Tuesday, November 10, 2009

खरेच गरज आहे का?

खरेच गरज आहे का?

आजकाल सेवाभावी संस्था बर्‍याच वेळेला काही ना काही कारणाने पॆसे जमवत असतात. कधी नॅचरल कलॅमिटीज तर कधी शाळेला मदत तर कधी निराधार मुलांना मदत. आता हे पॆसे जमवताना खूप वेळा लोकांना नाही म्हटले तरी प्रेशर येते. बरे ही मदत प्रत्यक्ष हवी तिथे जाते का नाही हे बर्‍याच वेळेला समजत नाही. विश्वासावर सगळे चालू असते. काही सेवाभावी संस्था आणि स्वयंसेवक यांच्या सहकार्याने हे काम चालू असते. आता आपण शक्य असेल तर दुसर्‍याला मदत करावी हे सगळ्यांनाच वाटते पण ती आपल्याला हवी तिथे करण्याची सोय हवी. सोशल प्रेशर खाली करायला लागू नये. प्रत्येकाने हवे तिथे जाउन मदत केली की करणार्‍यालाही बरे वाटते.

अमेरिकेतून अशी मदत करणार्‍या कॆक संस्था आहेत. बरे भारतातील लोकांशी बोलताना नेहेमी अमेरिका विरोधी सूर जास्त दिसतो. असे असले तरी मदतीची अपेक्षा असतेच. तुमच्याकडे लोकसंख्या कमी म्हणून सगळे शक्य असा एक सूर असतो आणि हे करायलाच पाहिजे असेही बर्‍याच लोकांचे म्हणणे असते. जेव्हा नॅचरल कलॅमिटीज येतात तेव्हा शक्य तेवढी मदत केली पाहिजे पण आता भारतात शाळा, निराधार मुले यांना मदतीची खरंच गरज आहे का? सध्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा पुरवण्याची क्षमता मला वाटते आता देशाकडे नक्की आहे.

शहरांपासून जरा दूर गेले की हे प्रॉब्लेम्स दिसतात. शाळा, दवाखाने यांच्या अपुर्‍या सोई...अगदी पुण्याच्या जरा बाहेर गेले की हे चित्र दिसते. आता वेगवेगळे बिजिनेसेस, काही मोठी देवळे , आणि काही ट्रस्टस यांच्याकडे एवढा पॆसा आहे कि तो नक्कीच पुरा पडेल. कमी आहे ती फक्त नियोजनाची. आता नवीन सरकार, नवीन विचाराची माणसे आली आहेत ती हे काम पुढे नेउ शकतील आणि जास्तीत जास्त लोकांच्या मूलभूत गरजा भागवतील असे वाटते. देशाबाहेर राहिले की हे नेहेमी जाणवते अरे आपल्या देशात जर एवढी लोकसंख्या आहे तर तिचा उपयोग करून घ्यायला हवा. बाकी प्रगती होत आहे तर या गोष्टीकडे पण सरकार ने लक्ष दिले पाहिजे. आपल्या कडे पॆसा आहे, धान्य आहे, स्किल आहे. या गोष्टी फक्त व्यवस्थित पणे सगळ्या लोकांपर्यंत पोचायला हव्यात.

2 comments: