे आपले साम्राज्य पसरवले. सूर्याची किरणे पोचतात तिथपर्यंत त्यांचे राज्य आहे असे ते म्हणत. नंतर तिथे बरेच राजे झाले, राजांना देवाचा दर्जा दिला जाउ लागला. आफ्टर लाइफ, पिरॅमिडस भरपूर बांधले गेले. पुढे हे राज्य लयाला गेले. समूद्रातून आलेले हल्ले परतवणे त्यांना जमले नाही. नवीन शत्रू जास्त सामर्थ्यशाली होता. शस्त्रांनी परिपूर्ण होता.
यानंतर आयर्न युग सुरू झाले. त्याने सगळे भविष्य बदलले.  पृथ्वीचा गाभा लोहाचा बनलेला आहे. कोळसा, लाकूड यांच्याबरोबर हे खनिज तापवून हत्यारे बनवण्यात आली. ती हत्यारे जास्त टिकाउ व तीक्ष्ण होती. त्यावेळेस कोळसा बनवण्यासाठी ७० मिलिअन एकर झाडे पाडली गेली.  या लोखंडी हत्यारामुळे दणकट बोटी बनवता येउ लागल्या. फिनिश लोक यात सगळ्यात पुढे होते. अतिशय धाडसी व नवीन गोष्टींचा शोध घेण्यास तयार असल्याने ते अटलांिटक वर सत्ता गाजवू लागले. त्यांनी बोटींसाठी कील बनवले, ज्यायोगे बोटी स्थिर राहू लागल्या व ते अजून सामर्थ्यवान झाले. त्यांच्या बोटीच्या प्रवासात त्यांनी माउंट कामारून हा आफ्रिकेतला ज्वालामुखी पाहिला. त्यातून येणारी आग, धूळ पाहून त्याला त्यांनी देवाचा रथ असे नाव दिले. या लोकांची अजून एक महत्वाची कामगिरी म्हणजे त्यांनी जगाला २२ अल्फाबेटस दिली. त्यामुळे शिकणे व संदेश सोपे झाले. वाटेत एका बेटावर त्यांनी गोरिला पाहिल्याची नोंद आहे व त्याला ग्रेट एप असे म्हटले होते. ती माणसांची पूर्वज असावीत असा निष्कर्ष ही काढला होता आणि हे सगळे डार्विन च्या सिद्धांतापूर्वी २५०० वर्षे.




या काळात अध्यात्मिक विचारांचे वारे ही हळूहळू पसरू लागले होते. भारतात हिंदूइझम, हिमालयाच्या पायथ्यापासून पूर्वेकडे बुद्धीझम आणि चीन मध्ये कन्फ्यूशिअस पंथ पसरू लागला होता. मिडल ईस्ट च्या बाजूला ग्रीस मध्ये अनेक लढवय्ये होते. स्पार्टा त्यातील एक राज्य. हे लोक लढवय्ये म्हणून प्रसिद्ध. मुलगा ७ वर्षाचा झाला की त्याला लढाईचे शिक्षण देत. सर्व प्रकारात पारंगत करत. त्यांच्यावर जेव्हा पर्शिअन सैन्य चालून आले तेव्हा लढायचे का शरण जायचे हा प्रश्न पडला. सर्वसामान्य नागरिकांचे मत घेतले गेले व लढायचे ठरले. त्याकाळी असे पहिल्यांदाच घडले की सगळ्यांची मते घेउन लढाईचा निर्णय घेतला गेला व अतिशय पद्धतशिरपणे एकत्र राहून शत्रूचा हल्ला मोडून काढला. कमी सैन्य असताना देखिल ही लढाई अथेन्सने जिंकली. आपल्या आजच्या लोकशाही पद्धतिची सुरूवात या लढईत झाली. या जया बद्दल पार्थेनान ची उभारणी झाली. त्यात अथेना देवीचे मंदिर आहे.

  याच सुमारास चीन मध्ये liquid iron set करून हत्यारे बनवायचा शोध लागला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हत्यारांची निर्मिती होउ लागली व युदध जिंकणे सोपे होउ लागले.  सुरूवातीचे क्राँस बो हे सुद्धा अतिशय चांगले होते. त्या वेळच्या राजाने एकमेकात लढणारे सगळे भाग एकत्र करून चायना ला नावारूपास आणले व मोठे राज्य स्थापन केले. All creatures under heaven असे त्याचे वाक्य होते.यामुळे चायना जास्त बलवान झाले.           
 
राज्याचे रक्षण करण्यासाठी The great wall of China chi nirmiti zali. त्यासाठी अमेक कामगारांनी आपले प्राण गमावले. अनेक वर्षे हे बांधकाम चालले. होते. दर युद्धात नवीन शोध लागतात व रक्षणासाठी किंवा विजयानंतर मोठी बांधकामे होतात हे तेव्हापासून दिसते.


 हा राजा अमरत्वाच्या मागे लागला होता. त्याला दिल्या जाणारे औषध हेच शेवटी जीवघेणे ठरले. तेव्हा आफ्टर लाइफ च्या नावाखाली त्याच्या बरोबर त्याच्या बायका व मुले यांनाही पुरले. हे स्मारक टेकडी, झाडे व पाणी याखाली अनेको वर्षे बंद राहिले. १९७१ च्या सुमारास त्याचे उत्खनन झाले. त्यावेळी त्याच्याबरोबर पुरलेली टेराकोटा आर्मी सापडली. ८००० शिपाई व प्रत्येकाचा चेहरा वेगळा. खरोखर कमाल आहे. आणि हे सगळे शिल्लक राहिले इतक्या वर्षांनी......

बॅबिलाॅन मध्ये याच सुमारास काही ज्यू कैद्यांना ठेवले होते, इस्राईलवर हल्ला करून त्यांना हरवून या लोकांना बंदीवान केलेले होते. त्यांच्या २-३ पिढ्या तिथे राहिल्या होत्या. या लोकांनी हिब्रू भाषेत बायबल लिहायला सुरूवात केली. इतरांपेक्षा वेगळे म्हणजे पहिल्यांदा त्यांनी एक देव असल्याची कल्पना मांडली. हे लिखाण त्यांनी कैदेतच करायला सुरूवात केली. यानंतर परत पर्शिअन लोकांनी बॅबिलाँनवर हल्ला केला. त्यावेळेस कैदेत जो राजघराण्यातला राजपुत्र होता त्याने १०० एक कुटुंबांना तिथून ५०० मैलावर असलेल्या जेरूसलेम मध्ये नेले. जी त्यांची भूमी होती. काही लोक मागे राहिले. पुढे गेलेल्या लोकांनी बायबल चे स्क्रिप्ट आपल्याबरोबर नेले तेच ओल्ड टेस्टामेंट.या पुस्तकाच्या जगात ५०० वर्षात ६ बिलिअन प्रति छापल्या गेल्या...आजपर्यंतच्या सर्वात जास्त.

हे सगळे पाहिल्यावर मोहेंजो दारो हराप्पा, रामायण महाभारत यांचा उल्लेख नाही हे जरूर खटकते. आपल्याकडे एवढे उत्खनन व नोंदी नाहीत हेही खरेच. नोंद असलेल्या गोष्टीच घेतलेल्या दिसतात. तसेही आपल्याकडे महाभारत व रामायण हे काव्य आहे असे म्हणतात. बघू आता पुढे काय काय म्हणतात ते. एक गोष्ट चांगली आहे, लगेच फेसबुक पेज उघडले असल्याने लोकांनी आपली मते नोंदवायला सुरूवात केली आहे. मनुष्याची सतत नव्याची आस आणि जिद्द या गोष्टीमुळे शोध लावत आपण कसे आजपर्यंत पोचलो हे बघणे नक्कीच छान आहे. आपल्या देशात काही घडत असताना त्याच वेळेस बाहेर काय घडत होते हे बघणे या सिरीअल ने नक्की होईल.


पुढील भाग लौकरच....




Tuesday, October 30, 2012

पाने इतिहासाची....

गेल्या आठवड्यात हिस्टरी चॆनेल वर एक कार्यक्रम पाहिला.   The men who built America.
खूप छान होता.  इथे अमेरिकेत हिंडताना बिल्डिंग वर, सभागृहांवर किंवा रस्त्यावर काही नावे आपण सतत बघतो. बरीच मोठी फाउंडेशन्स दिसतात. त्या सगळ्यानी अगदी शून्यापासून सुरूवात करून कसे एम्पायर उभे केले याबद्दल सांगितले आहे. हे करत असताना अनेक लोकांना काम मिळाले, गावांची भरभराट झाली आणि थोडक्यात देशाची उभारणी करायला मदत झाली. या माहितीपटामुळे या सगळ्या लोकांचा एकमेकातील नाते स्पष्ट झाले. त्या वेळची सामाजिक स्थिती, आर्थिक स्थिती याचे चित्र बघायला मिळाले. आज जर जे पी माॆर्गन हे नाव वाचले किंवा ऐकले तर पटकन त्याचे काम डोळ्यापुढे येते. हे सगळे पिलर्स एकमेकात कसे जोडले गेले आहेत हे छान लक्षात येते.

जे पी माॆर्गन-बँक, कार्नेजी-स्टील, जाँन राँकरफेलर-स्टँडर्ड आँइल,  एडिसन-इलेक्ट्रिसिटी, वेन्डरबिल्ट-रेल्वे आणि असे अनेक लोक ज्यानी अमेरिकेच्या पायाभरणीत महत्वाचा वाटा उचलला. या सगळ्यांच्या मनात खूप जिद्द होती. बिझनेस वाढवताना त्यांना अनेक अडचणी आल्या. काहीही झाले तरी त्यानी बिझिनेस चालू ठेवला, वाढवला. ईर्षा ही गोष्ट किती फायद्याची ठरते हे लक्षात येते.  सतत आपल्या प्रतिस्पर्ध्यावर कुरघोडी करण्याचे प्रयत्न करत या लोकांनी समृद्धी आणली. दुसरी एक गोष्ट लक्षात आली की यात सरकार चे काम किंवा हस्तक्षेप फारसा नव्हता. त्यामुळे थोडक्या दिवसात उद्योजकांकडून खूप प्रगति झाली. नवीन शोध लागले की जुन्या गोष्टी कशा कमी महत्वाच्या ठरतात हे पण चांगले दाखवले आहे. जसे एडिसन ने इलेक्ट्रीसिटी आणल्यावर केरोसिनचे महत्व कमी झाले. अर्थात यावर कसे निर्णय घेउन या मंडळींनी आपले बिझिनेस पुढे नेले हे बघण्यासारखे आहे. अफाट श्रीमंती आल्यावर या सगळ्या लोकांनी भरपूर देणग्या दिल्या आणि समाजाचे भले केले आहे. फक्त स्वताचे घर न भरता एवढ्या देणग्या देणे हे नक्कीच कौतुकास्पद.

या फिल्मसाठी  जुने त्या वेळचे फोटो वापरले आहेत.  जुना काळ चांगल्या प्रकारे दाखवला आहे. काही नवीन शूटिंग केले आहे.  दर मंगळवारी ८ - १० history channel वर हा कार्यक्रम असतो . 4 parts मधे आहे. If u  do not get that channel its available on History.com

१३ नोव्हेबर पासून अशीच एक मालिका दाखवणार आहेत. आइस एज पासूनचा मानवाचा प्रवास. यात कशा संस्कृति वसत गेल्या हे दाखवतील. आणि महत्वाचे म्हणजे त्यांचा एकमेकावर कसा प्रभाव पडला ते दाखवतील. मला खूप दिवसापासून याबद्दल लिहायचे होतो. म्हणजे एकाच वेळी भारतात आणि जगात काय चालू होते  ते आता या निमित्ताने बघायला मिळेल.  ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी जरूर बघा.

जाता जाता परत नेहेमीचा विचार मनात येतोच. भारतात अशी फिल्म का बनत नाही. इतिहासाबद्दलची भांडणे बाजूला ठेवून जर सगळ्या लोकांबद्दल दाखवले तर  छान फिल्म तयार होईल. अगदी स्वातंत्र्यानंतरची जरी बनवली तरी अनेक लोकांबद्दल माहिती मिळेल. सध्या उंच माझा झोका मधून अशा काही समकालीन लोकांबद्दल बघायला मिळाले तेव्हा छान वाटले. इतिहासात आपण ते शिकतोच पण ते एकमेकांशी कसे जोडले गेले आहेत हे अशा माहितीपटावरून जास्त चांगले कळते.

Wednesday, October 3, 2012

वेदातील विज्ञान....... भाग २ (इशोपनिषद, कठोपनिषद)

आपल्या जुन्या ग्रंथात वेद, पुराणे, ब्राम्हणे, अरण्यके, उपनिषदे इ. चा सामावेश आहे. या ग्रंथात साधारण काय माहिती आहे हे बघण्याचा हा माझा प्रयत्न. फार खोलात न जाता मला जे पटले किंवा जे नाही पटले  ते शेअर करण्याचा हा प्रयत्न. अर्थात माझ्या पटण्या न पटण्याचा काही संबंध नाही.   इतक्या वर्षांपूर्वीची ही माहिती आपल्यापर्यंत आली आहे तर ती माहित करून घ्यावी असे वाटले. या भूतलावर जेजे आपण बघतो ते सगळे या जुन्या ग्रंथात डिफाइन केले आहे असे म्हणतात. बरीच मंडळी म्हटली की कशाला वेळ घालवतेस असले वाचण्यात त्यातून काहीही फायदा नाही. हे वाचले किंवा नाही वाचले तर रोजच्या जीवनात काही फरक पडत ऩाही. पण एकदा उत्सुकता चाळवली की आपण त्या गोष्टीच्या मागे लागतोच. काही नाही तरी खूप संस्कृत शब्द जे आपण नेहेमी वापरतो त्यांचे वेगवेगळे अर्थ कळले. मजा आली. काही श्लोकांचा अर्थ कळत होता पण बरेच समजत नव्हते. ४-५ उपनिषदांबद्दल वाचले. इथे २ व पुढच्या भागात २ बद्दल काय वाटते ते लिहायचा विचार आहे. काही लोकांनी इंटरेस्टही दाखवला आणि आम्ही वाचू असे सांगितले.

 सुरूवातीला इंटरनेट वापरून वेदावर काही सर्च केले की इंद्र, अग्नि, वरूण या देवतांबद्दल माहिती मिळे. त्यांचे महत्व व पूजा यावर विशेष भर दिसतो.  निसर्गाला खूप महत्व व त्याच्या संवर्धनाबद्दल माहिती आढळते. आपल्या जीवनात पंचमहाभूतांचे महत्व आहे. त्यामुळे त्यांची पूजा करणे साहजिक वाटते. बरीच मंडळी म्हणतात की नुसता उपदेश भरला आहे या उपनिषदात. मलाही काही पुस्तके वाचताना बोअर झाले पण नंतर इतर माहिती पण मिळाली. निसर्गाचा समतोल राखायचा असेल तर साहजिकच वागण्यावर बंधने येतात व उपदेश ऐकल्यासारखे वाटते.

ईशोपनिषद - इ स पू ५५०० वर्षे साधारण काळ.  हे उपनिषद मूळ संहितेत...ग्रंथात आहे.

 आपली उत्पत्ती व मरणोत्तर काय होते यावर बरीच चर्चा आढळते.  हे दोन्ही प्रश्न अजून शास्त्रज्ञांना सतावत आहेत. आपल्या वेदात सगळीकडे आत्मा व  त्याबद्द्ल चर्चा आहे. या आत्म्याच्या पूर्णत्वाबद्दल या उपनिषदात माहिती आहे.

ओम पूर्णमदः पूर्ममिदं पूर्णात्पूर्णमुदच्यतेः
पूर्णस्य पूर्णमादायपूर्णमेवावशिष्यते आणि शांति मंत्र याबद्दल बरीच माहिती दिली आहे.

आत्मतत्व हे पूर्ण असते. पूर्णातून पूर्ण उत्पन्न होते. त्यातून काही काढून घेतले तरी ते आत्मतत्व पूर्णच रहाते.वनस्पति चे बीज, एकपेशीय प्राणी या स्वतःसारखे दुसरे निर्माण करू शकतात. डी एन ए नवीन डी एन ए बनवू शकतो. अनेक वेळा निर्मिती करू शकतो. मनुष्यात व अनेक प्राण्यात मात्र स्त्री व पुरूष मिळून जे बनते त्यातील फक्त झायगोट(बीज) हा अनेक पेशी निर्माण करू शकतो. ते पूर्ण असते. ठराविक कालान्तर ही क्रिया थांबते व नंतर जे निर्माण होते (मूल) ते मात्र पूर्ण नसते.(नुसता पुरूष अथवा नुसती स्त्री ही मूलाला जन्म देउ शकत ऩाही.) अणू ही अपूर्ण आहे. अणू ज्या लहानात लहान कणापासून बनलेला आहे त्यात ब्रम्ह आहे तो परममहान पूर्ण आहे.

सायन्स चँनेलवर डार्क मँटर वर मधे एक फिल्म पाहिली.  त्यात डार्क मँटर चे जे वर्णन होते ते ऐकून आपल्या पुस्तकातून ब्रम्हाचे वर्णन वाचतो आहोत असे वाटले. रंग नाही, रूप नाही, सगळीकडे असते, त्याचा नाश करता येत नाही, सगळे ब्रम्हांड त्याने धरून ठेवले आहे वगैरे.
या उपनिषदात हेही सांगितले आहे की सर्व गतिमान गोष्टीत ईश्वराचा वास आहे. जेथे गति आहे तेथे शक्ती आहे. ईशतत्व हे अचल, मनापेक्षा वेगवान आहे. विद्या व अविद्या एकत्र कराव्यात म्हणजेच आयुष्यात अध्यात्म व भौतिकाची जोड करावी. नुसतेच एकाच्या मागे लागू नये. उपासना करावी. तन मन वाहून घेउन एखाद्या गोष्टीचा अभ्यास करावा.  लगेच यश मिळत नाही. किमान एक तप तरी आराधना करून मग फळाची अपेक्षा करावी. आजकालच्या रिअँलिटी शोज च्या जमान्यात हे लोकांना कितपत पटणार माहित नाही. यासाठी शरीर चांगले ठेवणे महत्वाचे. मग नियमाने वागणे आलेच, उपदेश आलाच. जगात खरे लपविण्यासाठी पुष्कळ मार्ग असतात पण आपण नीट पडताळून गोष्टी घ्याव्यात. पैसै, संपत्ती, मोह, माया हे सगळे सत्य लपवू शकतात. तेव्हा त्याच्या आधीन होउ नये.

सूर्य हा आपला स्वामी आहे. त्यात ब्रम्हतत्व आहे,  पण तो एकटाच नाही असे अनेक सूर्य आहेत. त्याला प्रजापतीचा मुलगा म्हटले आहे. इथे अनेक ब्रम्हांडांची कल्पना मांडली आहे.  ब्रम्ह ही जी एक महान शक्ती आहे ती अनेक सूर्यांना शक्ती देते. ब्रम्हदेवाचा दिवस व रात्र असे आपण लहानपणापासून ऐकत असतो. त्यात तथ्य आहे. आजकाल विश्वाचे वय शास्त्रज्ञ सांगतात. त्याचा संबंध या दिवस रात्रीशी सांगतात. वातावरणाचा जो पट्टा भोवताली आहे त्याबद्दल माहिती दिली आहे. यालाच काही लोक विष्णूरूप म्हणतात. परवाच एक माहितीपट पाहिला ज्यात तुम्ही  वाहनातून वर जाउन वातावरणाचा पट्टा अनुभवू शकता. हा थर आपल्या पृथ्वीला सुरक्षित ठेवतो.

 कठोपनिषद

नचिकेताच्या गोष्टीने या उपनिषदाची सुरूवात होते.  नचिकेताचे वडील त्याचे दान मरणाला करतात. तेव्हा नचिकेत यमाकडे जातो. त्याला यमाची भेट हाण्यास ३ दिवस थांबावे लागते, म्हणून यम त्याला वर देतो. या बदल्यात नचिकेत त्याला मरणानंतर काय होते याबद्दल प्रश्न विचारतो. यम सुरूवातीला उत्तर द्यायचे टाळून त्याला बरीच प्रलोभने दाखवतो. पण नचिकेत पिच्छा सोडत नाही.


यमाने स्वर्गाची व्याख्या केली आहे.  हा वातावरणाचा सर्वात वरचा पट्टा - त्याला द्यू लोक असेही म्हणतात. इथे आनंद आहे. मरण नाही. प्राणमय, मनोमय व विज्ञानमय देह इथे प्रवेश करतात.  हे सर्व वायुरूप असतात.

आत्मा कसा असतो - हे परत काही श्लोकात सांगितले आहे. तो बघण्यासाठी श्रेयस व प्रेयस मधील श्रेयस घ्यावे. विद्या व अविद्येचा समतोल ठेवावा. आत्मा हा अणूहून अणू असतो तसाच ब्रम्हांडाएवढाही असतो. नचिकेत अग्नीची उपासना करावी. आवश्यक तेवढ्या गोष्टी घेउन(खाणे, पिणे) उपासना करावी. जास्त हव्यास करू नये. शब्द, रूप, रस, रंग रहित असा आत्मा आहे. त्याची नेमकी जागा दाखवता न आल्याने त्याला गूढात्मा असेही म्हटले आहे.आत्मा ही एक शक्ती आहे. निर्जिव वस्तूत आत्मा आहे पण जीव नाही. सजीव वस्तूत दोन्ही असते. ओम हे परम आहे. अक्षर आहे तसेच शब्द आहे. ते ब्रम्हपद आहे. हे परम तत्व कोठून आलेले नाही ते अनादि अनंत आहेच. चिरंतन तत्व आहे. म्हणून सनातन, पुराण आहे.
आत्मज्ञानाचा अनुभव ---सूक्ष्म देहालाच आत्मज्ञान प्राप्त करून जड देहाला देता येते.  हे झालेले ज्ञान शब्दात वर्णन करता येत नाही. निर्गुण, आनंदमय अशी ही अवस्था असते. आत्मा सर्व शरीरात आहे पण त्याला शरीर नाही. आतमज्ञान नुसत्या बुद्धीने, तत्वज्ञानाने होत नाही. शुद्ध वागणूक ठेवून मन व पंचेंद्रिये शांत केली की शक्यता वाढते. प्रत्येकाला तरीही हे ज्ञान होईल असे सांगता येत नाही. ज्याला आत्मज्ञान होते तो आत्म्याबद्दल जाणतो पण तो स्वतच आत्मा झाल्याने इतरांना सांगू शकत नाही.  (या संदर्भात दीपस्तंभ मधले काही लेख वाचलेले आठवतात. त्यात बरीच चरित्रे आहेत ज्यांना आत्मज्ञान झाले होतो. त्यानीही हा अनुभव वर्णन करता येणार नाही असे म्हटले होते पण त्याचबरोबर तेजाचे दर्शन झाले असे म्हटले आहे. विवेकानंद, स्वामी रामकृष्ण परमहंस). आत्मा शरीरात रहातो व ११ दारांनी ब्रम्हाशी मंपर्क करू शकतो. पाच ज्ञानेंद्रिये, पाच कर्मेंद्रिये व मन अशी ती ११ दारे. परमात्मा हा शुद्ध असतो. शरीरात प्राण व अपान हे दोन वायू आहेत. प्राण  वर नेतो व अपान खाली नेतो. आत्मा, जीव व मन असे तीन नचिकेत वर्णन केले आहेत.
शरीरातील आत्मतत्व - आत्मा याला शरीराची मर्यादा असते. बाहेर जे ब्रम्ह पसरलेले असते ते अमर्याद असते. सर्व आत्मे मिळून परमात्मा बनतो. परमात्मा व ब्रम्ह मिळून परब्रम्ह होते. ब्रम्हज्ञान झाल्यावर परत जन्म नाही. मनुष्यजन्मातच हे ब्रम्हज्ञान होउ शकते म्हणून मनुष्यजन्म व त्यात केलेली कर्मे महत्वाची. स्वच्छ दर्शन फक्त मनुष्यलोकात होते. मेल्यावर पितृलोकात ब्रम्ह स्वप्नासारखे दिसते. स्पष्ट दिसत नाही व कमी समाधान मिळते. गंधर्वलोकात पाण्यातील प्रतिबिंबासारखे दिसते व ब्रम्हलोकात सावलीसारखे दिसते.

आत्मज्ञानहे चैतन्य लहरीरूपात आहे. ते कुठुन मिळते ते वर्णन काही श्लोकात केले आहे. यासाठी अश्वत्थ वृक्षाचे रूपक घेतले आहे. गीतेतला श्लोक उर्ध्वमूल अधशाख इथ आहे. वर मूळ व खाली शाखा असा हा सर्वव्यापी वृक्ष आहे. आपल्या शरीरात मेंदूतून चैतन्य सर्व पेशींपर्यंत पोचते. पृथ्वीवर सूर्याच्या मुळे शक्ती येते. मूळ नक्षत्राशी आकाशगंगेचे केंद्र आहे. तेथून ग्रह तारे यांना चैतन्य मिळते. आपल्या आकाशगंगेसारख्या अनेक आकाशगंगा आहेत त्यांना ब्रम्हापासून चैतन्य मिळते. मला हा भाग व हे रूपक फार आवडले. कारण हे सगळे पटते.

ब्रम्ह---अनेक आकाशगंगा---प्रत्येकात लाखो ग्रह तारे----अगणित जीव सृष्टी,मनुष्य---अनेक पेशी असा हा चैतन्याचा प्रवास होतो.  या चेनमध्ये ब्रम्ह हा सर्वात मोठा अश्वत्थ, त्याखाली अनेक आकाशगंगांचे  अश्वत्थ, त्याखाली अनेक ग्रह तारे त्यापासून चैतन्य मिळवणारे अगणित जीव आणि शेवटी आपल्या शरीरातील अश्वत्थ जो मेंदूपासून चैतन्य घेतो.
गेल्या काही वर्षात आकाशगंगा व कृष्णविवरांबद्दल बराच अभ्यास होत आहे व माहिती मिळत आहे.

आपण कसे आलो - किंवा हे जग कसे तयार झाले याबद्दल पुढे माहिती दिली आहे.  सुरूवातीला एक ब्रम्हतत्व होते. आकाश आणि वायू मिळून अंभ तयार झाले. त्यानंतर मरिची(तारे) म्हणजे तेज तयार झाले. हे तेज शुद्ध आहे. शुद्ध तेज मरत नाही म्हणून ते अमर आहे. मग पाणी व पृथ्वी तयार झाले. त्यातून पुढे सजीव देह तयार झाले. मग पंचमहाभूतांच्या सहाय्याने शरीरे निर्माण झाली. मुरूवातीला जो अभू होता त्याच्यापलिकडे काय आहे ते सांगता येत नाही. मरिची मधून तारे नष्ट होणे व परत तयार होणे चालू असते, त्यातून गँस तयार होतो तोच अंभ. (हे बिग बँंग थिअरी मध्ये आपण बघतो). या क्रियेत अनेक वस्तू तयार होतात. वस्तू या अणू रेणू पासून बनतात व अणू रेणू परममहान(परमतत्वापासून) पासून बनतात. थोडक्यात या परमतत्वाला आपण अनेक रूपात पहातो. ( वी आर चिल्ड्रन आँफ स्टार्स ही डाँक्युमेंटरी हे छान एक्सप्लेन करते.) हे सगळे पाणी, तेज, अग्नि यातून निर्माण झाले.चैतन्य ही मूलभूत शक्ती आहे. सुरूवातीला जे परमतत्व होते ते हलल्यावर सगळे जग निर्माण झाले. प्रथम त्याचे दोन भाग झाले. हे भाग एकमाकांचे पूरक होते जसे गार गरम, व्यक्त अव्यक्त, उमा काली, प्रकाश अंधार इ. हे दोन भाग एकत्र केले तर शिवतत्व दिसेल पण तेव्हा हे जग नष्ट होईल.
पृथ्वीचे आयुष्य -एका कल्पात १४ मनु(४३२ कोटी सौरवर्षे) सांगितले आहेत. सध्या काहीतरी ९-१० वा मनु चालला आहे. म्हणजे प्रलयाला अजून बरीच वर्षे आहेत.  हे पुराणांमधे जास्त सांगितले आहे. त्यानंतर परत सगळे नष्ट होउन परत नव्याने सुरू होते. सध्या ब्रम्हांड प्रसरण पावत आहे. सगळे ग्रह तारे, आकाशगंगा हे एकमेकांपासून दूर जात आहेत. तरीही एकमेकांना धरून आहेत. काही ठराविक काळानंतर हे सगळे कोलँप्स होईल परत एका बिंदूत जाईल व पुन्हा नव्याने सगळे तयार होईल. अशी अाकुंचन प्रसरणाची क्रिया या ब्रम्हांडाची सतत चालू राहील.

मनुष्य बसलेला असताना  आत्मा दूर जाउ शकतो. झोपलेला असताना जड देहाशी संपर्क ठेउन बरात दूर जाउ शकतो. यावेळी त्याचे देहाशी संधान किंवा संबंध असतो.
प्राणमय देह - पृथ्वीवर हिंडतो.
मनोमय देह - हा वातावरणात कितीही उंच व गुरूत्वाकर्षणाच्या टप्पयात कुठेही जाउ शकतो.
विज्ञानमय देह - परग्रहावर जाउ शकतो.
आनंदमय देह - ग्रहमालेच्या पलीकडे जाउ शकतो.
या सगळ्यावर विश्वास ठेवणे कठीण वाटते पण आपण वरीच उदाहरणे बघतो ज्यांना असे अनुभव येतात. हे सगळे सिद्धिने प्राप्त होते.

मृत्यूनंतर काय होते याबद्दल पुढे बरेच श्लोक  स्पष्टीकरण देतात. आत्मा मरणानंतर जडशरीरातून चार कोष घेउन बाहेर पडतो व नवीन अन्नमय कोषात शिरून परत जन्म घेतो असे सांगितले आहे. देह गेल्यावर जीव आत्म्यात मिळून भोवतीच्या ब्रम्हात विलीन होतो. जीव बाहेर पडण्यासाठी १०१ वाटा असतात. त्यातील डोक्याकडून बाहेर जातो तो ब्रम्ह होतो. आपल्या पूर्वकर्मफलांचे गाठोडे आपण घेउन जातो. काही देहांचे स्वामी शरीर धारणेसाठी एखाद्या योनीत जातात तर काही स्थिर अणूंच्या मागे जाउन ब्रम्हरूप होतात. प्राण हे प्राणमय देहाशी, वासना मनोमय देहाशी, आणि कर्म विज्ञानमय देहाशी निगडीत असतात. आतिसूक्ष्म किंवा अतिमहान असे रूप घेणे शक्य असते.
मेनी मास्टर्स मानी माईंडस या पुस्तकात एका डाँ ने त्याच्या पेशंटचे अनुभव दिले आहेत. त्यातले लोकांचे अनुभव व आपल्या या उपनिषदात सांगितलेल्या गोष्टी खूप जुळतात. आता त्यांनी आपली फिलाँसाँफी वाचून फिक्शन लिहिले का खरेच पेशंटनी पुनर्जन्माचे अनुभव सांगितले माहित नाही. मृत्यूनंतर काही लोकांना गेलेला माणूस दिसतो तो त्याच्या लकबीसकट, गुणधर्मासकट दिसतो. हा वायुमय देह असतो व तो सूक्ष्म वा मोठे रूप घेउ शकतो. साधारण ३ पिढ्या इतका वेळ परत जन्म घ्यायला लागू शकतो म्हणून श्राद्धात तीन पिढ्यांचे स्मरण करतात.

हे सगळे वाचल्यावर असे वाटले की पुनर्जन्म, त्यासाठी पाप पुण्याचा हिशोब हे सगळे फार क्लिष्ट आहे समाज सुरळीत चालावा म्हणून घातलेले हे नियम असावेत.  पण त्याच वेळेला इजिप्शिअन संस्कृतीतील याच कल्पना आठवल्या. तसेच डी एन ए मध्ये किती माहिती साठवलेली असते व ती पुढच्या पिढीत ट्रान्सफर होते हेही आठवले. माणूस हा सगळीकडे जर सारखा तर इतर धर्मात या कल्पना का नाहीत असाही प्रश्न पडतो. बघू सायन्स काही दिवसांनी याची उत्तरे देइल याची मला खात्री आहे. सध्या चाललेले अँस्ट्राँनाँमीचे संशोधन व मेंदूवर चाललेले संशोधन यातून नक्कीच काहीतरी उत्तरे मिळतील.

इतर उपनिषदे भाग ३ मध्ये....





