
साद देती सह्याद्रीचे कडे....
भारतात महाराष्ट्रात औद्योगिक प्रगति बरीच झाली आहे. रस्त्यांनी शहरे जोडली गेलेली आहेत. झाडी, जंगल हा प्रकार अगदीच कमी. सह्.ाद्री चे किल्ले,गड मात्र ताठ मानेने उभे आहेत. आजकाल व्लाॆगवर, फेसबुकवर, वर्तमानपत्रात बरेच लोक यावर लिहितात. अनुभव, फोटो व इतर माहिती बरीच दिसते. आजकाल बरीच मंडळी या सहलींचे आयोजन करताना दिसतात. तरूणाई ट्रेक कडे परत वळत आहे हे पाहून छान वाटते.
हे सगळे वाचताना असे वाटले या सगळ्यांनी एकत्र येउन एका साईटवर सगळी माहिती एकत्रित ठेवली तर किती छान होईल. बरे हे सगळे स्वानुभवातुन आलेले असल्याने रंजक तसेच माहितीपूर्ण ही असेल. ३-४ लोकांनी एकत्र येउन थोडे थोडे काम वाटून घेतले तर हे काम सहज होण्यासारखे आहे. नवीन जाणारा माणूस या अनुभवातून बरेच काही शिकू शकतो. आणि एका प्रकारे माहिती असली की चांगले वाटते. गडावर जायचा नक्की रस्ता कुठला हे माहित असावा,,,तुम्ही म्हणाल की अशा चुकण्यात मजा असते ... मान्य आहे पण काहींना ती सजा वाटू शकते. गाईडनी पैसे खूप सांगणे यावर पण कंट्रोल राहू शकतो.
मी १०-१२ गडावर गेले आहे मग देशाबाहेर राहिल्याने तिथल्या गोष्टी जास्त बघितल्या गेल्या. अमेरिकेत हिंडताना एक गोष्ट जाणवते, कितीही बारीक गोष्ट असो त्याची माहिती व्यवस्थित लिहिलेली असते. (त्याबद्दल दुमत नसते) गेल्यावर व अजून २-३ ठिकाणी नकाशा लावलेले असतो. रेंजर लोक ३-४ वेळा माहितीपूर्ण प्रेझेंटेशन देतात. अघून मघून साघ्या लाकडाच्या खांबावर पाट्या लावून त्यावर थोडक्यात माहिती दिलेली असते. भौगोलिक ऐतिहासिक महत्व लिहिलेले असते. मी काही लोकांच्या ब्लाॆगवर वाचले की काही किल्ल्याबद्दल तिथल्या लोकांनाही माहिती नसते. सरकार या गोष्टीत लक्ष घालेल अशा वाट बघण्यापेक्षा काही लोकांनी एकत्रित येउन केले तर हे काम लवकर होईल. स्पांन्सर नक्की पुढे येतील आणि तसा फार खर्च येणार नाही.

आपण बाकी गोष्टी जितक्या पटकन काॆपी करतो तसे हे ही करायला हवे. गाईडच्या बाबतीत पण गावातल्या लोकांना एकत्र करून शिकवले तर मुले छान काम करू शकतात. आम्ही रायगडावर याचा अनुभव घेतला. तिथे बाबासाहेब पुरंदरे यांनी मुलांना शिकवून तयार केले आहे. ती मुले कविता म्हणून सगळी माहिती सांगत होती. ऐतिहासिक माहिती ज्याबद्दल दुमत आहे ती लिहिणे टाळावे. शिवाजी महाराजांनी केलेले काम मोठे आहे ते महत्वाचे. डिटेल्स मध्ये तफावत असू शकते. आपल्याकडे इतिहास नीट लिहिलेला नाही .. बखरकार पण वेगवेगळे इंटरप्रीटेशन करणार त्यामुळे वादाचे मुद्दे टाळून हे काम करावे लागेल. लिहिलेल्या पाट्या खराब न करणे, त्यावर काही न लिहिणे हे हळूहळू लोक शिकतील अशी आशा ठेवायला काहीच हरकत नाही. काही गडावर आत्ता असे नकाशे आहेत पण अगदीच कमी.

काय बाहेर राहून इथल्या उचापति कशाला अशा खूप लोकाॆच्या प्रतिक्रिया होतील पण मला हे मनापासून वाटते हे खरे.