Tuesday, October 2, 2012

वेदातील विज्ञान .......भाग १

वेदातील विज्ञान .......भाग १

आपण आता २१ व्या शतकात आलोत.  रोज नवीन शोध, टेक्नाँलाँजी याला आपण सामोरे जातो.  या सगळ्यावर मात करणारे आजारही आपण बघतो. संशोधन हा आजच्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आपण बघतो आहोत. त्याच्या सहाय्याने अनेक कोडी आपण उलगडतो आहोत. या सगळ्यात आपण कोण, कोठून आलो हा शोध अजून लागला नाही. आपल्या उत्पत्तीच्या मुळाकडे आपण जात आहोत पण नक्की  उत्तर अजून सापडलेले नाही. काही वर्षात ते नक्की सापडेल असे आताच्या संशोधनाकडे पाहून वाटते.

या सगळ्या चर्चेत -आपल्या वेदात सगळे दिले- आहे हे वाक्य खूपदा ऐकायला येते.  हे सतत ऐकून उत्सुकतेपोटी मी उपनिषदाबद्दल वाचायला सुरूवात केली. मला कधीही कुठल्या स्वामी, गुरू यांचे प्रवचन ऐकताना कंटाळा येतो. तेच तेच ऐकल्यासारखे वाटते. चांगले वागा हे सांगण्यासाठी एवढी उदाहरणे देतात की बस. शेवटी परिस्थिती आणि तेव्हा सदसदविवेक बुद्धीने घेतलेले निर्णय महत्वाचे. हे निर्णय घेण्यात संस्कार, त्या व्यक्तीचे अनुभव, परिस्थिती या सगळ्यंाचा वाटा असतो. त्याला एक माप लावता येत नाही. या सगळ्यात बरेच वेळा चुकीचे निर्णय घेतले जातात, चुका होतात पण हेच जीवन आहे असे वाटते. अर्थात याला काही अपवाद आहेतच. काही प्रवचने खूप छान असतात पण अगदीच थोडी. मला त्यापेक्षा पुस्तके वाचणे आवडते.

आपल्याकडे का कुणास ठाउक अध्यात्म या विषयाचा खूप बाउ केलेला आहे. हा विषय, त्यावरची पुस्तके,  चर्चा हे सगळे ५० नंतर करायचा विषय आहे असे समजले जाते. असे असण्याचे कारण नाही. वेगवेगळ्या लेव्हल्स वर ही माहिती उपलब्ध असणे आवश्यक आहे. बाहेर रहाताना अथवा भारतातच वेगवेगळ्या धर्माच्या लोकांशी संबंध येतो. तेव्हा आपल्या धर्माबद्दल माहिती असणे महत्वाचे आहे. इंटरनेटवर बरीच माहिती असते पण थोडक्यात असे काही नसते. आता बरीच मंडळी म्हणतील की आम्ही कुठलाच धर्म पाळत नाही मनुष्यधर्म पाळतो, असे असले तरी माहिती असणे आवश्यक आहे किंवा एखादी सर्वमान्य वेबसाईट असणे आवश्यक आहे. अगदी शाळेपासून आपला व दुसरे मानतात तो धर्म याबद्द्ल माहिती असणे आवश्यक आहे. आणि त्याबद्दल आदर असायला हवा. तसे बघता सगळ्या धर्मात सगळ्यांशी चांगले वागा असेच सांगितले आहे तर प्रत्येक युद्ध हे बहुदा धर्मयुद्धच का असते हे न सुटलेले कोडे आहे.  आजकाल जगात जे चालले आहे ते बघितले तर या गोष्टीची गरज नक्की जाणवेल.

सायन्स चँनेल वरच्या या फिल्म्स बघितल्या की बराच विचार केला की शास्त्रज्ञांची व धाडसी लोकांची कमाल वाटते. आता अवकाशात जाउन चक्क आपला ग्रह बघता येतो. गणिताच्या सहाय्याने अनेक तारे अभ्यासता येतात.  पुढच्या वर्षी नासा अँस्ट्राँईड वर उतरणार आहे. वातावरणाचा थर तिथे जाउन अभ्यासता येतो. आपली सूर्यमाला व इतरांचा अभ्यास चालू आहे.  शेवटी खरे तर आपण कसे आलो हा विचार केला तर घाबरायलाच होते.  पण हळूहळू हे सगळे आपल्या कथा पुराणाशी कुठेतरी मेळ खाते. बरेच साहित्य हे कोड भाषेत असल्याने त्याचे अर्थ लागत नाहीत. इतर देशात पण जुने दस्तऐवज सांकेतिक भाषेत आहेत. धर्मवेड्या लोकांपासून लपविण्यासाठी हे करावे लागे.  त्यामुळे वेगवेगळे अर्थ निघतात व वाद होतात.

आजकाल अध्यात्म व विज्ञान या गोष्टींची सांगड घालणारे बरेच दिसतात. माझ्यासारखी काही मंडळी असतात त्यांना काहीतरी सिद्ध केलेले असले की त्यावर विश्वास बसतो. काही लोकांना जुन्या ग्रंथांवर पूर्ण विश्वास असतो. बरेच लोक या अशा पुस्तकांच्या विरोधात असतात. त्यांचे म्हणणे असते की शोध लागल्यानंतर ही पुस्तके लिहिली गेली तेव्हा हे सगळे जुळवून लिहिले आहे,  कुठुनतरी अर्थ लावायचा आणि शोधांशी सांगड घालायची. मग मी जुन्या लोकांनी लिहिलेले वाचले (शोध लागण्यपूर्वीचे) तर दोन्हीत बरेच साम्य आढळले.  अँस्ट्राँनाँमी वर हल्ली मी खूप फिल्म्स पाहिल्या आणि मग आपले जुने ग्रंथ व आता लागणारे शोध यात नाते आहे असे जाणवू लागले. हल्ली इतक्या प्रकारचे रिसर्च चालू आहेत की येत्या काही वर्षात आपण कोण, कसे आलो, विश्व कसे निर्माण झाले याची उत्तरे नक्की मिळतील असे वाटते. अजून काही वर्षात वेदातील विज्ञान व शोधातील विज्ञान एक होईल असे मला नक्की वाटते. भारतात निदान एखाद्या विद्यापीठात यावर व्यवस्थित संशोधन व्हावे व आंतरराष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध प्रकाशित व्हायला पाहिजेत.  तरच हे वेदात सगळे होते हे म्हणणे सिद्ध होईल. नुसते म्हणणे काही कामाचे नाही.  पाश्चिमात्य जगात शोध लागले तरी ते सगळ्या जगाला उपयुक्त असतातच पण जर भारतीयांनी काही भर घातली तर आपल्या  पूर्वजांच्या कष्टाचे चीज होईल हे नक्की.





Monday, September 10, 2012

लहानपण देगा देवा....

काल टी व्ही वर मेलिँडा गेट्स ची मुलाखत पाहिली. मिळकतीतील बराच हिस्सा त्यांनी दान केला आहे. अमेरिकेतील शिक्षणमान खाली घसरले आहे, मुले काँलेजला कमी प्रमाणात जातात म्हणून त्यांनी शिक्षणक्षेत्रात मदत करायचे ठरवले आहे. टीचर चांगली तर मुलांना शिक्षणात रस वाटतो म्हणून त्या दिशेने सुधारणेला सुरूवात केली आहे. टीचर ट्रेनिंग सारखे उपक्रम हाती घेतले आहेत. मला खरेच कौतुक वाटले, एवढा पैसा दान करणे सोपे नाही. आणि तो बरोबर ठिकाणी दान होतो का नाही हे बघणे फार आवश्यक आहे. गेट्स फाउंडेशन दोन्ही करत आहे.

यावर मैत्रिणिशी बोलत होते. ती एका शाळेत शिकवते. तिच्या वर्गातला एक मुलगा तिच्याशी बोलत होता.


मुलगा - मी जर हा आठवडाभर नीट वागलो तर मला वीक एण्डला माझ्या वडिलांकडे जायला मिळणार.

टीचर - हो का...(तिला कल्पना आली की हा विभक्त कुटुंबातला आहे).

मुलगा - मला ३ डँड आहेत

टीचर - काय (धक्का बसलेला न दाखवता)

मुलगा - मी माझ्या आईकडे रहातो. आई गँरी बरोबर रहाते, म्हणून तो माझा एक डँड. मी, आई, गँरी, सुझान . जँक असे आम्ही रहातो. सुझान व जँक ही गँरी ची मुले आहेत.

टीचर - मग तुझा डँड...

मुलगा - तो दुसरीकडे रहातो. टाँम व बाँब एकत्र रहातात. म्हणून ते माझे अजून २ डँड.... मी,आई, गँरी, सुझान व जँक असे एक घर व मी, डँडी व बाँब हे एक घर आणि मला दोन्हीकडे रहायला आवडते.......

टीचर - वा छान......मग नीट वाग म्हणजे तुला जायला मिळेल तिकडे. ( ती कल्चरल शाँक मध्ये)

हा मुलगा वय वर्षे ६, आणि हे सगळे स्पष्टपणे बोलतोय.....काय हे कल्चर.......आजच्या पुढारलेल्या देशातील....

अमेरिकेत वरेच ठिकाणी हे अगदी काँमन आहे. आई वडील विभक्त, मुले काही दिवस आईकडे काही दिवस वडिलांकडे. अभ्यास हा महत्वाचा नाही..त्यांना आई, वडील भेटणे व त्यांचा सहवास महत्वाचा वाटतो. होम वर्क ला महत्व कमी दिले जाते. मुलांच्या नजरेतून पाहिले तर बरोहर वाटते कारण ५-६ वर्षाच्या मुलांचे विश्व हे आई, बाबा, बहिण, भाउ यात गुंतलेले असते. साहजिकच अभ्यासाकडे कमी लक्ष दिले जाते. मोठेपणी जर घर पक्के नसेल, सतत वेगळ्या घरात रहावे लागले तर मुलांना आवडत नाही. या सगळ्याचा शेवटी शिक्षणावर परिणाम होतो.

मुलांना पटकन स्वताच्या पायावर उभे रहायचे असते व स्वातंत्र्य व स्टेडी आयुष्य हवे असते. मग जेमतेम हायस्कूल करून मुले स्वताच्या पायावर उभी रहातात व काँलेज दूर रहाते. अर्थात या परिस्थितून शिकणारी पण खूप मुले आहेत. हुशार पण आहेत पण जनरल चित्र असे दिसते.....

एक मात्र खरे, सोसायटीत आसा प्रकार बरेच ठिकाणी घडतो म्हणून मुलांना सगळे माहित असते. लपवाछपवी नाही, कोणी हसतही नाही. आपल्याकडे ओपनली कोणी बोलत नाही कारण सोसायटी वेगळी आहे.... आजकाल सगळे प्रकार मात्र चालू असतात. एखाद्याला २ डँड असू शकतात. २ आया असू शकतात. सगळे मान्य आहे.

५-६ वर्षाच्या मानाने केवढी ही गुंतागुंत......आणि आपण म्हणतो लहानपण दे गा देवा.... लहानपण किती सुखाचे...






काही रागातील गाणी

आमच्या इथे बरीच मंडळी गाणे पेटी तबला शिकतात. दर आठवड्याला जमतात अधूनमधून छोटा कार्यक्रम करतात. गेल्या आठवड्यात असाच एक कार्यक्रम झाला. रागावर आधारित गाणी , त्यातला राग कसा ओळखावा अशी थीम होती. संकल्पना समीर ची होती. रागाचे चलन, त्याचा भाव माहित असले तर गाण्यात ते हळूहळू ओळखता येतात. लगेच जमत नाही पण खूप ऐकून कल्पना येते.

मागे एका पोस्ट वर या वर थोडे लिहिले होते आता थोडी गाणी ऐकवते. आधी रागाची माहिती मग गाणी असे देत आहे.
शूटिंग फार छान नाही पण चालू शकेल.

ललत, यमन, मालकंस, दरबारी भैरवी हे राग घेतले होते.

सुरूवात
ललत गाणे

ललत गाणे - यम माहिती
-
बंदिश येरी आली
आधा है चंद्रमा
आपके अनुरोधपे
निगाहे मिलानेको जी चाहता है

बंदिश मुख मोर मुख मोर
मालकंस माहिती

तू छुपी है कहा
मन तरपत
बंदिश जिनके जियामे
झनक झनक - भैरवी माहिती
भैरवी सावरे
तू गंगा की मौज मै

Saturday, September 8, 2012

अंदमान चे ’काळे पाणी’...........




अंदमान चे ’काळे पाणी’...........

सावरकर आणि काळे पाणी यांच्याबद्दल इतिहासात वाचून बरीच वर्षे झाली होती. आपण कधी ही जागा मुद्दामहून बघायला जाउ असे काही वाटले नव्हते. रियाधला असताना शाळेतली एक मॆत्रिण अंदमान ला रहाणारी (माहेर तिथे होते) होती. तिच्याकडून या जागे बद्दल बरेच ऎकले होते. माहेर असल्याने जरा जास्तीच प्रेम होते तिचे या जागेवर. रियाधहून दर वर्षी आमच्या दोन ट्रीप्स भारतात होत होत्या. ९५-९६ साली आम्ही अंदमानला जायचे ठरवले. रियाध - मुंबई, मुंबई - मद्रास व मद्रास- पोर्ट ब्लेअर(अंदमान) अशी फ्लाईट होती. मुंबईत एका मॆत्रिणीकडे दिवसभर गप्पा गोष्टी करून रात्रीची फ्लाईट गाठायची होती. संध्याकाळी टी व्ही वर बातम्या बघत होतो तर आमच्याच रूट वरची फ्लाईट पडलेली दाखवत होते..थोडेसे टेन्शन आले पण ते बाजूला ठेवून प्रवासाला निघालो. मुंबई मद्रास असा पहिला टप्पा पार पडला. मद्रास एअरपोर्ट फार छान सजवलेला होता. तिथल्या उंच उंच समया लक्षात राहिल्या. पुढ्ची फ्लाईट पहाटे होती. पूर्णपणे पाण्यावरून प्रवास होता. जाताना चेकिंग बरेच झाले. अंदमान ला ठराविकच फ्लाईट जातात त्यामुळे बुकिंग खूप आधीपासून करावे लागते. आम्ही गेलो १५ ऑगस्ट च्या सुमारास तेव्हा तिकडे जाण्यासाठी गर्दी होती.

अंदमानचा एअरपोर्ट दोन टेकड्यांच्या मध्ये आहे. तिथले लॅंडिंग खूप स्किलफुली करावे लागते. आपण पाण्यावर लॅंड होतो असे आधी वाटते. एअरपोर्ट अगदी छोटा आहे. तिथून लगेच आम्ही आमच्या हॉटेल वर गेलो. हे हॉटेल जरा गावाबहेर होते. बाहेर पडले की लगेच समुद्र भेट्त होता. एका बाजूला डोंगर, समोर समुद्र अशी छान सिच्य़ुएशन होती. तिथली बाग सुंदर होती. आम्ही १-२ साप हिंडताना पाहिले. आम्ही २ दिवसांनी दुसर्‍या हॉटेल मध्ये शिफ्ट झालो कारण इथून सगळे लांब पडत होते.

इथे येताना सेल्युलर जेल व स्नॉर्कलिंग या दोन गोष्टी या आमच्या अजेंडावर होत्या. अंदमान हे कमर्शिअली डेव्हलप झालेले नाही त्यामुळे हॉटेल्स, शॉपिंग जरा कमीच वाटले. एक प्रकारे चांगलेच आहे. लोकल्स व टूरिस्ट असे दोन प्रकार रस्त्यात लगेच ऒळखू येतात. इथे अमेरिकन्स व इतर गोरे टूरिस्ट बरेच दिसतात कारण बीचेस छान आहेत आणि स्नॉर्कलिंग व स्कू्बा त्यामानाने स्वस्त आहे. अजून जर रहायची व्यवस्था चांगली केली व खूप पब्लिसिटी केली तर भरपूर टूरिस्ट इथे येतील. पहिल्या दिवशी सकाळी गावात भटकलो मग मॆत्रिणीकडे गेलो. तीही सुट्टीवर आलेली होती. भरपूर गप्पा झाल्या. तिचे आई वडील बरेच वर्ष इथे रहातात. त्यांच्याकडून हिंडण्यासाठी महत्वाच्या टीप्स मिळाल्या. दुपारी बाजारात फेरफटका मारला. शिंपल्यापासून बनवलेल्या, काथ्याच्या वस्तू बाजारात भरपूर दिसत होत्या. कानातली, माळा, दिवे यांची खरेदी झाली. मी एक टेबल खरेदी केले ज्याला लाकडची तीन पाने तीन बाजूला असलेले डिझाईन आहे. मी ते अजून जपले आहे. दुपारी जेवायला अन्नपूर्णा नावाच्या हॉटेलात गेलो तिथले जेवण आम्हाला तिघांना पसंत पडल्याने पुढचे सगळे दिवस एक जेवण तरी तिथे घेत असू. शहाळी मात्र खूप शोधल्यावर मिळाली.

संध्याकाळी सेल्युलर जेल चा ’लाईट व साउंड’ शो पहायला गेलो. या जेलच्या बाहेर एक जुने झाड आहे. ते जेलमध्ये झालेल्या सगळ्या अन्यायाचे, अत्याचाराचे साक्षीदार आहे. ते झाड जणू आपल्याशी बोलते आहे अशी कल्पना आहे. त्याला ऒम पुरीचा धीर गंभीर आवाज दिलेला आहे त्यामुळे खूप छान इफ़ेक्ट येतो. नुसत्या लाईट्च्या इफ़ेक्ट ने व संवादांनी सगळी इतिहा्साची पाने आपल्यापुढे उलगडत जातात. सावरकरांनी इतक्या दूर राहून, कसा लढा दिला हे छान सांगितले आहे. ब्रिटीशांना सुरूवातीला अंदमान मध्ये फार इंटरेस्ट नव्हता कारण हवा दमट, बाकी सोई काही नव्हत्या पण नंतर स्वातंत्र्य लढ्यातील लोकांना इतरांपासून दूर ठेवण्यासाठी म्हणून अंदमानचा उपयोग त्यांनी करून घेतला. इथून कॆद्यांना कुणाशी संपर्क ठेवता येत नसे. कॆद्यांचे खूप हाल करत पण ते मेन लॅंड वर पोचत नसे. या जेलला सेल्युलर जेल म्हणत कारण प्रत्येकाला एका वेगळ्या खोलीत ठेवत व इतरांशी संपर्क करता येत नसे. कॆद्यांना बॆलासारखे जुंपुन तेल काढायला लावत, जंगल साफ करायला लावत. खाणॆ पिणे यांचे सदॆव हाल. सतत काहीतरी कारण काढून अमानुष शिक्षा करत. त्यामुळॆ याला काळ्या पाण्याची शिक्षा असे म्हणत. सावरकर इथे असताना ते भिंतींवर कविता, मनातले विचार लिहित. रोज ते पुसायचे व दुसर्‍या दिवशी परत लिहायचे. ने मजसी ने परत मातृभूमीला हे त्यांनी इथेच लिहिले असे म्हणतात. http://www.youtube.com/watch?v=GJfB7Nm8d4k
नंतर त्यांनी भूक हरताळ केला व इंग्रजांना नमवले. भारतभर या कॆद्यांचा आवाज पोचला व त्यांना थोड्याफार सुविधा मिळू लागल्या. नक्कीच ही जागा व हा कार्यक्रम बघण्यासारखे.....रात्री आम्ही समुद्रावर गेलो. चांदण्यात शुभ्र लाटा बघत किती वेळ बसलो ते कळलेच नाही. खूप छान हवा होती. मनात नुकत्याच पाहिलेल्या कार्यक्रमाचे चित्र होते.

दुसर्‍या दिवशी स्नॉर्कलिंग ची टूर होती. बोटीने साधारण १ तास प्रवास करून एकदम संथ पाण्यात घेउन गेले. तिथे दुसर्‍या छोट्या बोटीतून अजून आत नेले. इथे कोरल्स चा साठा आहे आणि लोकल्स तो चांगला जपत आहेत. जाताना प्रवास खूप छान आहे. दोन्हीकडे हिरवी झाडी, समोर निळे पाणी व अधूनमधून छोटी बेटे. शेवटि तर पाण्याचा रंग इतका सुंदर होता की मी बराच वेळ नुसतीच बघत बसले होते. जिथे सूर्याची डायरेक्ट किरणे पडली होती तिथे पाणी नुसते चमचम करत होते आणि खालचा तळ दिसत होता. निळा, निळसर हिरवा अशा खूप शेडस दिसत होत्या. इथे पूर्ण दिवस आम्ही घालवला. पाण्याला नुसते डोळे लावून खाली पाहिले की रंगांची दुनिया दिसत होती. वेगवेगळ्या रंगांचे मासे, कोरल्स यांचा नुसता खजिना आहे. अंदमानला आलो ते फार बरे झाले असे वाटले. नंतर हवाई, फ्लोरिडा इथली कोरल्स पाहिली पण अंदमानची सर त्याला नाही. बाकीच्या ठिकाणी मार्केटिंग खूप करून लोकांना आकर्षित करतात पण कोरल्स इथलीच छान आहेत असे म्हणावे लागेल. ज्यांना चांगले पोहता येत होते ते बरेच आतपर्यंत गेले. मी फर आत गेले नाही. इथल्या पाण्यात करंट खूप होते त्यामुळे लोकल्स जे सांगतील तसेच जावे लागत होते.

नंतर दुसर्‍या दिवशी आम्ही सकाळी रॉस आयलंड ला गेलो. पूर्वी ही ब्रिटीशांची समर कॅपिटल होती. आता तिथे सगळे जुने अवशेष व झाडे आहेत. हरणे पण खूप दिसली. तिथला बीच फार छान होता. जाण्यासाठी फ़ेरीची सोय होती. हा भाग जुना असल्याने तेवढा छान वाटला नाही पण त्यांनी तो तसाच जपला आहे. संध्याकाळी प्रसन्नने स्कूबा डायव्हिंग चा क्लास केला. पाण्याखाली जाउन मासे, कोरल्स बघणे यासाठी क्लास होता. फी पण भरपूर होती. पाठीला सिलींडर लावून, नाकाला नळी लावून पाण्याखाली श्वास घेण्याचे त्यांनी ट्रेनिंग दिले. आपण फिल्म मध्ये बघतो ते छान वाटते पण प्रत्यक्षात बरीच कसरत होती. चुकुन नळी सुटली, वरच्या बोटीशी संपर्क तुटला तर काय करायचे हेही त्यांनी शिकवले. दुसर्‍या दिवशी एका बोटीने सगळ्यांना आत नेले व २०-२५ फूट खाली नेले. खाली मासे बघितले. आपल्या डोक्यावर २५ फूट पाणी आहे हा विचार आला की जरा विचित्रच वाटत असावे. त्याचाही तो एक लक्षात रहाणारा अनुभव ठरला. आम्ही वरती बोटीत होतो. पाण्याखाली सगळे गेल्यावर जरा काळजीच वाटत होती.

शेवट्च्या दिवशी परत थोडी खरेदी झाली. दुपारी १५ ऑगस्ट ची परेड होती. मॆदानावर छान फ्लोट्स केले होते. भरपूर गर्दी होती पण आश्चर्य म्हणजे कुठेही धक्काबुक्की नव्हती. लोक सगळे भारतीयच होते पण अगदी जाणवेल इतकी शिस्त होती. अंदमान ला नेव्ही चे मोठे सेंटर आहे त्यंचे जवान सगळीकडे हिंडून व्यवस्था बघत होते. बाजूला भरपूर स्टॉल्स होते खाण्याचे व हस्तकलेचे. एक वेगळाच स्वातंत्र्यदिन भारतापासून दूर असलेल्या भारतात घालवायला मिळाला. रात्री एका रेस्टॉरंट मध्ये जेवायलो गेलो ते अगदी समुद्राच्या काठावर होते. समोर पाणी व टोकाला लाईट हाउस. मस्त पॉईंट होता.

काही वर्षापूर्वी सुनामीने केलेला कहर टी व्ही वर पहाताना फार वाईट वाटले. आपण जिथे जाउन आलो त्या जागेची झालेली हालत फार वाईट होती. पण आता अंदमान परत त्यातून सावरले आहे.

सकाळी अंदमान ला बाय करून आम्ही निघालो. विमानात शिरण्यापूर्वी कडक तपासणी होती. तेव्हा इतके चेकिंग होत नसे म्हणून जरा विचित्र वाटले. विमान वर चढ्ल्यावर खाली छान हिरवी बेटे दिसतात. हिंदीच्या पुस्तकात अंदमानला ’पाचूची बेटे’ म्हणतात असा एक धडा शिकवला होता ते आठवले आणि ती उपमा किती बरोबर होती ते पटले. ४-५ दिवस पाहिलेला निळा, पाचूच्या रंगाचा समुद्र डोळ्यासमोर होता. अंदमानचे ’काळे पाणी’ बघायला गेलो पण परत येताना मात्र अंदमानचे ’निळे हिरवे’ पाणी डोळ्यात घेउन आलो.

Tuesday, July 10, 2012

य़लोस्टोन व ग्रँड टिटाँन - एक अदभूत सफर

य़लोस्टोन व ग्रँड टिटाँन - एक अदभूत सफर

यलोस्टोन व ग्रँड टिटाँन ही दोन नँशनल पार्क बघण्याचा बरेच दिवस विचार चालू होता. शेवटी गेल्या महिन्यात हा योग आला.  भारतातून आलेले पाहुणे आमच्याबरोबर होते.  आमच्याकडे ३ दिवस व चार रात्री एवढाच वेळ होता. त्यासाठी बराच विचार करून ही ट्रीप आखली आणि भरपूर गोश्टी बघितल्या. तुमच्याकडे जर असाच कमी वेळ असेल तर तुम्हाला या माहितीचा उपयोग होईल.  इथे इतके निसर्गाचे चमत्कार आहेत की ते तुमच्याशी शेअर करावेसे वाटले.

यलोस्टोन हे अमेरिकेतील पहिले नँशनल पार्क. १८७२ मध्ये ते सुरू झाले.  मोन्टँना, वायोमिंग व आयडाहो स्टेट  ची बाँर्डर याला लाभली आहे. जगातल्या सर्वात मोठ्या ज्वालामुखीवर ते वसलेले आहे. ज्वालामुखीची इतर ठिकाणे समुद्र किंवा डोँगर अशा जागी आहेत पण ह्या ज्वालामुखीच्या बाजूला सगळी जमीन आहे, हे त्याचे वेगळेपण आहे. इथला व्होल्कँनिक खडक rhyolite आहे ज्यात सिलिका भरपूर प्रमाणात आहे.

हा पार्क चा नकाशा आहे ज्यावर अंतरे व ठिकाणे दाखवली आहेत. इथे स्पीड बराच कमी असतो हा लक्षात ठेवावे. वाटेत खाणे गँस याची सोय छान आहे. सिझनच्या सुरूवातीला वा हवा बिघडल्यास रस्ते तात्पुरते बंद करतात.

वेस्ट यलोस्टोन मध्ये राहिल्यास मध्यवर्ती पडते हे नकाशावरून लक्षात येइल.  या पार्कच्या वेबसाइटवर भरपूर माहिती दिली आहे ती जाण्यापूर्वी वेळ काढून जरूर वाचा.







थर्मल फिचर्स - जगातील सर्वात जास्त थर्मल फिचर्स या गायजर बेसिन मध्ये आहेत. ३०० पेक्षा जास्त गायजर्स इथे आहेत. गरम पाण्याचे झरे, वाफेची कुंडे भरपूर आहेत.


ओल्ड फेथफूल दर ९० मि ने उडतो.
  • गायझर - यासाठी उष्णता, पाणी, प्लंबिंग सिस्टीम व खडकातील फटींची गरज असते. खडकातून पाणी आत झिरपते. आत खूप जास्त उष्णता असल्याने पाणी उकळते. उकळत्या पाण्यमुळे खडकातील सिलिका बाहेर पडते व सिमेंट पाईप सारखे बारीक पाईप तयार होतात. या गोष्टीला बरीच वर्षे लागतात. वरून पावसाचे, बर्फाचे पाणी आत साठते.  साठलेल्या पाण्याचे प्रेशर त्यात भर घालते. उष्णतेमुळे पाणी  उकळून वाफ तयार होते व ती पाण्याला वर खेचते. अगदी सरफेसजवळ वाफेच्या खूप प्रेशरमुळे पाणी उंच उचलले जाते व हवेत उडते. प्रेशर कमी झाल्यावर इरप्शन थांबते. ओल्ड फेथफुल हा इथला सगळ्यात प्रेडिक्टेड गायझर. याचे कारण म्हणजे तो थोडा लांब आहे इतरांपासून म्हणून त्याच्या प्लंबिंग सिस्टीम मधे फारसा बदल होत नाही.
या एरिआत लहान मोठे आनेक गायजर्स आहेत. एकाच खडकातून निघाले तरी प्रत्येकाचे गुणधर्म वेगळे आहेत. स्टीमबोट सगळ्यात मोठा आहे. याची माहिती वाचून जर ते पाहिले तर जास्त मजा येइल. नुसते पाहिले तरी सुंदर आहेत.

हाँट वाँटर स्प्रिंग्ज   हे तयार होताना खाली प्लंबिंग सिस्टीम नसते. खालचे गरम पाणी वर व वरचे खाली असे कन्व्हेक्शन करंट मुळे पाणी उडते. याच्या बाँर्डरला मिनरल्स साठून लेस सारखा पँटर्न तयार होतो. पाणी जेवढे क्लिअर तेवढे जास्त गरम. या गरम पाण्यात वेगवेगळे बँक्टेरिआज, अल्गी वाढतात.  ते पाण्याला विविध रंग देतात. क्तिअर, पिवळा, केशरी, निळा, हिरवा असे मस्त रंग दिसतात.या मायक्रोआँरगँनिझम्स वर इतर प्राणी वाढतात व एक प्रकारची फूड चेन तयार होते.


ग्रँड प्रिझमँटिक स्प्रिंगचा हा एरिअल व्ह्यू. सगळ्यात मोठा स्प्रिंग. याचा फोटो काढायचा असेल तर बाजूच्या टेकडीवर जावे लागते. लांबचा ट्रेक आहे पण वरून छान दिसते. आम्ही पार्ट बाय पार्ट फोटो काठावरून काढले.रूंदी व खोली दोन्हीत याचा पहिला नंबर आहे.


  • मड पाँटस  ही या पार्कमधील अँसिडिक फिचर्स आहेत. जिथे पाणी कमी असते तिथे ही दिसून येतात. काही मायक्रोब्स हायड्रोजन सल्फाइड एनर्जी म्हणून वापरतात. ते या गँसचे विघटन करून सल्फ्युरिक अँसिड बनवतात. हे अँसिड कडेच्या खडकाचे रूपांतर मातीत करते. या अोल्या मातीतून बरेच गँसेस बाहेर पडतात त्यामुळे बुडबुडे  दिसतात. पाण्याचा साठा व हवामान यावर याची कन्सिस्टन्सी अवलंबून असते.
  • फ्युमारोल्स    जिथे पाणी कमी असते तिथे आतील उष्णतेमुळे त्या पाण्याची वाफ होते व ती बाहेर पडते. कधी कधी त्यातून आवाज येतो. जो एका डोंगरावर नीट ऐकता येतो. हिसिंग माउंटन वर तो ऐकता येतो.

या एरिआत आले की एकदम रहस्यमय वाटायला लागते. वाफ येत असते मधेच पाणी उडत असते. वेगवेगळे आवाज व वास यात असतात. डोळे, नाक कान सगळे बिझि असतात.

मँमथ हाँट स्प्रिंग्ज   - हे या पार्क मधले अजून एक थर्मल फिचर आहे. इथले खडक लाइम स्टोन या प्रकाराचे आहेत. पाणी वर येताना त्यात खूप विरघळलेले कँल्शिअम कार्बोनाट असते. वरती आल्यावर कार्बन डायआँक्साइड रिलिज होतो व कँल्शिअम कार्बोनाटचे थर साठतात.स्वच्छ पांढरे ट्रँव्हर्टाइन तयार होते इतके पांढरे की डोळ्याने नुसते बघताना त्रास होत होता. खडकावरून संथ व एका वेगात पाणी वहात असते.  जिथे उतार नसतो तिथे छोटे पूल तयार होउन त्यात पाणी साठते व मस्त निळसर पाणी दिसते. पांढरा पिवळा व केशरी रंग दिसतात. अर्थात हे रंग त्यात वाढणारे बँक्टेरिआ देतात. यातील काही टेरेसेस ड्राय दिसल्या पण इथे कधीही परत त्या लाइव्ह होतात त्यामुळे पुन्हा तुम्ही जाल तर वेगळे चित्र दिसते.  हे बदल यलोस्टोनमध्ये सगळीकडे दिसतात. जमिनीखोली जे बदल होतात, शेकडो छोटे  भूकंप होतात त्यामुळे पाण्याचा प्रवाह बदलतो व पाणी वेगळ्या पध्दतिने बाहेर पडते

इथल्या फायरहोल रिव्हर मध्ये  एवढे गरम पाणी व सिलिका मिसळते की ती थंडीत गोठत नाही.

काँटिनेंटल डिव्हइड- ही लाइन पाण्याच्या प्रवाहाची दिशा ठरवते. घराच्या कौलावर पडलेले पाणी जसे २ भागात वाहून जाते तसेच काँटिनेंटल डिव्हइड पाण्याची विभागणी करतो. ही लाइन डोंगरमाथे ठरवतात. यलोस्टोन मध्ये या डिव्हाइडच्या उत्तरेला पडलेला स्नो. पाउस हा झरे, नदी च्या रूपात अँटलँंटिक ओशन ला मिळतो तर साउथचे पाणी पँसिफिक ओशनला मिळते.  काही झरे असे आहेत की त्याचे पाणी दोन्हीकडे जाते कारण ते लाइन क्राँस करतात.

लाँगपोल  ठ्रीज - सध्या पार्कात या प्रकारची झाडे ८० टक्के आहेत. त्याच्या उंचीवरून हे नाव पडले आहे. वाटेत ठिकठिकाणी ही झाडे पडलेली दिसतात. ती न उचलता तशीच डिकंपोज होउ देतात. नवीन झाडे पण खूप दिसतात. त्याची लागवड रेंजर्स करत नाहीत तर नटक्रँकर नावाचे पक्षी करतात. ते आपल्या घशात डझनभर  पाइन कोन्स ठेवू
शकतात.उडताना वाटेत काही पडतात. हिवाळ्यासाठी हे कोन पक्षी जमिनीत लपवून ठेवतात. थंडीत त्यांना ते परत बरोबर सापडतात. त्यांनी खाउन जे उरतात त्यात नवी लागवड होते. अस्वले पण हा मेवा शोधून खातात. याशिवाय काही कोन्स झाडांना चिकटवल्यासारखे असतात. मेणासारख्या पदार्थाने ते चिकटलेले असतात. जंगलात जेव्हा आगी लागतात तेव्हा वरचे आवरण वितळते व ते बाहेर येतात.  किती योजनाबद्ध रीतीने लागवड होते पहा....

वन्यजीवन - या पार्क मध्ये माउंटन गोट, बायसन, कोल्हे, अस्वले, मूस, हरिणे दिसतात. आम्हाला अस्वल मात्र बघायला मिळाले नाही. त्यासाठी लमार व्हँलीत अगदी सकाळी किंवा अंधार पडताना जावे लागते.  अधूनमधून ट्रँफिक जँम करायला या प्राण्यांना आवडते.

ग्रँड कंनिय़न अाँफ यलोस्टोन
अनेको वर्षापूर्वी ज्वालामुखी व त्यानंतर ग्लेसिएशन या मुळे ही कँनिअन तयार झाली असे म्हणतात. वरेच पेंटर्स इथे जागोजागी तुम्हाला दिसताल. आर्टिस्ट पाँइंट मस्ट सी.  इथला खडक पिवळा दिसते. हा रंग सल्फरचा नसून आयर्न आँक्साइडचा आहे असे जिआँलाँजिस्ट म्हणतात. यावर अजून अभ्यास चालू आहे. या एरिआत अप्पर व लोअर फाँल्स आहेत दोन्हीही न चुकवावे असे. थोडे खाली उतरावे लागते दमछाक होते पण व्ह्यू जबरदस्त. लोआर फाँल पाशी २ छोटी ग्लेशिअर्स पण दिसतात. या सर्व ठिकाणांचे सौंदर्य कँमेरा वंदिस्त करू शकत नाही तेव्हा शक्य तितके डोळ्यात भरून घ्या व मनात साठवा.  पाण्याचा फोर्स व बाजूचा निसर्ग दोन्ही नजर खिळवणारा.

 पूर्वी पेंटर्सनी इथली चित्रे काढून काँंग्रेस मध्ये प्रेझेंट करून इथे पार्क करायचा आग्रह धरला होता. कलाकारांचे असेही योगदान महत्वाचे आहे.




पेट्रीफाइड  फाँरेस्ट पूर्वी या ठिकाणी वेगळ्या प्रकारची झाडे होती. आता जास्त करून लाँगपोल ट्ीज दिसतात. या गोष्टीचापुरावा हे फांरेस्ट देते. व्होल्कँनिक अँशखाली, चिखलाखाली बरेच वर्षापूर्वी ही झाडे गाडली गेली. अाँक्सिजनची कमतरता व झाडांनी शोषलेले सिलिका यामुळे या झाडांचे फाँसिल्स बनले. आता इरोजन मुळे जेव्हा वरचे लेअर्स निघाले तेव्हा ही झाडे दिसली व लाखो वर्षापूर्वींचा इतिहास डोळ्यापुढे आला. जवळपास १०० जाति इथे दिसल्या आहेत. याचा एक नमुना आम्ही मँमथ व्हिजिटर सेंटर च्या बाहेर पाहिला. आता कुंपण घालून ठेवले आहे कारण लोकांनी तुकडे पळवायला सुरूवात केली.



लेक मध्ये असे गरम  पाण्याचे गायझर्स दिसतात.
यलोस्टोन लेक हे लेक भूकंपाचा इफेक्ट ने बनलेले आहे. इतके मोठे आहे की त्याला समुद्र म्हणावे असे वाटते. पूर्ण फोटो काढणे अशक्य. समोर मस्त बर्फाच्छादित शिखरे दिसतात. पाण्याचा रंग सुंदर आहे. या लेक मध्ये बोटिंगची सोय आहे.


याच्या बाजूला वेस्ट थंब गायजर्स आहेत. वरती लेकचे गार पाणी व खाली गरम पाण्याचे झरे दिसतात. अगदी खोल हिरवे निळे पाण्याचे पूल इथे दिसतात.
रंग व पँटर्न्स

टाँवर फाँल
लाव्हाने बनलेले काँलम्स
लोअर फाँल विथ ग्लेशिअर

बायसन कळप
खोल स्प्रिंग वेस्ट थंब गायझर बेसिन
हिरवाई
फायरहोल धबधबा

बोर्डवाँकवरून दिसणारी वाफ













काही टिप्स....
  • शक्यतो वेस्ट साइडला हाँटेल चे बुकिंग करावे. आत मिळाले तर उत्तम पण ते वर्षभर आधी करावे लागते. शेवटच्या दिवशी टिटाँन बघून तिथे मुक्काम करावा . यात खूप कमी वेळात जास्त गोष्टी बघता येतात.
  • कधीही गेलात तरी थंडीचे कपडे न्यावेत. सतत बदलती हवा. टोपी, गाँगल, सन स्क्रीन मस्ट.
  • पिण्याचे पाणी जवळ ठेवावे, आत कमी मिळते.... तशी सोय आहे  पण ..
  • २-३ दिवस असतील तर पहिल्या दिवशी - ओल्ड फेथफूल, मिड वे व बिस्किट बेसिन सकाळी व कँनिअन व्हिलेज, दोन्ही वाँटरफाँल्स संध्याकाळी करावे.
  • दुसरा दिवस - मँमथ टेरेसेस, व्हिजिटर सेंटर सकाळी व लेक यलोस्टोन दुपारी करावे. वाटेत बरेच सिनिक स्टँप्स घेता येतात, वाँटरफाँल्स व वाइल्ड लाइफ बघता येते.
  • शेवटी टिटाँन पार्क.
  • हकलबेरी आइसक्रीम ची चव जरूर घ्या.
आम्ही व आमचे पाहुणे खाणे, पिणे व अनुभवणे एवढेच ३-४ दिवस करत होतो. जोडीला गाणीही होतीच. नंतर व्हिडिओ बघताना मस्त, वाँव, किती छान ही प्रत्यकाने दिलेली दाद पुनप्रत्यताचा आनंद देत होती.
इतके धगधगते ठिकाण असूनही, पूर्वी विनाशकारी भूकंप झालेले असूनही सध्या अनेक नयनरम्य गोष्टी आणि निसर्गाचे चमत्कार इथे अनुभवायला मिळतात. शक्य असेल तेव्हा या अदभूत सफरीचा अनुभव एकदा तरी प्रत्येकाने घ्यावाच.


ग्रँड टिटोँन पुढील भागात......

Saturday, March 17, 2012

लख लख चंदेरी....

आपण लहानपणापासून चंद्र, तारे, सूर्योदय, सूर्यास्त, नक्षत्रे ही सगळी लखलखणारी दौलत पहात मोठे होतो. चांदण्यात फिरणे हा एक मोठा आनंद देणारा अनुभव असतो. अतिशय शांत व शीतल अनुभव. गेल्या वर्षी झायान कँनिअन मध्ये तारकांनी इतके गच्च भरलेले आकाश पाहिले की बस. गावाबाहेर दिव्यांचा प्रकाश कमी असतो तेव्हा हा अनुभव घेता येतो. बर्फामध्ये पण चांदणे फार सुंदर दिसते. वेगळाच प्रकाश दिसतो व गूढ वाटते. लहानपणी मला नेहेमी वाटायचे की कायम आकाशात तेवढ्याच चांदण्या असतात. जागा बदलतात हे हळूहळू लक्षात आले. गच्चीवर उन्हाळ्यात झोपले की नक्षत्रे व त्यांचे आकार बघणे हा खेळ नेहेमी असे. ध्रुव तारा, शनि, शुक्र व मंगळ यांची तेव्हाच ओळख झाली.

आपल्या पूर्वजांनी याच ग्रह तारे यांचा उपयोग करून मोठ्या सफरी पार पाडल्या. पिरँमिड सारखी मोठी बांधकामे करताना ही रेफरन्स साठी यांचा उपयोग झाला होता. शाळेत हळुहळु ग्रहण, आकाशगंगा, यांची ओळख झाली. खगोलशास्त्रज्ञाची माहिती झाली. या सगळ्यात गँलिलिओ ला फार महत्वाचे स्थान आहे. सूर्यमाला व ग्रहांचे फिरणे याबद्दल त्याने प्रथम माहिती दिली. त्यासाठी धर्माच्या राजकारणाचा खूप त्रास त्याने सहन केला. पण खरे शास्त्रज्ञ मागे रहात नाहीत..आपल्याकडे ही कारणे खूप दाखवली जातात संशोधन न होण्यासाठी...., सुरूवातीला या गोष्टीवर लोकांचा विश्वास बसत नव्हता पण जसे शोध लागत गेले लाकांचा विश्वास बसू लागला. यापुढे जाउन माणसाने चंद्रावर पाउल ठेवले व या क्षेत्रात भरपूर संशोधन होउ लागले. अर्थात या क्षेत्रात अनुमानावर बरेच काही अवलंबून असते. प्रत्यक्ष लँब नसते कारण हाय टेँपरेचर्स व एवढी हीट आपण प्रयोगशाळेत करू शकत नाही. गणिती आधार, दुर्विणीतून मिळालेले प्रकाशचित्र याच्या आधारावर सगळे चालते.

शास्त्रज्ञाना असे लक्षात आले की आपले युनिव्हर्स एक्स्पांड होते आहे यातून बिग बँग थिअरी ची कल्पना पुढे आली. फार पूर्वी एका बिंदूपासून सुरूवात होउन सगळे विश्व निर्माण झाले असावे असा निष्कर्ष निघाला व आपण कसे तयार झालो याबद्दल बरेच विचारमंथन होउ लागले. या विषयावर सायल्स चँनेल वर खूप छान डाँक्युमेंटरीज दाखवतात. तुम्हाला मिळाल्या तर जरूर पहा. काही ब्रिटीश तर काही अमेरिकन आहेत. या डाँक्युमेंटरीज बघताना आपले वेदातील सिद्धांत आपण बघतो आहोत असे वाटते. शून्यातून ब्रम्हांड, कण कण मे भगवान, जन्म मरणाचे फेरे,नवीन काही जन्मताना जुने नष्ट व्हावे ,जन्म व मरण हे प्रत्येक गोष्टीला असतेचगैरे माझ्यासारखे लोक समोर जेव्हा काही दिसते तेव्हा त्यावर विश्वास ठेवतात. त्यामुळे आता विज्ञान जेव्हा आपल्या उत्पत्तीबद्द्ल शोध घेत आहे मला आपले लिहिलेले जुने खरे वाटत आहे. अर्थात हे सिद्ध करताना पण वरेच वेळा गोष्टा मानाव्या लागतात. सगळेच समोर दाखवताा येत नाही. असो या पुढच्या लेखात त्याबद्दल लिहिणार आहे.

. आपण सगळे स्टारडस्ट आहोत असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. आपली आकाशगंगा ही अशी एकातयार झाली आहे. आपल्या शरीरातील सर्व एलिमेंटस ही स्टार्स पासून तयार होतातआपल्या नजरेच्या आड या चांदण्याच्या पल्याड आकाशात खूप गोष्टी घडत असतात. तारे सुद्धा जन्म मरणाच्या सायकल मधून जात असतात. आकाशात स्टार्स तयार होतात व काही (अनेको) वर्षानी नष्ट होतात. नष्ट होताना पुन्हा नव्या स्टार्सना जन्म देतात व ही क्रिया चालू रहाते. हे चक्र सतत चालू असते. सगळ्यात आधी सुरूवात कशी झाली हा प्रश्न अजूनही शास्त्रज्ञ सोडवत आहेत व काही वर्षात नक्कीच निर्णयाप्रत पोचतील ही मला आशा आहे. हे ग्रह तारे यांचे चक्र अनेक बिलिअन वर्षांचे असते. प्रत्येकाचा काळ वेगळा असतो व तो आकारमान व इतर अनेक घटकांवर अवलंबून असतो.




अशा प्रकारच्या प्रकाशचित्रांवरून शास्त्रज्ञ त्या स्टारबद्दल माहिती गोळा करतात. या रंगावरून वत्यातील स्पाँटसवरून त्यातीलएलिमेंटस बद्दल कल्पना येते.






आपण नेब्युलापासून या चक्राची सुरूवात पाहू.. नेब्युला हा दाट केमिकल्स व गँसचा ढग अवकाशात असतो. त्याच्या अंतर्भागात घर्षणामुळे खूप हीट तयार होते.या सगळ्या प्रक्रियेत हायड्रोजन हा महत्वाचा घटक आहे. कोअर मध्ये जेव्हा हायड्रोजनचे फ्यूजन होते तेव्हा प्रचंड प्रमाणात एनर्जी बाहेर पडते. प्रकाश व हीट यारूपातील ही एनर्जी बाहेरच्या बाजूला सरफेसकडे येते. यात तयार होणारे फोटाँन प्रकाश निर्माण करतात. या फ्यूजनच्या प्रक्रियेत हायर एलिमेँटस तयार होतोत. परत त्यांचे फ्यूजन होते अजून एनर्जी व नवीन एलिमेँट्सटी निर्मिती होते. आतून बाहेर येणारी ही एनर्जी जे प्रेशर निर्माण करते ते स्टारला त्याच्या वजनामुळे कोलँप्स होण्यापासून वाचवते. आपण सगळ्यांनी शाळेत पिरिआँडिक टेबल पाहिलेच असेल. ही सर्व एलिमेंटस अशा पद्धतिने तयार झाली आहेत व आपल्या निर्मिती च्या वेळेस जी तयार झाली तीच व तेवढीच आहेत. हा विचार केला की गंमत वाटते.
जेव्हा आयर्न तयार होते तेव्हा एनर्जी कमी व्हयला सुरूवात होते. या पुढची एलिमेंटस एनर्जी घेतात कोअर म्हणजे अंतर्भाग गुरूत्वाकर्षणामुळे कोलँप्स होतो . आता मधे गुरूत्वाकर्षणाचा जोर व बाहेर फयूजन मधून निर्माण झालेला फोर्स याचा बँलन्स जोपर्यंत साधला जातो व हायड्रोजनचा पुरवठा होत रहातो तोवर आकार वाढर जातो व नवीन एलिमेंटस तयार होत रहातात. या प्रक्रियेवरून लक्षात येते की प्रेशस एलिमेँट्स ही शेवटच्या काही मिनिटात बनतात, त्यासाठी प्रचंड हीट लागते. एकंदर आकारमान ही मोठे असावे लागते. जेव्हा इंधन संपते तेव्हा ही सगळी क्रिया थांबते. जेव्हा स्टार कोलँप्स होउन आत खूप सँच्युरेशन होते तेव्हा प्रचंड स्फोट होउन एलिमेंटस बाहेर टाकली जातात. नवीन स्टार्स तयार होतात.















पुढेआकारमानाप्रमाणे नोव्हा, सुपरनोव्हा वा व्लँकहोल्स बनतात.
आपली सूर्यमाला अशाच एका ब्लँकहोल भोवती फिरत आहे व त्यावर भरपूर संशोधन चालू आहे. त्याच्य आत नक्की काय आहे, पलिकडे काय आहे हे शोधण्याचे काम चालू आहे.

आपण नेहेमी जे छान आकाश व चांदणे बघत असतो त्यच्यामागे एवढे काही दडलेले असेल अशी कल्पना येत नाही. बरेच काही कल्पनेनेन बघावे लागते. पण जे आहे त्याबद्दल विचार केला की खूप गूढ अगम्य वाटते व परत परत त्याबद्दल विचार करावासा नक्की वाटतो. आपण या काळात आहोत व या सगळ्या शोधांचे साक्षी आहोत हा आपल्या नशिबाचा भाग. यातूनच पुढे जाउन आपले वेदातील विज्ञान अनुभवायला मिळेत असे वाटते हे नक्की.

Wednesday, January 25, 2012

दिनदर्शिका


दिनदर्शिका....

परवा टी व्ही वर एक कार्यक्रम पाहिला..... जर कालगणना नसती तर... या विषयावर एक मालिका होती. नुसत्या विचारानेच कसेतरी झाले. लहानपणापासून आपण वेळ मोजायला शिकतो. हे जर नसते तर... कशालाच संदर्भ राहिला नसता.... कालगणनेतला एक महत्नाचा टप्पा म्हणजे दिनदर्शिका. शाळेचे नवीन वर्ष सुरू झाले की आपण जसे नवीन पुस्तकांची वाट बघतो तसे मी कँलेंडरची वाट बघते. घरात सगळ्यात पहिले येते ते कालनिर्णय. यातील लेख वाचनीय असतात. आणि हो, इतकी वर्षे झाली तरी दर्जा राखलेला आहे. अमेरिकेत आल्यापासून सणवार बघायला हे आवश्यक झाले आहे.

इथे साधारण ख्रिसमस जवळ आला की माँल मध्ये कँलेंडरची तात्पुरती दुकाने दिसायला लागतात. नवीन वर्षाबरोबर किमती कमी होतात हा यातला चांगला भाग आहे. आता तर ७५ टक्के किम्मत कमी केलेली असते. यातील डेस्क वर ठेवण्याजोगी व्हरायटी मला फार आवडते. लोकांना गिफ्ट देण्यास उत्तम. विनोद, कोडी, सुडोकु, रेसिपिज, गोल्फ टिप्स, ट्रंव्हल, ओरिगामी, स्क्रँबल्स अशा अनेक विषयांवर ही छोटी कंलेडर्स असतात. दर दिवसाला नवीन काहीतरी शिकता येते, लहान मुलांना पण शिकवता येते हा फायदा आणि एक रूटीनही रहाते. मोठ्या कँलेंडर्स मधे नँशनल पार्क, प्राणी, युरोप, नामवंत कलाकारांची चित्रे, हाँलीवूड मधील मंडळी हजेरी लावताना दिसतात. गाड्या, वेगवेगळी कोटेशन्स, खेळाडू हेही काहींना आकर्षित करतात. या दुकानात गेले की हरवायला होते. एका वर तर १००० प्रवासी जागांची माहिती होती. फुलांची पण सुंदर असतात. या वर्षी अँपल च्या अँप्स ने ही नंबर लावला या दुनियेत.

या वर्षी अजून एक छान दिनदर्शिका पाहिली. एक बाई गेली २० एक वर्षे चक्क गणित हा विषय घेउन दिनदर्शिका काढते आहे. या वर्षी विशेष म्हणजे प्रत्येक तारखेवर एक गणित आहे वेगवेगळ्या प्रकारातले आणि त्या गणिताचे उत्तर म्हणजे ती तारीख आहे. शिवाय इतर माहिती खूप आहे. ज्यांना गणित आवडते आणि ज्यांना आवडत नाही त्या दोघांना हा प्रकार नक्की आवडेल. amazon.com वर mathematical calendar या भागात ते बघायला मिळेल.

या सगळ्या प्रकारात माझे आवडते मात्र आपले स्वतचे बनवलेले कंलेंडर. आपण बरीच ठिकाणे पहायला जातो, तिथे फोटो काढतो हा सगळे एकत्र करून मी गेली ४-५ वर्षे हा उद्योग करते आहे. विषेष करून पालकांना हा प्रकार आवडतो कारण मुला नातवंडांचे फोटो डोळ्यासमोर रहातात. वाढदिवस, लग्न या तारखा लक्षात ठेवून त्या व्यक्तीचे फोटो टाकता येतात आणि हे personalized calendar छान दिसते. तुम्ही पण करून बघा एखादे. walgreens.com or picsquare.com या सारख्या अनेक साईटस सापडतील.

अगदी पूर्वी फक्त देव किंवा नटनट्या यांना कंलेंडरवर स्थान होते आता ही व्हरायटी पाहिली की मजा वाटते. आता पुढच्या वर्षी नवीन काय काढतील याची उत्सुकता मला आत्ताच आहे. भारतात ही शिवाजी महाराज, राजस्थान, हिमालय, देवस्थाने या विषयावर सुंदर कँलेंडर्स बनतील. बाहेरच्या देशातून आलेल्या पाहुण्यांना द्यायला उत्तम....